Anuradha.kadam@timesgroup.com
Tweet:@anuradhakadamMT
कोल्हापूर : राष्ट्रगीताविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याच्या नियमाचे कोल्हापुरातील बहुतांशी चित्रपटगृहात पॅकअप होत आहे. दोन मल्टिप्लेक्स थिएटर व्यतिरिक्त सध्यातरी एकाही चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सलामी दिली जात नाही. अडीच ते तीन तास सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी लागणारा ५२ सेकंदांचाही वेळ देण्याची तयारी नसल्याचा परिणाम चित्रपटगृहातील राष्ट्रगीत म्हणण्याचा नियम धाब्यावर बसवण्यावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रत्येक चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावावे आणि उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उठून उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखावा असा नियम राज्य सरकारने सन २००३ साली केला. गेल्या १५ वर्षापासून हा नियम आहे, मात्र कोल्हापुरातील चित्रपटगृहांमध्ये या नियमाचे सातत्य राखले जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील आठ एकपडदा चित्रपटगृहात दररोज प्रत्येक खेळाआधी राष्ट्रगीत वाजवले जातेच असे नाही. मात्र शहरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावून सिनेमा सुरू करण्याचा नियम पाळला जातो.
यासंदर्भात शहरातील एकपडदा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांमार्फत माहिती घेतली असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जेव्हा हा नियम केला त्यावेळी सुरूवातीच्या एक ते दोन महिन्यात प्रत्येक खेळाआधी राष्ट्रगीत लावले जात होते. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षात राष्ट्रगीत लावण्यामध्ये सातत्य नाही. अनेकदा प्रेक्षक राष्ट्रगीतासाठी उभे राहत नाहीत. महाविद्यालयीन तरुणांकडूनही राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याला प्रतिसाद दिला जात नाही. याचाही परिणाम राष्ट्रगीत न लावण्यावर होत आहे. दरम्यान, प्रेक्षकांची संख्या किती आहे हे पाहून काहीवेळा राष्ट्रगीत लावले जात असल्याची माहिती शहरातील एका एकपडदा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी दिली. मात्र हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली. हा नियम असला तरी तो चित्रपटगृह चालकांसोबत प्रेक्षकांनीही पाळण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन किंवा राष्ट्रपुरूषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या औचित्याने राष्ट्रगीत लावण्याचा नियम पाळण्यावर आम्ही भर देत असल्याचे एकपडदा चित्रपटगृहाच्यावतीने सांगण्यात आले.
प्रेक्षकांकडूनही हवा प्रतिसाद
राज्य सरकारने चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावून चित्रपट सुरू करण्याचा नियम केला असला तरी या नियमाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो. मध्यंतरी मुंबईत एका हिंदी सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात आले. मात्र एका कुटुंबाने राष्ट्रगीतावेळी उभे राहण्यास नकार दिल्याने चित्रपटगृहात गोंधळ झाला. अशा घटना घडल्यामुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे राष्ट्रगीत लावण्याची जबाबदारी जितकी चित्रपटगृह संचालकांची आहे तितकीच त्याचा मान राखण्याची जबाबदारी प्रेक्षक म्हणून चित्रपटगृहात येणाऱ्या नागरिकांचीही आहे.
कोट
प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत म्हणून नियम डावलणे योग्य नाही. राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उभे राहून त्याचा मान राखणे हे कर्तव्य आहे. चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सातत्याने लावले तर प्रेक्षकांना ती सवय लागेल. प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही म्हणून या नियमाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. तसेच सध्या तरी एकाही एकपडदा चित्रपटगृहात हा नियम पाळला जात नाही.
महेंद्र पाटील, प्रेक्षक
कोल्हापुरातील सर्व चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याचा नियम पाळला जात नसेल तर चित्रपटगृह संचालकांना सूचना दिल्या जातील. त्यासाठी चित्रपटगृह संचालकांशी संपर्क साधून या नियमाची अंमलबजावणी सातत्याने केली जावी याबाबत सांगितले जाईल. तसेच प्रेक्षकांच्या संख्येवर हा नियम पाळायचा की नाही अशाप्रकारची भूमिका घेऊ नये असे वाटते.
