कोल्हापूर टाइम्स टीम
सार्वजनिक गणेशोत्सवादिवशी पंचगंगा नदी प्रदूषण होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासन सज्ज झाले आहे. निर्माल्य, गणपती दान करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी काठावरील गावातील ग्रामसेवकांना हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यक त्या ठिकाणी काहिली ठेवण्यात येणार आहेत.
घरगुती गणेश विसर्जना दिवशी निर्माल्य, मूर्ती विसर्जनासाठी ४७२ खणींची आणि ७४६ काहिली ठेवण्यात आल्या होत्या. ग्रामीण भागात सार्वजनिक गणपतीची संख्या कमी असते. त्यामुळे अनंत चतुर्दशी दिवशी ज्या ठिकाणी सावर्जनिक गणेश मूर्तीची संख्या अधिक आहेत, त्याच ठिकाणी काहिली ठेवण्यात येणार आहे. निर्माल्य संकलित करण्यासाठी ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पंचगंगा नदीत मोठे मूर्ती विसर्जन होऊ नये, यासाठी लोकसहभागातून प्रशासन प्रयत्न करीत आहे.