म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी
‘सर्व डावपेच फोल ठरल्याने आता भाजप सरकार जवानांच्या नावावर मते मागत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान म्हणून विराजमान असलेले नरेंद्र मोदी आज चौकीदार बनले आहेत. दहा ते १५ हजार रुपयांच्या पगारात चौकीदार मिळू शकतो. मात्र, देशाला चौकीदाराची नव्हे, सक्षम नेतृत्वाची गरज आहे,’ असे प्रतिपादन दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ तांबेमाळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात इचलकरंजी व हातकणंगले विधानसभा मतदारसंघांतील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रकाशराज म्हणाले, ‘आज एक अभिनेता म्हणून ज्या शिखरावर पोहोचलो त्याचे सर्व श्रेय तुम्हा सर्वांचे आहे. तुमच्या प्रश्नांसाठीच मला आज रस्त्यावर उतरावे लागले. सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून त्यासाठी संसदेत आवाज उठविणाऱ्या नेतृत्वाची गरज असून त्यासाठी खासदार शेट्टीच सक्षम आहेत. सर्व डावपेच फोल ठरल्याने आता भाजप सरकार जवानांच्या नावावर मते मागत आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य विचार करून या आतंकवादी सरकारला हद्दपार करावे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या शेट्टींना प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवा.’
खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘विकासाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वांना मूर्ख बनविले आहे. काही तरी चांगले होईल म्हणून त्यांच्यासोबत गेलो, पण नंतर त्यांचे खरे रूप समजले. वारणा पाणीप्रश्नी निर्माण झालेला वाद समन्वयाने निश्चितपणे सोडविला जाईल. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने शेट्टी धोक्यात आल्याची अफवा पसरविली जात आहे. परंतु गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य दिलेल्या शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघासह आता वाळवा, शिराळा आणि शिरोळ मतदारसंघांतही मताधिक्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.’
‘सर्व डावपेच फोल ठरल्याने आता भाजप सरकार जवानांच्या नावावर मते मागत आहे. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान म्हणून विराजमान असलेले नरेंद्र मोदी आज चौकीदार बनले आहेत. दहा ते १५ हजार रुपयांच्या पगारात चौकीदार मिळू शकतो. मात्र, देशाला चौकीदाराची नव्हे, सक्षम नेतृत्वाची गरज आहे,’ असे प्रतिपादन दाक्षिणात्य अभिनेते प्रकाशराज यांनी केले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ तांबेमाळ येथील मराठा मंडळ सांस्कृतिक भवनात इचलकरंजी व हातकणंगले विधानसभा मतदारसंघांतील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा मेळावा झाला, त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
प्रकाशराज म्हणाले, ‘आज एक अभिनेता म्हणून ज्या शिखरावर पोहोचलो त्याचे सर्व श्रेय तुम्हा सर्वांचे आहे. तुमच्या प्रश्नांसाठीच मला आज रस्त्यावर उतरावे लागले. सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून त्यासाठी संसदेत आवाज उठविणाऱ्या नेतृत्वाची गरज असून त्यासाठी खासदार शेट्टीच सक्षम आहेत. सर्व डावपेच फोल ठरल्याने आता भाजप सरकार जवानांच्या नावावर मते मागत आहे. त्यामुळे सर्वांनी योग्य विचार करून या आतंकवादी सरकारला हद्दपार करावे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेल्या शेट्टींना प्रतिनिधी म्हणून संसदेत पाठवा.’
खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘विकासाच्या नावाखाली मोदी सरकारने सर्वांना मूर्ख बनविले आहे. काही तरी चांगले होईल म्हणून त्यांच्यासोबत गेलो, पण नंतर त्यांचे खरे रूप समजले. वारणा पाणीप्रश्नी निर्माण झालेला वाद समन्वयाने निश्चितपणे सोडविला जाईल. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याने शेट्टी धोक्यात आल्याची अफवा पसरविली जात आहे. परंतु गेल्या निवडणुकीत सर्वाधिक मताधिक्य दिलेल्या शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघासह आता वाळवा, शिराळा आणि शिरोळ मतदारसंघांतही मताधिक्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.’