कुडित्रे : म्हालसवडे (ता. करवीर) येथील बाजीराव बाबू पाटील (वय ३८) याने विष पिवून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. आत्महत्येची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली आहे. बाजीराव हा कोल्हापुरातील उद्यमनगर येथे एका खासगी कंपनीत गेले आठ वर्षे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जातो असे सांगून तो घरातून निघून गेला. दुपारी कामावर असतानाच त्याने विष प्राशन केले. सहकारी मित्रांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी त्वरीत त्याला सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रविवार मध्यरात्री उपचार चालू असताना त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे.
म्हालसवडेतील एकाची आत्महत्या
म्हालसवडे (ता करवीर) येथील बाजीराव बाबू पाटील (वय ३८) याने विष पिवून आत्महत्या केली आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही...
30 25 Dec 2018, 4:00 am