कोल्हापूर: राज्यात वीज बिलात पन्नास टक्के सवलत ( electricity bill payment issue ) देण्याचा प्रस्ताव महावितरणने सरकारला दिला आहे, मात्र हा बोजा सरकारला सहन होणारा नाही म्हणून अर्थखात्याने मुख्यमंत्र्यांकडे न पाठवताच तो नाकारला. यामुळे हे सरकार नेमके कोण चालवत आहे ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray ) आहेत की अजित पवार? ( ajit pawar ) असा प्रश्न पडत असल्याचा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कोल्हापुरात मारला.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते कोल्हापुरात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करण्याची मागणी राज्यभर सुरू आहे. त्यानुसार पन्नास टक्के वीज बिल माफ करण्याचा प्रस्ताव महावितरणने दिला आहे. हे बिल माफ करायची की नाही हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे, पण त्याबाबत निर्णय झाला नाही. उलट हा बोजा आपण सहन करू शकत नाही असे असे अर्थखात्याने कळवले. यामुळे मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की अजित पवार याचे उत्तर आता ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करून आंबेडकर म्हणाले, जर ठाकरे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी महावितरणचा प्रस्ताव स्वीकारल्याचे जाहीर करावे.
आंबेडकर म्हणाले, राज्यातील मराठा समाजाला मिळालेल्या तेरा टक्के आरक्षण कोट्यातून मराठा युवकांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून सरकारकडे करण्यात आली. पण महाविकास आघाडी सरकार गरीब मराठा समाजाच्या बाजूने नसल्यामुळे हा प्रस्ताव मंजुर होत नाही. यातच खाजगी शिक्षण संस्थांतील प्रवेशाच्या कोट्यात सरकारने २५ टक्के कपात केल्यामुळे ५ लाख युवक उच्च शिक्षणाला मुकणार आहेत. एकूणच राज्यातील श्रीमंत मराठा, गरीब मराठ्याला जगू देणार नाहीत असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता?; प्रकाश आंबेडकरांचे पुन्हा मोठे विधान
प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे; चंद्रकांत पाटलांनी केला 'हा' खुलासा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीवर बी पार्ट म्हणून टिका करणाऱ्यांनी, बिहार विधानसभा निवडणुकीत बी पार्ट म्हणून कोणाचं काम केलं हे दिसून आलं आहे असा आरोप करताना आंबेडकर म्हणाले, वंचित आघाडीवर ज्यांनी चिखलफेक केली, त्यांच्यावरच आता होत असलेल्या चिखलफेकीचा आनंद आम्ही घेत आहोत.
पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील वंचित आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते कोल्हापुरात आले होते. तेव्हा पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊन काळातील विज बिल माफ करण्याची मागणी राज्यभर सुरू आहे. त्यानुसार पन्नास टक्के वीज बिल माफ करण्याचा प्रस्ताव महावितरणने दिला आहे. हे बिल माफ करायची की नाही हा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायचा आहे, पण त्याबाबत निर्णय झाला नाही. उलट हा बोजा आपण सहन करू शकत नाही असे असे अर्थखात्याने कळवले. यामुळे मुख्यमंत्री कोण उद्धव ठाकरे की अजित पवार याचे उत्तर आता ठाकरे यांनी द्यावे अशी मागणी करून आंबेडकर म्हणाले, जर ठाकरे मुख्यमंत्री असतील तर त्यांनी महावितरणचा प्रस्ताव स्वीकारल्याचे जाहीर करावे.
आंबेडकर म्हणाले, राज्यातील मराठा समाजाला मिळालेल्या तेरा टक्के आरक्षण कोट्यातून मराठा युवकांना उच्च शिक्षणासाठी प्रवेश द्यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीकडून सरकारकडे करण्यात आली. पण महाविकास आघाडी सरकार गरीब मराठा समाजाच्या बाजूने नसल्यामुळे हा प्रस्ताव मंजुर होत नाही. यातच खाजगी शिक्षण संस्थांतील प्रवेशाच्या कोट्यात सरकारने २५ टक्के कपात केल्यामुळे ५ लाख युवक उच्च शिक्षणाला मुकणार आहेत. एकूणच राज्यातील श्रीमंत मराठा, गरीब मराठ्याला जगू देणार नाहीत असा आरोप त्यांनी केला.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची शक्यता?; प्रकाश आंबेडकरांचे पुन्हा मोठे विधान
प्रताप सरनाईक यांच्या घरावर छापे; चंद्रकांत पाटलांनी केला 'हा' खुलासा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वंचित बहूजन आघाडीवर बी पार्ट म्हणून टिका करणाऱ्यांनी, बिहार विधानसभा निवडणुकीत बी पार्ट म्हणून कोणाचं काम केलं हे दिसून आलं आहे असा आरोप करताना आंबेडकर म्हणाले, वंचित आघाडीवर ज्यांनी चिखलफेक केली, त्यांच्यावरच आता होत असलेल्या चिखलफेकीचा आनंद आम्ही घेत आहोत.