म. टा. प्रतिनिधी, सांगली
सांगली पोलिसांच्या ताब्यातील दोघे संशयित पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाला समजल्यानंतर रात्री दोन वाजता नाकेबंदी करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे पोलिस ठाण्यात आल्या. पहाटेपर्यंत त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर सकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी कामटे यांनी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांनी पलायन केल्याची नोंद केली.
या नोंदीनंतर मात्र कामटे यांचा मोबाइलवर संपर्क होत नसून मोबाइल बंद असल्याची नोंद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक चव्हाण यांनी घेतली आहे. दुपारपर्यंत पोलिस ठाण्याच्या आवारात फारशी वर्दळ नव्हती. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने बघत होता. पलायन प्रकरणाचा तपास करणारे उपनिरीक्षक रोहित चौधरी हेही अद्याप त्या दोघांचा शोध सुरु असल्याचे सांगून नेमके काय झाले, हे समजत नसल्याचे सांगत होते.
शहर पोलिस ठाण्यातून भावाने पलायन केल्याची माहिती तिसऱ्याकडून समजल्याने अनिकेत कोथळेचे नातेवाईक धावत आले. त्यांनाही नेमके काय झाले आहे, हे कुणी सांगेना. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तोपर्यंत चर्चेतून पोलिसांच्या मारहाणीने काहीतरी विपरित घडल्याचे नातेवाईकांच्या कानावर पडले. त्यानंतर मोठा जमाव पोलिस ठाण्यात एकत्र आला. युवक काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांच्यासह अनेकांनी रस्ता रोको केला. नातेवाईकांनीही ‘आम्हाला सीसीटीव्हीमध्ये दाखवा, आमचा माणूस कसा पळून गेला, तो सुखरुप असल्याची खात्री होऊ द्या, मग आम्ही घरी जातो,’ असा आग्रह धरुन ठिय्या मारला. अनिकेतच्या नातेवाईकांचा एकसारखा आक्रोश सुरु होता.
शहर पोलिस ठाण्यात काहीतरी गंभीर घडल्याची माहिती मिळताच आमदार सुधीर गाडगीळ पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीवर त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी संपर्क साधला. तुमऱ्या अधिकाऱ्यांचा खुलासा लहान मुलांनाही पटण्यासारखा नाही. याची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना देत आहोत. उद्या बारापर्यंत संबंधित तरुणांना हजर करा. ते कसे पळून गेले आहेत, याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवा, अन्यथा संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशा शब्दांत गाडगीळ यांनी पोलिस अधीक्षकांना सुनावले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम म्हणाले की, ठाण्यात चौकशी सुरु असताना अनिकेत अचानक गायब झाला आहे. तो सुरक्षित असल्याची हमी त्यांना हवी आहे. त्यासाठी तंत्रज्ञाला बोलवून सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर पलायन झाल्याच्या वेळेपूर्वीपासून सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसत आहे. हे अतिशय गंभीर आहे. घटनेच्या काहीकाळ आगोदरपासून कॅमेरा बंद असल्याने शंकेला वाव आहे. संबंधित पथकही गायब आहे. यात जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानिरिक्षक यांनी लक्ष घालून नातेवाईकांना न्याय द्यावा.
सीसीटीव्ही बंद, शोधासाठी पथके
पत्रकारांशी बोलताना डॉ. काळे म्हणाल्या, ‘मध्यवर्ती बसस्थानकावरील एका प्रवाशाला लुटण्याची घटना घडली होती. त्यात अटक केलेल्या दोघांकडे उपनिरीक्षक कामटे चौकशी करत होते. त्यावेळी दोघांही संशयितांनी पळ काढला आहे. आपण स्वतः पोलिस ठाण्यात येऊन त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाण्यातील सीसीटिव्हीचा डिस्प्ले १२ वाजता बंद होता. याची चौकशी केली असता काहीवेळापूर्वी कॅमेरे बंद पडल्याचे सांगण्यात आले. संशयित पळाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. त्यांच्या शोधासाठी पथके पाठविली. त्या दोघांपैकी अमोल भंडारे याला आपण निपाणीत ताब्यात घेतल्याचे कामटे यांनी कळविले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे फोन बंद नव्हते. भंडारेला सांगलीत आणले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.’
सांगली पोलिसांच्या ताब्यातील दोघे संशयित पळून गेल्याची माहिती नियंत्रण कक्षाला समजल्यानंतर रात्री दोन वाजता नाकेबंदी करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक डॉ. दीपाली काळे पोलिस ठाण्यात आल्या. पहाटेपर्यंत त्या ठिकाणी होत्या. त्यानंतर सकाळी ७ वाजून ३३ मिनिटांनी कामटे यांनी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांनी पलायन केल्याची नोंद केली.
