कोल्हापूर : शिवाजी पेठेतील लाड चौक येथील प्रसाद वसंत माने (वय ३५) यांनी घरातील वाशाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली. रविवारी दुपारी सव्वाएक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ते अविवाहित होते. जुना राजवाडा पोलिस ठाण्यात या आत्महत्येची नोंद झाली आहे.
लाड चौकात एकाची आत्महत्या
शिवाजी पेठेतील लाड चौक येथील प्रसाद वसंत माने (वय ३५) यांनी घरातील वाशाला साडीने गळफास लावून आत्महत्या केली...
Maharashtra Times 27 Aug 2018, 4:00 am