कोल्हापूर : शहरातील मध्यवर्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण होत आहे. हे निश्चितच आनंददायी आणि अभिमानाची गोष्ट आहे. मात्र सुशोभिकरणाच्या कामाचा नियोजित आराखडा नागरिकांसमोर खुला करावा. तसेच सुशोभिकरणाचे काम सर्वांना दिसेल अशा पद्धतीने व्हावे, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. सुशोभिकरणाच्या आराखड्याचे पोस्टर प्रसिद्ध करावे. छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला आणि मूळ चबुतऱ्याला कुठेही धक्का न लावता सुशोभिकरणाच्या आराखड्याला मूर्त रूप द्यावे, असे पत्रकात म्हटले आहे.
आराखडा खुला करा
शहरातील मध्यवर्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण होत आहे हे निश्चितच आनंददायी आणि अभिमानाची गोष्ट आहे...
Maharashtra Times 28 May 2018, 4:00 am