अ‍ॅपशहर

कोल्हापुरात धावत्या बसला आग; दोघांचा मृत्यू

गोव्यावरून कोल्हापूर-पुणे मार्गे मुंबईला निघालेल्या आत्माराम ट्रॅव्हल्सच्या बसला आज पहाटे अचानक आग लागली. या दुर्घटनेत बसमधील दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. उरलेल्या १६ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

Maharashtra Times 24 Nov 2017, 10:22 am
मटा ऑनलाइन वृत्त । कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम private bus catches fire on kolhapur pune road two dead
कोल्हापुरात धावत्या बसला आग; दोघांचा मृत्यू


गोव्यावरून कोल्हापूर-पुणे मार्गे मुंबईला निघालेल्या आत्माराम ट्रॅव्हल्सच्या बसला आज पहाटे अचानक आग लागली. या दुर्घटनेत बसमधील दोन प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. उरलेल्या १६ प्रवाशांना वाचवण्यात यश आलं आहे.

गगनबावडा मार्गावरील लोंघे गावाच्या हद्दीत पहाटे साडेतीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली. ही आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच बसचा अक्षरश: कोळसा झाला. आगीत दोन प्रवासी ९० टक्के भाजल्यानं त्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बंटी भट आणि विकी भट यांचा समावेश असून हे दोघेही पुण्याचे आहेत. शवविच्छेदनासाठी त्यांचे मृतदेह सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

एसीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ही आग लागल्याचं प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे. आग लागल्याचं बस चालकाच्या लक्षात येताच त्यानं प्रवाशांना ओढून बाहेर काढलं. बाहेर पडताना अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले. या प्रवाशांची व्यवस्था कळे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कळे पोलीस पुढील तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज