म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर
'राजकीय स्वार्थापोटी सर्वच पक्षांची लाचारी स्वीकारणाऱ्या राणे कुटुंबियांना शिवसेनेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या दलबदलू पिता-पुत्रांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. ते स्वाभिमानी नसून गद्दार आहेत,' अशी टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शनिवारी केली. आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेवर केलेल्या टीकेला क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यापबाबत पत्रकात म्हटले आहे की, 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने स्वाभिमानाची भाषा करणारे राणे पिता-पुत्र स्वाभिमानी नसून गद्दार आहेत. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करणारे मातीमोल झाले आहेत. ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांना नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते केले. त्याची जाण त्यांनी ठेवली असती तर त्यांची अवस्था केविलवाणी झाली नसती. शिवसेनेतून राणे बाहेर पडूनही पक्षावर फरक पडलेला नाही. सेनेच्या विरोधात निवडणूक लढलेल्या राणेंना सिंधुदुर्ग आणि मुंबईतही शिवसैनिकांनी पराभूत केले. काँग्रेस पक्षातून भाजपच्या वाटेवर गेलेल्या राणेंच्या त्या पक्षाकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय चालण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड पक्ष काढला आहे. शिवसेना-भाजप युती झाल्याने अनेकांच्या पोटात पोटशूळ उठले आहेत. राणे कुटुंब त्यास अपवाद नाहीत. स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांची चाललेली केविलवाणी धडपड जनता पाहत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व, राम मंदिर, नाणार प्रकल्प, शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मागण्या मार्गी लावूनच युती केली आहे. लोकहितासाठी ही युती झाली असून, त्याचे मोल स्वतःच्या स्वार्थासाठी दलबदलूपणा करणाऱ्या पिता-पुत्रांना कदापि कळणार नाही. त्यामुळे राणेंनी महाराष्ट्रात पाच जागा लढवून दुसरा उमेदवार निवडून आणण्यापेक्षा स्वत: निवडून येणार की नाही याची आधी चाचपणी करावी.'
'राजकीय स्वार्थापोटी सर्वच पक्षांची लाचारी स्वीकारणाऱ्या राणे कुटुंबियांना शिवसेनेवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. सरड्याप्रमाणे रंग बदलणाऱ्या दलबदलू पिता-पुत्रांनी स्वतःचे आत्मपरिक्षण करावे. ते स्वाभिमानी नसून गद्दार आहेत,' अशी टीका आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शनिवारी केली. आमदार नितेश राणे यांनी शुक्रवारी कोल्हापुरात शिवसेनेवर केलेल्या टीकेला क्षीरसागर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
यापबाबत पत्रकात म्हटले आहे की, 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने स्वाभिमानाची भाषा करणारे राणे पिता-पुत्र स्वाभिमानी नसून गद्दार आहेत. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करणारे मातीमोल झाले आहेत. ठाकरे यांनी खासदार नारायण राणे यांना नगरसेवक, महापौर, आमदार, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते केले. त्याची जाण त्यांनी ठेवली असती तर त्यांची अवस्था केविलवाणी झाली नसती. शिवसेनेतून राणे बाहेर पडूनही पक्षावर फरक पडलेला नाही. सेनेच्या विरोधात निवडणूक लढलेल्या राणेंना सिंधुदुर्ग आणि मुंबईतही शिवसैनिकांनी पराभूत केले. काँग्रेस पक्षातून भाजपच्या वाटेवर गेलेल्या राणेंच्या त्या पक्षाकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने त्यांनी स्वत:चा व्यवसाय चालण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड पक्ष काढला आहे. शिवसेना-भाजप युती झाल्याने अनेकांच्या पोटात पोटशूळ उठले आहेत. राणे कुटुंब त्यास अपवाद नाहीत. स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांची चाललेली केविलवाणी धडपड जनता पाहत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व, राम मंदिर, नाणार प्रकल्प, शेतकरी कर्जमाफी या प्रमुख मागण्या मार्गी लावूनच युती केली आहे. लोकहितासाठी ही युती झाली असून, त्याचे मोल स्वतःच्या स्वार्थासाठी दलबदलूपणा करणाऱ्या पिता-पुत्रांना कदापि कळणार नाही. त्यामुळे राणेंनी महाराष्ट्रात पाच जागा लढवून दुसरा उमेदवार निवडून आणण्यापेक्षा स्वत: निवडून येणार की नाही याची आधी चाचपणी करावी.'