सूर्यकांत पाटील, अध्यक्ष, जिल्हा चित्रपटगृह मालक संघटना
Tweet:@anuradhakadamMT
कोल्हापूर : राष्ट्रगीताविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याच्या नियमाचे कोल्हापुरातील बहुतांशी चित्रपटगृहात पॅकअप होत आहे. दोन मल्टिप्लेक्स थिएटर व्यतिरिक्त सध्यातरी एकाही चित्रपटगृहात राष्ट्रगीताची सलामी दिली जात नाही. अडीच ते तीन तास सिनेमा पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना राष्ट्रगीत म्हणण्यासाठी लागणारा ५२ सेकंदांचाही वेळ देण्याची तयारी नसल्याचा परिणाम चित्रपटगृहातील राष्ट्रगीत म्हणण्याचा नियम धाब्यावर बसवण्यावर होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
प्रत्येक चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावावे आणि उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उठून उभे राहून राष्ट्रगीताचा मान राखावा असा नियम राज्य सरकारने सन २००३ साली केला. गेल्या १५ वर्षापासून हा नियम आहे, मात्र कोल्हापुरातील चित्रपटगृहांमध्ये या नियमाचे सातत्य राखले जात नसल्याचे चित्र आहे. शहरातील आठ एकपडदा चित्रपटगृहात दररोज प्रत्येक खेळाआधी राष्ट्रगीत वाजवले जातेच असे नाही. मात्र शहरातील मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावून सिनेमा सुरू करण्याचा नियम पाळला जातो.
यासंदर्भात शहरातील एकपडदा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांमार्फत माहिती घेतली असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जेव्हा हा नियम केला त्यावेळी सुरूवातीच्या एक ते दोन महिन्यात प्रत्येक खेळाआधी राष्ट्रगीत लावले जात होते. मात्र, गेल्या चार ते पाच वर्षात राष्ट्रगीत लावण्यामध्ये सातत्य नाही. अनेकदा प्रेक्षक राष्ट्रगीतासाठी उभे राहत नाहीत. महाविद्यालयीन तरुणांकडूनही राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याला प्रतिसाद दिला जात नाही. याचाही परिणाम राष्ट्रगीत न लावण्यावर होत आहे. दरम्यान, प्रेक्षकांची संख्या किती आहे हे पाहून काहीवेळा राष्ट्रगीत लावले जात असल्याची माहिती शहरातील एका एकपडदा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी दिली. मात्र हे प्रमाण अतिशय नगण्य असल्याचीही पुष्टी त्यांनी जोडली. हा नियम असला तरी तो चित्रपटगृह चालकांसोबत प्रेक्षकांनीही पाळण्याची गरज आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, महाराष्ट्र दिन किंवा राष्ट्रपुरूषांच्या जयंती किंवा पुण्यतिथीच्या औचित्याने राष्ट्रगीत लावण्याचा नियम पाळण्यावर आम्ही भर देत असल्याचे एकपडदा चित्रपटगृहाच्यावतीने सांगण्यात आले.
प्रेक्षकांकडूनही हवा प्रतिसाद
राज्य सरकारने चित्रपटगृहात राष्ट्रगीत लावून चित्रपट सुरू करण्याचा नियम केला असला तरी या नियमाची अंमलबजावणी होण्यासाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद महत्त्वाचा ठरतो. मध्यंतरी मुंबईत एका हिंदी सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात आले. मात्र एका कुटुंबाने राष्ट्रगीतावेळी उभे राहण्यास नकार दिल्याने चित्रपटगृहात गोंधळ झाला. अशा घटना घडल्यामुळे सार्वजनिक सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे राष्ट्रगीत लावण्याची जबाबदारी जितकी चित्रपटगृह संचालकांची आहे तितकीच त्याचा मान राखण्याची जबाबदारी प्रेक्षक म्हणून चित्रपटगृहात येणाऱ्या नागरिकांचीही आहे.
कोट
प्रेक्षक प्रतिसाद देत नाहीत म्हणून नियम डावलणे योग्य नाही. राष्ट्रगीत सुरू झाल्यावर उभे राहून त्याचा मान राखणे हे कर्तव्य आहे. चित्रपटगृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत सातत्याने लावले तर प्रेक्षकांना ती सवय लागेल. प्रेक्षकांचा प्रतिसाद नाही म्हणून या नियमाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. तसेच सध्या तरी एकाही एकपडदा चित्रपटगृहात हा नियम पाळला जात नाही.
महेंद्र पाटील, प्रेक्षक
कोल्हापुरातील सर्व चित्रपटगृहात चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्याचा नियम पाळला जात नसेल तर चित्रपटगृह संचालकांना सूचना दिल्या जातील. त्यासाठी चित्रपटगृह संचालकांशी संपर्क साधून या नियमाची अंमलबजावणी सातत्याने केली जावी याबाबत सांगितले जाईल. तसेच प्रेक्षकांच्या संख्येवर हा नियम पाळायचा की नाही अशाप्रकारची भूमिका घेऊ नये असे वाटते.
सूर्यकांत पाटील, अध्यक्ष, जिल्हा चित्रपटगृह मालक संघटना