अ‍ॅपशहर

कामगारांचा विमा दोन लाखांवर

कोल्हापूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांना अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. त्यामध्ये बदल करून बांधकाम कामगाराचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू कल्याणकारी मंडळांकडून दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य वारसांना देण्यात येणार आहे. तसेच वर्षाला २४ हजार रुपये प्रमाणे पाच वर्षे पेन्शन देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्याबाबतचे आदेश कल्याणकारी मंडळाने राज्यातील सर्व जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयाने सोमवारी (ता.४) दिले आहेत. राज्य सरकारच्या नव्या मंजुरीमुळे राज्यातील नोंदणीकृत पाच लाख तर जिल्ह्यातील ६२ हजार पात्र कामगारांच्या वारसांना होणार आहे.

Maharashtra Times 10 Sep 2017, 3:00 am
Maruti.Patil@timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम real estate workers compensation insurance upgrade
कामगारांचा विमा दोन लाखांवर


Tweet : @MarutipatilMT

कोल्हापूर : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी असलेल्या कामगारांना अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात होते. त्यामध्ये बदल करून बांधकाम कामगाराचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू कल्याणकारी मंडळांकडून दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य वारसांना देण्यात येणार आहे. तसेच वर्षाला २४ हजार रुपये प्रमाणे पाच वर्षे पेन्शन देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून त्याबाबतचे आदेश कल्याणकारी मंडळाने राज्यातील सर्व जिल्हा कामगार आयुक्त कार्यालयाने सोमवारी (ता.४) दिले आहेत. राज्य सरकारच्या नव्या मंजुरीमुळे राज्यातील नोंदणीकृत पाच लाख तर जिल्ह्यातील ६२ हजार पात्र कामगारांच्या वारसांना होणार आहे.

गवंडी, सेंट्रिंग, सुतार, फरशी पॉलिश, वायरमन, वेल्डर आदी १८ प्रकारच्या कामगारांचा बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये समावेश आहे. अत्यंत जोखमीच्या ठिकाणी काम करावे लागत असल्याने अनेकवेळा त्यांचे जीव धोक्यात येतात. काही कामगारांचा अशा जोखमीच्या कामावर मृत्यूही झाला आहे. कामगारांच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात आर्थिक कुचंबणा होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने १३ कलमी योजना आणली होती. कामगारांच्या कल्याणकारी योजनामध्ये कामावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास एक लाख रुपये त्यांच्या वारसांना देण्याची तरतूद होती. सदरची रक्कम फारच तुटपुंजी असल्याने यामध्ये वाढ करण्याची मागणी राज्यातील कामगार संघटनांकडून होत होती. नैसर्गिक व अपघातील मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांचे अर्थसहाय्य वारसांना देण्याची मागणी केली होती.

संघटनांच्या मागणीनंतर कल्याणकारी मंडळाच्या सप्टेंबर २०१६ रोजी झालेल्या बैठकीत दोन्ही प्रकारच्या मृत्यूसाठी कामगारांच्या वारसांना दोन लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा ठराव करून २१ ऑक्टोबर, २०१६ रोजी राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला. त्यानंतर सातत्याने पाठपुरवा करूनही या प्रस्तावावर कोणताही सकारात्मक निर्णय झाला नव्हता. मात्र नुकत्याच्या झालेल्या राज्य मंत्र‌िमंडळाच्या बैठकीत कल्याणकारी मंडळाच्या प्रस्तावाला मान्यता दिली. राज्य सरकारच्या मान्यतेनंतर राज्य कामगार आयुक्त वाय. ई. केरुरे यांनी प्रस्तावावर त्वरित अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्यातील सर्व कामगार आयुक्तांना दिले आहेत.

असा होणार लाभ

कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व नोंदणीकृत कामगारांचा नैसर्गिक अथ‍वा अपघातील मृत्यू झाल्यास मंडळाच्यावतीने त्यांच्या वारसांना दोन लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येईल. तसेच वर्षाला २४ हजार रुपयेप्रमाणे पाच वर्षे वारसांना सानुग्राह अनुदान म्हणून पेन्शन देण्यात येणार आहे. तसेच कामगाराच्या अंत्यसंस्कारासाठी दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.


पाच लाख

राज्यातील नोंदणीकृत कामगार

६२ हजार

जिल्ह्यातील नोंदणीकृत कामगार

५६ हजार

कोल्हापूर जिल्हा

सहा हजार

इचलकरंजी शहर

कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगारांचा अपघाती मृत्यू झाल्यास वारसांना केवळ एक लाखांचे अर्थसहाय्य दिले जाते होते. संघटनांनी गेल्या अनेकवर्षांपासून नैसर्गिक व अपघाती मृत्यूसाठी वारसांना पाच लाख रुपये देण्याची मागणी केली होती. त्यानुसार कल्याणकारी मंडळाने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला होता. संघटनांच्या मागणीचा विचार करुन दोन्ही प्रकारच्या मृत्यूसाठी दोन लाख रुपये देण्यास राज्य सरकराने मंजुरी दिली.

शिवाजी मगदूम

जिल्हा सचिव, लाल बावटा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज