म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
'कृषिपंपाचे वीजदर कमी करण्यासाठी इरिगेशन फेडरेशन व शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात महामार्ग रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. प्रश्न सोडवायचा नसेल तर मध्यस्थी कशाला करायची? अशी बिनकामाची पाटीलकी हवीच कशाला?,' असा उपरोधिक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत पालकमंत्री पाटील यांना लगावला.
कृषिपंपाच्या वीजदरासंदर्भात एक जुलैला महावितरण कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, 'ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषिपंपाच्या वीजदरप्रश्नी जानेवारीत महामार्ग रोको आंदोलन केले, पण आंदोलन होऊ नये, म्हणून पालकमंत्री पाटील यांनी प्रयत्न केले. त्यासाठी मध्यस्थी करून आश्वासनही दिले. मात्र, ते त्यांना पूर्ण करता येत नसेल तर फुकटची पाटीलकी केलीच कशाला?. मध्यस्थी केल्यानंतर वीजबिलात दुरुस्ती करून द्यावी. सर्व वीजबिले प्रति युनिट एक रुपये १६ पैशांनी द्यावीत. याच मागणीसाठी आम्ही एक जुलैला दसरा चौकातून महावितरणवर मोर्चा काढून ताकद दाखवू. अनेक साखर कारखान्यांनी को-जनरेशन प्रकल्प उभारला. या प्रकल्पातून वीज खरेदी करण्यासाठी महावितरणने करारही केला. कारखान्यांकडून वीज खरेदी कमी दराने करत विक्री मात्र जादा दराने केली जात आहे.'
ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, 'विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ असल्याने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तरीही कृषिपंपाची बिले कशी आली? सरकारचे अपयश झाकण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. जिल्हानिहाय थकबाकी जाहीर केल्यास महावितरण कंपनीची पोलखोल होईल.'
वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, 'कृषी संजीवनी योजनेतील लाभ होण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पाच हजार कृषिपंपधारकांनी अर्ज केले. त्यापैकी ३,२८१ ग्राहकांना लाभ होऊन चार कोटी ८५ लाखांची थकबाकी जमा झाल्याचे महावितरणने दाखवले. प्रत्यक्षात दोन कोटींची थकबाकी जमा झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले. युनिट दुप्पट दाखवून महावितरण कंपनी सरकारचे अनुदान लाटत आहे. त्यात सरकार, महावितरण व आयोगाची मिलभगत आहे.'
पत्रकार बैठकीस अरुण लाड, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील, भगवान काटे यांच्यासह इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
००००
प्रमुख मागण्या..
कृषिपंपाला त्वरित वीजपुरवठा करा
वीज दरवाढ मागे घ्या
कृषिपंपाचा दर प्रतियुनिट एक रुपये करा
कृषिपंप वीज बिलांची दुरुस्ती करा
कृषिपंपाला दिवसा १२ तास वीजपुरवठा करा
ग्रामपंचायतींचे स्ट्रीट लाइट विनाअट बसवा
शार्टसर्किटने नुकसान झालेल्या उसाची नुकसानभरपाई द्या
००००
'कृषिपंपाचे वीजदर कमी करण्यासाठी इरिगेशन फेडरेशन व शेतकऱ्यांनी जानेवारी महिन्यात महामार्ग रोको आंदोलन केले. आंदोलनादरम्यान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून १५ दिवसांत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. मात्र, त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. प्रश्न सोडवायचा नसेल तर मध्यस्थी कशाला करायची? अशी बिनकामाची पाटीलकी हवीच कशाला?,' असा उपरोधिक टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत पालकमंत्री पाटील यांना लगावला.
कृषिपंपाच्या वीजदरासंदर्भात एक जुलैला महावितरण कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते. शेट्टी म्हणाले, 'ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली कृषिपंपाच्या वीजदरप्रश्नी जानेवारीत महामार्ग रोको आंदोलन केले, पण आंदोलन होऊ नये, म्हणून पालकमंत्री पाटील यांनी प्रयत्न केले. त्यासाठी मध्यस्थी करून आश्वासनही दिले. मात्र, ते त्यांना पूर्ण करता येत नसेल तर फुकटची पाटीलकी केलीच कशाला?. मध्यस्थी केल्यानंतर वीजबिलात दुरुस्ती करून द्यावी. सर्व वीजबिले प्रति युनिट एक रुपये १६ पैशांनी द्यावीत. याच मागणीसाठी आम्ही एक जुलैला दसरा चौकातून महावितरणवर मोर्चा काढून ताकद दाखवू. अनेक साखर कारखान्यांनी को-जनरेशन प्रकल्प उभारला. या प्रकल्पातून वीज खरेदी करण्यासाठी महावितरणने करारही केला. कारखान्यांकडून वीज खरेदी कमी दराने करत विक्री मात्र जादा दराने केली जात आहे.'
ज्येष्ठ नेते डॉ. एन. डी. पाटील म्हणाले, 'विदर्भ, मराठवाड्यात दुष्काळ असल्याने टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जात आहे. तरीही कृषिपंपाची बिले कशी आली? सरकारचे अपयश झाकण्यासाठी ते शेतकऱ्यांच्या माथी मारले जात आहे. जिल्हानिहाय थकबाकी जाहीर केल्यास महावितरण कंपनीची पोलखोल होईल.'
वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे म्हणाले, 'कृषी संजीवनी योजनेतील लाभ होण्यासाठी कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पाच हजार कृषिपंपधारकांनी अर्ज केले. त्यापैकी ३,२८१ ग्राहकांना लाभ होऊन चार कोटी ८५ लाखांची थकबाकी जमा झाल्याचे महावितरणने दाखवले. प्रत्यक्षात दोन कोटींची थकबाकी जमा झाल्याचे माहिती अधिकारात स्पष्ट झाले. युनिट दुप्पट दाखवून महावितरण कंपनी सरकारचे अनुदान लाटत आहे. त्यात सरकार, महावितरण व आयोगाची मिलभगत आहे.'
पत्रकार बैठकीस अरुण लाड, बाबासाहेब पाटील-भुयेकर, आर. जी. तांबे, विक्रांत पाटील, भगवान काटे यांच्यासह इरिगेशन फेडरेशनचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
००००
प्रमुख मागण्या..
कृषिपंपाला त्वरित वीजपुरवठा करा
वीज दरवाढ मागे घ्या
कृषिपंपाचा दर प्रतियुनिट एक रुपये करा
कृषिपंप वीज बिलांची दुरुस्ती करा
कृषिपंपाला दिवसा १२ तास वीजपुरवठा करा
ग्रामपंचायतींचे स्ट्रीट लाइट विनाअट बसवा
शार्टसर्किटने नुकसान झालेल्या उसाची नुकसानभरपाई द्या
००००