कोल्हापूर
‘पोलिस हा देखील माणूस आहे, तो चोवीस तास कार्यरत असतो. सैनिकांना ज्या प्रमाणे सन्मान मिळतो तसा सन्मान पोलिसांनाही मिळाला पाहिजे. आयुष्यभर सेवा करणाऱ्या निवृत्त पोलिसांचे घर आणि आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असून निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविमा ही योजना राबविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल’, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलिस महासंचालक डी.एन.जाधव, कार्याध्यक्ष निवृत्त अप्पर पोलिस महासंचालक खंडेराव शिंदे, असोसिएशनचे अन्य पदाधिकारी रामराव वाघ, गुलाबराव पोळ, पी.टी.लोहार, सीताराम न्यायनिर्गुने, सुखानंद सापते, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंखे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘पोलिस हा समाज व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. पोलिस दलासाठी पायाभूत सेवा सुविधा आणि साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्याबरोबरच पोलिसांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर पोलिस वसाहतीतील पोलीसांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन ही घरे अद्ययावत करण्यात आली आहेत. तसेच पोलीसांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र कार्यान्वित केले आहे.’
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलिस महासंचालक डी.एन.जाधव म्हणाले, ‘पोलिसांनी आपल्या चांगल्या वागण्यातून नवी संस्कृती निर्माण करणे गरजेचे आहे. समाजात पोलिसांविषयी आदर आणि आपुलकी निर्माण होईल यादृष्टीने वाचन, लेखन यासह चांगल्या वागण्याची सवय जोपासावी.’
जिल्हा अध्यक्ष मदन चव्हाण यांनी स्वागत केले. महासचिव सुखानंद सापने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सीताराम न्यायनिर्गुने, सचिन कुंभार आदींचे भाषणे झाली. पंढरीनाथ मांढरे यांनी आभार मानले
‘पोलिस हा देखील माणूस आहे, तो चोवीस तास कार्यरत असतो. सैनिकांना ज्या प्रमाणे सन्मान मिळतो तसा सन्मान पोलिसांनाही मिळाला पाहिजे. आयुष्यभर सेवा करणाऱ्या निवृत्त पोलिसांचे घर आणि आरोग्याचा प्रश्न महत्वाचा असून निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्यविमा ही योजना राबविण्यासाठी पाठपुरावा केला जाईल’, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोसिएशनच्या मेळाव्याच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. खासदार संभाजीराजे छत्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलिस महासंचालक डी.एन.जाधव, कार्याध्यक्ष निवृत्त अप्पर पोलिस महासंचालक खंडेराव शिंदे, असोसिएशनचे अन्य पदाधिकारी रामराव वाघ, गुलाबराव पोळ, पी.टी.लोहार, सीताराम न्यायनिर्गुने, सुखानंद सापते, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अभयकुमार साळुंखे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘पोलिस हा समाज व्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे. पोलिस दलासाठी पायाभूत सेवा सुविधा आणि साधन सामुग्री उपलब्ध करुन देण्याबरोबरच पोलिसांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यास सरकारने प्राधान्य दिले आहे. कोल्हापूर पोलिस वसाहतीतील पोलीसांच्या घरांच्या दुरुस्तीसाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन ही घरे अद्ययावत करण्यात आली आहेत. तसेच पोलीसांच्या मुला-मुलींसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र कार्यान्वित केले आहे.’
खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी निवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रश्नांच्या सोडविणुकीसाठी सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. असोसिएशनचे राज्य अध्यक्ष निवृत्त पोलिस महासंचालक डी.एन.जाधव म्हणाले, ‘पोलिसांनी आपल्या चांगल्या वागण्यातून नवी संस्कृती निर्माण करणे गरजेचे आहे. समाजात पोलिसांविषयी आदर आणि आपुलकी निर्माण होईल यादृष्टीने वाचन, लेखन यासह चांगल्या वागण्याची सवय जोपासावी.’
जिल्हा अध्यक्ष मदन चव्हाण यांनी स्वागत केले. महासचिव सुखानंद सापने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सीताराम न्यायनिर्गुने, सचिन कुंभार आदींचे भाषणे झाली. पंढरीनाथ मांढरे यांनी आभार मानले