म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘बोगस शेतकरी दाखवून व्यापाऱ्यांनी ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत तूर खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केला. हतबल तूर उत्पादकांची लूट केली. त्यासंबंधीचे पुरावे आमच्याकडे आहेत. सरकारने त्याची तातडीने चौकशी करावी, शेतकऱ्यांची तूर चांगल्या दराने खरेदी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिला.
अलिकडे खासदार शेट्टी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात ४ मे रोजी भव्य मोर्चा काढण्यासाठी ते जिल्ह्यात जागृती करीत आहेत. सोमवारी तूर घोटाळ्याचे नवे प्रकरण बाहेर काढल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘नाफेड (नॅशनल अॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह फेडरेशन) शेतकऱ्यांना हमीभाव देऊन तूर खरेदी करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. बोगस शेतकरी दाखवून व्यापारी आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केले. तूर उत्पादकांना त्यांनी गाठले. व्यापाऱ्यांनी प्रती क्विंटल ३८०० ते ४००० रूपयांनी गेल्या दोन ते तीन महिन्यात तब्बल ३५ लाख क्विंटल तूर खरेदी केली. साठा केला. ती तूर आता बाजारात प्रती क्विंटल ५ हजारांनी विकली जात आहे. तुरीचे दर पडले. उत्पादकांकडून तूर खरेदी घटली. उत्पादक शेतकरी अडचणी आला. त्यामुळे सरकारने त्वरित व्यापाऱ्यांकडे तूर आली कुठून, खरेदी कुणाकडून आणि कशी केली, विकत आहेत कुठे याची चौकशी करावी. त्यांच्या गोडावूनवर धाडी टाकाव्यात. घोटाळ्यात सहभागी नाफेड अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात. दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई करावी.’
घोटाळा असा....
व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे सातबारा जोडून तूर खरेदी केली. त्या सातबारावर तुरीची नोंद नाही. यावरून व्यापाऱ्यांनी बोगसगिरी केल्याचे स्पष्ट होते. नाफेडचे अधिकारीही त्यात सहभागी आहेत. पुरावे आमच्याकडे आहेत. ते संबंधित यंत्रणेकडे देण्यात येईल, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.
‘बोगस शेतकरी दाखवून व्यापाऱ्यांनी ‘नाफेड’च्या अधिकाऱ्यांना हाताशी धरत तूर खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा केला. हतबल तूर उत्पादकांची लूट केली. त्यासंबंधीचे पुरावे आमच्याकडे आहेत. सरकारने त्याची तातडीने चौकशी करावी, शेतकऱ्यांची तूर चांगल्या दराने खरेदी करावी, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना दिला.
अलिकडे खासदार शेट्टी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापुरात ४ मे रोजी भव्य मोर्चा काढण्यासाठी ते जिल्ह्यात जागृती करीत आहेत. सोमवारी तूर घोटाळ्याचे नवे प्रकरण बाहेर काढल्याने सरकारला घरचा आहेर मिळाला.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘नाफेड (नॅशनल अॅग्रीकल्चरल को-ऑपरेटिव्ह फेडरेशन) शेतकऱ्यांना हमीभाव देऊन तूर खरेदी करणे आवश्यक होते. मात्र त्यांनी तसे केले नाही. बोगस शेतकरी दाखवून व्यापारी आणि नाफेडच्या अधिकाऱ्यांनी संगनमत केले. तूर उत्पादकांना त्यांनी गाठले. व्यापाऱ्यांनी प्रती क्विंटल ३८०० ते ४००० रूपयांनी गेल्या दोन ते तीन महिन्यात तब्बल ३५ लाख क्विंटल तूर खरेदी केली. साठा केला. ती तूर आता बाजारात प्रती क्विंटल ५ हजारांनी विकली जात आहे. तुरीचे दर पडले. उत्पादकांकडून तूर खरेदी घटली. उत्पादक शेतकरी अडचणी आला. त्यामुळे सरकारने त्वरित व्यापाऱ्यांकडे तूर आली कुठून, खरेदी कुणाकडून आणि कशी केली, विकत आहेत कुठे याची चौकशी करावी. त्यांच्या गोडावूनवर धाडी टाकाव्यात. घोटाळ्यात सहभागी नाफेड अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळाव्यात. दोषी व्यापाऱ्यांवर कारवाई करावी.’
घोटाळा असा....
व्यापाऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांचे सातबारा जोडून तूर खरेदी केली. त्या सातबारावर तुरीची नोंद नाही. यावरून व्यापाऱ्यांनी बोगसगिरी केल्याचे स्पष्ट होते. नाफेडचे अधिकारीही त्यात सहभागी आहेत. पुरावे आमच्याकडे आहेत. ते संबंधित यंत्रणेकडे देण्यात येईल, असे खासदार शेट्टी यांनी सांगितले.