म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
‘भाजपमध्ये राबणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यामुळे तयार कार्यकर्त्यांवर त्यांचा डोळा असतो. कार्यकर्ते तयार करण्यास खूप वेळ लागलो. भाजपला इतरांच्या घरात डोकावण्याची सवय आहे, त्यामुळे ते कार्यकर्ते फोडण्याच्या भानगडी करतात’, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी लगावला. पक्षाचे नेते, राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबद्दल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न खासदार शेट्टी यांनी केला. शेट्टी म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांची गोफण संघटनेचे लचके तोडणाऱ्यांसाठी आहे. संघटनेचे नुकसान करण्यासाठी नाही. आम्ही दोघे गेली २० वर्षे चांगले मित्र आहोत. राजकारणात तात्विक भूमिका वेगळ्या असू शकतात. काही मुद्यांवरून मतभेद झाले असले तरीही मनभेद नाहीत. वैयक्तिक दुरावा नव्हताच. आजही नाही. मतमतांतरे हे चळवळीच्या जीवंतपणाचे लक्षण आहे. पक्षप्रमुख म्हणून माझी वक्तव्ये तत्कालिन संदर्भांवर अवलंबून होती.’ ‘दोन्ही नेत्यांमधील विसंवादाला भाजपचे नेते कारणीभूत होते का?’ या प्रश्नावर खासदार शेट्टी यांनी भाजपवर टोलेबाजीची संधी सोडली नाही. ते म्हणाले, ‘भाजप विस्तारवादी पक्ष आहे. त्यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते नसल्याने ते इतरांच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवतात. त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावायची सवय आहे.’
सांगली, कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणाला मदत करणार यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. पंचायत समित्यांमधील आघाड्या, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
झेडपीसाठी दोन्हीकडून संपर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. कॉँग्रेस-भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. भाजप आणि कॉँगेसच्या स्थानिक नेत्यांनी संपर्क साधला आहे. मात्र कार्यकर्त्यांशी चर्चेने कोणासोबत राहायचे याचा निर्णय घेऊ. सांगलीतील रयत विकास आघाडी आणि स्वाभिमानीचा निर्णयही चर्चेने होईल, असे खासदार शेट्टी म्हणाले.
‘भाजपमध्ये राबणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यामुळे तयार कार्यकर्त्यांवर त्यांचा डोळा असतो. कार्यकर्ते तयार करण्यास खूप वेळ लागलो. भाजपला इतरांच्या घरात डोकावण्याची सवय आहे, त्यामुळे ते कार्यकर्ते फोडण्याच्या भानगडी करतात’, असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी लगावला. पक्षाचे नेते, राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेबद्दल कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी आणि मंत्री सदाभाऊ खोत यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न खासदार शेट्टी यांनी केला. शेट्टी म्हणाले, ‘सदाभाऊ खोत यांची गोफण संघटनेचे लचके तोडणाऱ्यांसाठी आहे. संघटनेचे नुकसान करण्यासाठी नाही. आम्ही दोघे गेली २० वर्षे चांगले मित्र आहोत. राजकारणात तात्विक भूमिका वेगळ्या असू शकतात. काही मुद्यांवरून मतभेद झाले असले तरीही मनभेद नाहीत. वैयक्तिक दुरावा नव्हताच. आजही नाही. मतमतांतरे हे चळवळीच्या जीवंतपणाचे लक्षण आहे. पक्षप्रमुख म्हणून माझी वक्तव्ये तत्कालिन संदर्भांवर अवलंबून होती.’ ‘दोन्ही नेत्यांमधील विसंवादाला भाजपचे नेते कारणीभूत होते का?’ या प्रश्नावर खासदार शेट्टी यांनी भाजपवर टोलेबाजीची संधी सोडली नाही. ते म्हणाले, ‘भाजप विस्तारवादी पक्ष आहे. त्यांच्याकडे स्वतःचे कार्यकर्ते नसल्याने ते इतरांच्या कार्यकर्त्यांना आमिष दाखवतात. त्यांना दुसऱ्यांच्या घरात डोकावायची सवय आहे.’
सांगली, कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणाला मदत करणार यावर भाष्य करणे त्यांनी टाळले. पंचायत समित्यांमधील आघाड्या, कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ असे ते म्हणाले.
झेडपीसाठी दोन्हीकडून संपर्क
कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोणत्याच पक्षाला बहुमत नाही. कॉँग्रेस-भाजपकडूनही सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू आहे. भाजप आणि कॉँगेसच्या स्थानिक नेत्यांनी संपर्क साधला आहे. मात्र कार्यकर्त्यांशी चर्चेने कोणासोबत राहायचे याचा निर्णय घेऊ. सांगलीतील रयत विकास आघाडी आणि स्वाभिमानीचा निर्णयही चर्चेने होईल, असे खासदार शेट्टी म्हणाले.