संघर्ष यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यास प्रारंभ
कोल्हापूर टाइम्स टीम
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांसह अन्य पक्षांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा मंगळवारी कोल्हापुरात सुरू झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कोणत्याही परिस्थिती सरकारने शेतक ऱ्यांचा सातबारा कोर केलाच पाहिजे, अशी मागणी यावेही करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळाला वंदन तसेच करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन या यात्रेचा प्रारंभ झाला.
संघर्ष यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील, आमदार सुनील केदार, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार विद्या चव्हाण, प्रकाश गजभिये, माजी खासदार निवेदिता माने, महापौर हसीना फरास, नांदेडचे वसंत चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे प्रविण गायकवाड सहभागी झाले आहेत.
कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळातील शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन संघर्ष यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. शाहू जन्मस्थळापासून आराम बसने संघर्ष यात्रा अंबाबाई मंदिरात आली. यावेळी सर्व नेत्यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफीसाठी देवीला साकडे घातले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विखे-पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यमान सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. तूर उत्पादकांना लुटण्यासाठी व्यापाऱ्यांना राज्य सरकारने खुला परवाना दिल्याची टीका यावेळी करण्यात आली. राज्य सरकारकडून शेतकऱ्याच्या कर्जमाफीप्रश्नी चालढकल होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अंबाबाईचे दर्शन घेऊन यात्रा मुदाळतिट्टा (ता. भुदरगड) येथे गेली. तेथे जाहीर सभा झाल्यानंतर यात्रा परत कोल्हापुरात आली.
ठाकरे बडे मियाँ, शेट्टी छोटे मियाँ
खासदार राजू शेट्टी सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करत आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली. सरकारमध्ये राहून टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘बडे मियाँ’ असून खासदार राजू शेट्टी हे ‘छोटे मियाँ’ असल्याची टीका त्यांनी केली. खासदार शेट्टी यांच्याकडे ‘नाफेड’चे अधिकारी व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याची माहिती असेल तर त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत. सत्तेचे सर्व लाभ घेऊन ठाकरे आणि शेट्टी सरकारवर टीका करत आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
सदाभाऊंना इव्हेंट मॅनेजमेंटची लागण
भाजपमधील इव्हेंट मॅनेजमेंटची लागण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना झाली आहे, असा टोला विखे-पाटील यांनी लगावला. सदाभाऊंनी मध्यंतरी आठवडी बाजारात भाजी विकण्याचे नाटक केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या नेत्याला भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटची एवढ्या लवकर लागण होईल, असे वाटत नव्हते, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोल्हापुरातील नेत्यांचे मतभेद दूर कर
अजित पवार अंबाबाईचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांना देवीकडे काय मागितले? असा प्रश्न केला. यावेळी पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सरकारला बुद्दी दे. कोल्हापुरातील नेत्यांचे मतभेद दूर करुन त्यांना एकत्र कर, असे साकडे घातल्याचे सांगताच उपस्थित राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली. एकीकडे सर्व विरोधी पक्ष एकत्र असताना स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांतील अबोला यावेळी स्पष्ट जाणवत होता.
खासदार साइड ट्रॅकवर
आमदार म़ुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याकडे संघर्ष यात्रेचे नियोजन आहे. यात्रेत खासदार धनंजय महाडिकही सहभागी झाले. मंदिरात आमदार मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, महापौर हसीना फरास, सर्जेराव पाटील हे एका बाजूला होते तर खासदार धनंजय महाडिक दुसऱ्या बाजूला एकटेच उभे होते. आमदार कुपेकर आल्यावर खासदार महाडिक यांचा एकटेपणा दूर होण्यास काही काळ मदत झाली.
तर पालकमंत्र्यांचा सत्कार करू...
थेट पाइपलाइनप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अडचणी दूर कराव्यात, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पालकमंत्री पाटील हे खासगीत ‘नेक्स्ट मुख्यमंत्री’ म्हणून सांगत असल्याने त्यांनी थेट पाइपलाइनचे काम वेगाने होण्यासाठी सरकारी दरबारी परवानगी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला. पालकमंत्र्यांनी थेट पाइपलाइनचा प्रश्न मार्गी लावला तर जाहीर सत्कार करु, असेही चव्हाण म्हणाले.
कोल्हापूर टाइम्स टीम
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख विरोधी पक्षांसह अन्य पक्षांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सुरू असलेल्या संघर्ष यात्रेचा तिसरा टप्पा मंगळवारी कोल्हापुरात सुरू झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, कोणत्याही परिस्थिती सरकारने शेतक ऱ्यांचा सातबारा कोर केलाच पाहिजे, अशी मागणी यावेही करण्यात आली. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कसबा बावडा येथील जन्मस्थळाला वंदन तसेच करवीरनिवासिनी अंबाबाईचे दर्शन घेऊन या यात्रेचा प्रारंभ झाला.
