म. टा. वृत्तसेवा, कुडित्रे
भारत सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य विमा योजनेच्या नावाखाली हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या महादेव नामदेव लोहार (वय २७) व पूजा महादेव लोहार या दाम्पत्याला कावणे ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली. या दाम्पत्याला न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
'आयुष्यमान' च्या नावावर लोहार दाम्पत्याने निगवे खालसा, हणबरवाडी येथील अनेक ग्रामस्थांचे विमा उतरवले. सोमवारी सकाळी लोहार दाम्पत्य कावणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात आले आणि त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना घेऊन आलो आहोत असे सांगून विमा उतरवण्याचे काम सुरू केले. या दाम्पत्याने गावातील ग्रामस्थांचे प्रत्येकी ६५ रुपये प्रमाणे सुमारे चार - पाचशे लाभार्थ्यांचे पैसे गोळा केले. तसेच तात्काळ प्रत्येक लाभार्थ्यांना विमा योजनेची पावती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले एक प्रमाणपत्रही दिले. दरम्यान, गावातील एकनाथ पाटील व कृष्णात चौगले यांना याबाबत संशय आल्याने या योजनेसाठी असे काम सुरू आहे का याची त्यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी ही बनवेगिरी असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा ग्रामस्थांनी इस्पूर्ली पोलिस ठाण्यात याची कल्पना देऊन लोहार दाम्पत्याला पोलिसांच्या हवाली केले.
भारत सरकारच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य विमा योजनेच्या नावाखाली हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या महादेव नामदेव लोहार (वय २७) व पूजा महादेव लोहार या दाम्पत्याला कावणे ग्रामस्थांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली. या दाम्पत्याला न्यायालयात हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
'आयुष्यमान' च्या नावावर लोहार दाम्पत्याने निगवे खालसा, हणबरवाडी येथील अनेक ग्रामस्थांचे विमा उतरवले. सोमवारी सकाळी लोहार दाम्पत्य कावणे येथील ग्रामपंचायत कार्यालयात आले आणि त्यांनी राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री आरोग्य विमा योजना घेऊन आलो आहोत असे सांगून विमा उतरवण्याचे काम सुरू केले. या दाम्पत्याने गावातील ग्रामस्थांचे प्रत्येकी ६५ रुपये प्रमाणे सुमारे चार - पाचशे लाभार्थ्यांचे पैसे गोळा केले. तसेच तात्काळ प्रत्येक लाभार्थ्यांना विमा योजनेची पावती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले एक प्रमाणपत्रही दिले. दरम्यान, गावातील एकनाथ पाटील व कृष्णात चौगले यांना याबाबत संशय आल्याने या योजनेसाठी असे काम सुरू आहे का याची त्यांनी चौकशी सुरू केली. त्यावेळी ही बनवेगिरी असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा ग्रामस्थांनी इस्पूर्ली पोलिस ठाण्यात याची कल्पना देऊन लोहार दाम्पत्याला पोलिसांच्या हवाली केले.