या नोंदीनंतर मात्र कामटे यांचा मोबाइलवर संपर्क होत नसून मोबाइल बंद असल्याची नोंद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक चव्हाण यांनी घेतली आहे. दुपारपर्यंत पोलिस ठाण्याच्या आवारात फारशी वर्दळ नव्हती. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने बघत होता. पलायन प्रकरणाचा तपास करणारे उपनिरीक्षक रोहित चौधरी हेही अद्याप त्या दोघांचा शोध सुरु असल्याचे सांगून नेमके काय झाले, हे समजत नसल्याचे सांगत होते.
शहर पोलिस ठाण्यातून भावाने पलायन केल्याची माहिती तिसऱ्याकडून समजल्याने अनिकेत कोथळेचे नातेवाईक धावत आले. त्यांनाही नेमके काय झाले आहे, हे कुणी सांगेना. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तोपर्यंत चर्चेतून पोलिसांच्या मारहाणीने काहीतरी विपरित घडल्याचे नातेवाईकांच्या कानावर पडले. त्यानंतर मोठा जमाव पोलिस ठाण्यात एकत्र आला. युवक काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांच्यासह अनेकांनी रस्ता रोको केला. नातेवाईकांनीही ‘आम्हाला सीसीटीव्हीमध्ये दाखवा, आमचा माणूस कसा पळून गेला, तो सुखरुप असल्याची खात्री होऊ द्या, मग आम्ही घरी जातो,’ असा आग्रह धरुन ठिय्या मारला. अनिकेतच्या नातेवाईकांचा एकसारखा आक्रोश सुरु होता.
शहर पोलिस ठाण्यात काहीतरी गंभीर घडल्याची माहिती मिळताच आमदार सुधीर गाडगीळ पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीवर त्यांचे समाधान झाले नाही. त्यांनी तत्काळ जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्याशी संपर्क साधला. तुमऱ्या अधिकाऱ्यांचा खुलासा लहान मुलांनाही पटण्यासारखा नाही. याची माहिती आपण मुख्यमंत्र्यांना देत आहोत. उद्या बारापर्यंत संबंधित तरुणांना हजर करा. ते कसे पळून गेले आहेत, याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवा, अन्यथा संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, अशा शब्दांत गाडगीळ यांनी पोलिस अधीक्षकांना सुनावले.
युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत कदम म्हणाले की, ठाण्यात चौकशी सुरु असताना अनिकेत अचानक गायब झाला आहे. तो सुरक्षित असल्याची हमी त्यांना हवी आहे. त्यासाठी तंत्रज्ञाला बोलवून सीसीटीव्ही फुटेज पाहिले तर पलायन झाल्याच्या वेळेपूर्वीपासून सीसीटीव्ही बंद असल्याचे दिसत आहे. हे अतिशय गंभीर आहे. घटनेच्या काहीकाळ आगोदरपासून कॅमेरा बंद असल्याने शंकेला वाव आहे. संबंधित पथकही गायब आहे. यात जिल्हा पोलिस अधीक्षक, विशेष पोलिस महानिरिक्षक यांनी लक्ष घालून नातेवाईकांना न्याय द्यावा.
सीसीटीव्ही बंद, शोधासाठी पथके
पत्रकारांशी बोलताना डॉ. काळे म्हणाल्या, ‘मध्यवर्ती बसस्थानकावरील एका प्रवाशाला लुटण्याची घटना घडली होती. त्यात अटक केलेल्या दोघांकडे उपनिरीक्षक कामटे चौकशी करत होते. त्यावेळी दोघांही संशयितांनी पळ काढला आहे. आपण स्वतः पोलिस ठाण्यात येऊन त्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस ठाण्यातील सीसीटिव्हीचा डिस्प्ले १२ वाजता बंद होता. याची चौकशी केली असता काहीवेळापूर्वी कॅमेरे बंद पडल्याचे सांगण्यात आले. संशयित पळाल्याची माहिती नियंत्रण कक्षाला कळविण्यात आली. त्यांच्या शोधासाठी पथके पाठविली. त्या दोघांपैकी अमोल भंडारे याला आपण निपाणीत ताब्यात घेतल्याचे कामटे यांनी कळविले आहे. पोलिस अधिकाऱ्यांचे फोन बंद नव्हते. भंडारेला सांगलीत आणले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.’