संघर्ष यात्रेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, काँग्रेसचे नेते रोहिदास पाटील, आमदार सुनील केदार, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार विद्या चव्हाण, प्रकाश गजभिये, माजी खासदार निवेदिता माने, महापौर हसीना फरास, नांदेडचे वसंत चव्हाण, शेतकरी कामगार पक्षाचे प्रविण गायकवाड सहभागी झाले आहेत.
कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळातील शाहू महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन संघर्ष यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. शाहू जन्मस्थळापासून आराम बसने संघर्ष यात्रा अंबाबाई मंदिरात आली. यावेळी सर्व नेत्यांनी अंबाबाईचे दर्शन घेऊन शेतकरी कर्जमाफीसाठी देवीला साकडे घातले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विखे-पाटील, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यमान सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. तूर उत्पादकांना लुटण्यासाठी व्यापाऱ्यांना राज्य सरकारने खुला परवाना दिल्याची टीका यावेळी करण्यात आली. राज्य सरकारकडून शेतकऱ्याच्या कर्जमाफीप्रश्नी चालढकल होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अंबाबाईचे दर्शन घेऊन यात्रा मुदाळतिट्टा (ता. भुदरगड) येथे गेली. तेथे जाहीर सभा झाल्यानंतर यात्रा परत कोल्हापुरात आली.
ठाकरे बडे मियाँ, शेट्टी छोटे मियाँ
खासदार राजू शेट्टी सरकारमध्ये राहून सरकारवर टीका करत आहेत, अशी टीका विखे-पाटील यांनी केली. सरकारमध्ये राहून टीका करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ‘बडे मियाँ’ असून खासदार राजू शेट्टी हे ‘छोटे मियाँ’ असल्याची टीका त्यांनी केली. खासदार शेट्टी यांच्याकडे ‘नाफेड’चे अधिकारी व व्यापाऱ्यांचे संगनमत असल्याची माहिती असेल तर त्यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत. सत्तेचे सर्व लाभ घेऊन ठाकरे आणि शेट्टी सरकारवर टीका करत आहेत, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.
सदाभाऊंना इव्हेंट मॅनेजमेंटची लागण
भाजपमधील इव्हेंट मॅनेजमेंटची लागण कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना झाली आहे, असा टोला विखे-पाटील यांनी लगावला. सदाभाऊंनी मध्यंतरी आठवडी बाजारात भाजी विकण्याचे नाटक केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या नेत्याला भाजपच्या इव्हेंट मॅनेजमेंटची एवढ्या लवकर लागण होईल, असे वाटत नव्हते, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोल्हापुरातील नेत्यांचे मतभेद दूर कर
अजित पवार अंबाबाईचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांना देवीकडे काय मागितले? असा प्रश्न केला. यावेळी पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची सरकारला बुद्दी दे. कोल्हापुरातील नेत्यांचे मतभेद दूर करुन त्यांना एकत्र कर, असे साकडे घातल्याचे सांगताच उपस्थित राष्ट्रवादी, काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच गोची झाली. एकीकडे सर्व विरोधी पक्ष एकत्र असताना स्थानिक काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांतील अबोला यावेळी स्पष्ट जाणवत होता.
खासदार साइड ट्रॅकवर
आमदार म़ुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांच्याकडे संघर्ष यात्रेचे नियोजन आहे. यात्रेत खासदार धनंजय महाडिकही सहभागी झाले. मंदिरात आमदार मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, महापौर हसीना फरास, सर्जेराव पाटील हे एका बाजूला होते तर खासदार धनंजय महाडिक दुसऱ्या बाजूला एकटेच उभे होते. आमदार कुपेकर आल्यावर खासदार महाडिक यांचा एकटेपणा दूर होण्यास काही काळ मदत झाली.
तर पालकमंत्र्यांचा सत्कार करू...
थेट पाइपलाइनप्रश्नी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अडचणी दूर कराव्यात, अशी सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पालकमंत्री पाटील हे खासगीत ‘नेक्स्ट मुख्यमंत्री’ म्हणून सांगत असल्याने त्यांनी थेट पाइपलाइनचे काम वेगाने होण्यासाठी सरकारी दरबारी परवानगी प्रयत्न करावेत, असा सल्ला दिला. पालकमंत्र्यांनी थेट पाइपलाइनचा प्रश्न मार्गी लावला तर जाहीर सत्कार करु, असेही चव्हाण म्हणाले.