कोल्हापूर: दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हिताचे राहिले नाही. हे आंदोलन आता राजकीय बनले आहे. शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली नेत्यांचा तमाशा सुरू आहे.’अशी टीका राज्य कृषीमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल (Pasha Patel) यांनी केली. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी (Raju Shetty) यांचाही समाचार घेतला. (pasha patel criticizes ncp leader sharad pawar and raju shetty)
पटेल म्हणाले, ‘ केंद्र सरकार सगळया गोष्टीवर चर्चा करायला तयार आहे. पण शेतकरी आंदोलनातील नेते मंडळी आडमुठेपणाने वागत आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे नाहीत. हे आंदोलन शेतकऱ्यांचे हिताचे राहिलेले नाही. त्यामध्ये राजकारणाचा शिरकाव झाला आहे. ही राजकीय मंडळी शेतकरी आंदोलनाच्या नावाखाली आंदोलनाचा तमाशा करत आहेत. कृषी कायद्यावरुन विरोधक मंडळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. हा कायदा ऐच्छिक आहे. ’
क्लिक करा आणि वाचा- समुद्राचं खारट पाणी पिण्यायोग्य करणार; मुंबई महापालिकेत प्रस्ताव मंजूर
पत्रकार परिषदेला भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, विजय जाधव, दिलीप मेत्राणी, विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
क्लिक करा आणि वाचा- hasina begum: हसीना बेगम यांचे निधन; पाकिस्तानातून १८ वर्षांनी झाली होती सुटका
क्लिक करा आणि वाचा- भाजप नेते आशीष शेलार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; केली 'ही' मागणी