म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची स्वप्ने नागरिकांना दाखवत सत्ता बळकाविलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षांच्या कालावधीत देशाचे अतोनात नुकसान झाले. भ्रष्टाचार, दहशतवाद, बेरोजगारी संपुष्टात आणण्याच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत एकही विकासाचा प्रकल्प राबविला नाही. नोटाबंदीचा निर्णय हा सर्वसामान्य जनतेसाठी नव्हे तर देशातील भांडवलदारांसाठी होता. चहा विक्री करणारी व्यक्ती पंतप्रधान झाल्याची प्रतिमा निर्माण करणारे पंतप्रधान मोदी हे भावनिक आणि जाती धर्मात भेदाभेदाचे राजकारण करत देश विकायला निघाले आहेत अशी घणाघाती टीका जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनं केली.
ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात आयोजित सभेत कन्हैयाकुमार यांनं पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ या विषयावर बोलताना त्यांनी नोटाबंदी, जीएसटी, उद्योगधंद्यावरील परिणाम, वाढत्या बेरोजगारीवरुन केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पर्दाफाश केला. कॉम्रेड उमा पानसरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे ही सभा झाली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सभेला विरोध केल्यामुळे सभेदरम्यान केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. फेडरेशनच्या १००हून अधिक कार्यकर्त्यांनी कन्हैयाकुमार यांच्याभोवती संरक्षण कडे केले होते.
नोटाबंदी, जीएसटीमुळे देशातील व्यापार उद्योग व्यवसाय ठप्प झाला. बेरोजगारी वाढली. शंभरहून अधिक नागरिकांना जीव गमवावे लागले. त्याची जबाबदारी सरकारला ढकलता येणार नाही असे स्पष्ट करत कन्हैयाकुमार म्हणाला, नोटाबंदीच्या कालावधीत आमदार, खासदार, बडे उद्योगपती, पैशासाठी रांगेत उभारल्याचे एकही उदाहरण पाहावयास मिळत नाहीत. नोटाबंदीमुळे तीन लाख कोटी रुपये काळा धन जमा झाले असे पंतप्रधान म्हणतात तर मेट्रो ट्रेनसाठी जपानकडून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घ्यायची वेळ का आली? नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने जन धन खाते उघडले, पण त्यांच्या खात्यावर पंधरा लाख अद्याप जमा झाले नाहीत. तीन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, रोजगार निर्मिती खुंटल्यामुळे तरुण नैराश्याच्या गर्तेत सापडला. मात्र पंतप्रधान ‘मन की बात’मध्ये मश्गुल आहेत. लोकांसाठी एकही काम नाही पण विकासाच्या थापा मारत आहेत. लोकांना आणखी किती फसवणार आहात. नजीकच्या काळात तुम्हाला पळायला आणि तोंड लपवायलाही जागा उरणार नाही.
एक राष्ट्र, एक पक्ष, एक नेत्याचे स्वप्न उध्वस्त करा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने येत्या शंभर वर्षात देशाची घटना बदलण्याचे षडयंत्र आखले आहे. देशाचा झेंडा बदलण्याचे कारस्थान सुरु आहे. एक राष्ट्र, एक पक्ष आणि एक नेता अशी हुकूमशाही प्रवृत्ती रुजविली जात आहे. यामुळे २०१९ मध्ये निवडणुका होतील का ? अशी साशंकता आहे. भाजपमुळे देश आणि राष्ट्रीय एकतेला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीवादी देशाला वाचविण्यासाठी भाजपमुक्त भारत या लढाईसाठी साऱ्यांची एकत्र यायला हवे. जातीयवादावर आधारित राष्ट्र निर्मितीचे स्वप्न मोडीत काढले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. मी निवडणूक लढविणार नाही. पण निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी लढत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
स्वच्छ आणि पारदर्शी कारभाराची स्वप्ने नागरिकांना दाखवत सत्ता बळकाविलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन वर्षांच्या कालावधीत देशाचे अतोनात नुकसान झाले. भ्रष्टाचार, दहशतवाद, बेरोजगारी संपुष्टात आणण्याच्या वल्गना फोल ठरल्या आहेत. तीन वर्षांच्या कालावधीत एकही विकासाचा प्रकल्प राबविला नाही. नोटाबंदीचा निर्णय हा सर्वसामान्य जनतेसाठी नव्हे तर देशातील भांडवलदारांसाठी होता. चहा विक्री करणारी व्यक्ती पंतप्रधान झाल्याची प्रतिमा निर्माण करणारे पंतप्रधान मोदी हे भावनिक आणि जाती धर्मात भेदाभेदाचे राजकारण करत देश विकायला निघाले आहेत अशी घणाघाती टीका जेएनयू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार यांनं केली.
ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन आणि ऑल इंडिया यूथ फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापुरात आयोजित सभेत कन्हैयाकुमार यांनं पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारवर चौफेर टीका केली. ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ या विषयावर बोलताना त्यांनी नोटाबंदी, जीएसटी, उद्योगधंद्यावरील परिणाम, वाढत्या बेरोजगारीवरुन केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा पर्दाफाश केला. कॉम्रेड उमा पानसरे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह येथे ही सभा झाली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी सभेला विरोध केल्यामुळे सभेदरम्यान केशवराव भोसले नाट्यगृह परिसरात प्रचंड पोलिस बंदोबस्त होता. फेडरेशनच्या १००हून अधिक कार्यकर्त्यांनी कन्हैयाकुमार यांच्याभोवती संरक्षण कडे केले होते.
नोटाबंदी, जीएसटीमुळे देशातील व्यापार उद्योग व्यवसाय ठप्प झाला. बेरोजगारी वाढली. शंभरहून अधिक नागरिकांना जीव गमवावे लागले. त्याची जबाबदारी सरकारला ढकलता येणार नाही असे स्पष्ट करत कन्हैयाकुमार म्हणाला, नोटाबंदीच्या कालावधीत आमदार, खासदार, बडे उद्योगपती, पैशासाठी रांगेत उभारल्याचे एकही उदाहरण पाहावयास मिळत नाहीत. नोटाबंदीमुळे तीन लाख कोटी रुपये काळा धन जमा झाले असे पंतप्रधान म्हणतात तर मेट्रो ट्रेनसाठी जपानकडून एक लाख कोटी रुपयांचे कर्ज घ्यायची वेळ का आली? नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने जन धन खाते उघडले, पण त्यांच्या खात्यावर पंधरा लाख अद्याप जमा झाले नाहीत. तीन वर्षांत बारा हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, रोजगार निर्मिती खुंटल्यामुळे तरुण नैराश्याच्या गर्तेत सापडला. मात्र पंतप्रधान ‘मन की बात’मध्ये मश्गुल आहेत. लोकांसाठी एकही काम नाही पण विकासाच्या थापा मारत आहेत. लोकांना आणखी किती फसवणार आहात. नजीकच्या काळात तुम्हाला पळायला आणि तोंड लपवायलाही जागा उरणार नाही.
एक राष्ट्र, एक पक्ष, एक नेत्याचे स्वप्न उध्वस्त करा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाने येत्या शंभर वर्षात देशाची घटना बदलण्याचे षडयंत्र आखले आहे. देशाचा झेंडा बदलण्याचे कारस्थान सुरु आहे. एक राष्ट्र, एक पक्ष आणि एक नेता अशी हुकूमशाही प्रवृत्ती रुजविली जात आहे. यामुळे २०१९ मध्ये निवडणुका होतील का ? अशी साशंकता आहे. भाजपमुळे देश आणि राष्ट्रीय एकतेला धोका निर्माण झाला आहे. लोकशाहीवादी देशाला वाचविण्यासाठी भाजपमुक्त भारत या लढाईसाठी साऱ्यांची एकत्र यायला हवे. जातीयवादावर आधारित राष्ट्र निर्मितीचे स्वप्न मोडीत काढले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. मी निवडणूक लढविणार नाही. पण निवडणूक प्रक्रिया आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी लढत राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.