वरिष्ठांच्या बेफिकीरीने गुन्ह्याला विलंब
मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये सुरुवातीला बेहिशोबी आणि मालकच नसलेली सुमारे तीन कोटी रुपयांची रोकड सापडल्यानंतर वर्षभर याबाबत प्रचंड संभ्रमावस्था होती. मुळातच पोलिस दलात अनेक गोष्टी लपून राहत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेबाबत वर्षभरापूर्वी पहिल्या चार दिवसांतच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊनही वर्षभरानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. मुळात या प्रकरणात वरिष्ठांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब लागल्याचे समोर येत आहे. संशयितांनी मिळालेली रक्कम विविध कामांसाठी गुंतवली. त्यानंतर प्रकरण अंगाशी येत असताना ती परत करावी तरी धोका आणि जवळ ठेवावी तरी धोका अशी, परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच मैनुद्दीन मुल्लाचे फरार होणे, संशयित पोलिसांचा ठावठिकाणा न लागणे, फिर्यादी झुंजार सरनोबतकडून एकूण रकमेबाबत खुलासा न होणे या सर्वच बाबी अजूनही तपासातील कच्चे दुवे समोर आणत आहे.
Maharashtra Times 20 Apr 2017, 3:00 am
हरीश यमगर, सांगली.
मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये सुरुवातीला बेहिशोबी आणि मालकच नसलेली सुमारे तीन कोटी रुपयांची रोकड सापडल्यानंतर वर्षभर याबाबत प्रचंड संभ्रमावस्था होती. मुळातच पोलिस दलात अनेक गोष्टी लपून राहत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेबाबत वर्षभरापूर्वी पहिल्या चार दिवसांतच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊनही वर्षभरानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. मुळात या प्रकरणात वरिष्ठांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब लागल्याचे समोर येत आहे. संशयितांनी मिळालेली रक्कम विविध कामांसाठी गुंतवली. त्यानंतर प्रकरण अंगाशी येत असताना ती परत करावी तरी धोका आणि जवळ ठेवावी तरी धोका अशी, परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच मैनुद्दीन मुल्लाचे फरार होणे, संशयित पोलिसांचा ठावठिकाणा न लागणे, फिर्यादी झुंजार सरनोबतकडून एकूण रकमेबाबत खुलासा न होणे या सर्वच बाबी अजूनही तपासातील कच्चे दुवे समोर आणत आहे.
एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल होण्यास कितीही विलंब लागू शकतो. परंतु सध्याच्या कोट्यवधीच्या चोरी प्रकरणात जे काय घडलेय ते पहिल्या चारच दिवसांतच घडून गेले आहे. नेमके काय आणि कसे घडले याची कल्पना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना होती. या प्रकरणाची व्याप्ती त्यांच्याही कल्पनेपलिकडे होती. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मुळात चोरटा मैनुद्दीन आणि फिर्यादी झुंजार सरनोबत या दोघांचीही भूमिका पहिल्यापासून संशयास्पद आहे. सरनोबतने तक्रार केल्यानंतर जर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असे म्हणायचे असेल तर, ते हास्यास्पद ठरेल. कारण पोलिस अधिकारी इतकेही भाबडे नाहीत. त्यांच्या चाणाक्ष नजरेतीलन फिर्यादी आणि अन्य साक्षीदार कोणत्या पद्धतीने माहिती देत आहेत हे बहुदा सुटत नाही. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठांनी केलेल्या वर्षभराच्या तपासाबाबतही काही प्रश्न निर्माण होतात.
बेथेलहेमनगरमध्ये नातेवाईकांच्या घरी आलेल्या आणि अधून मधून बदली ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या मैनुद्दीन याच्या ताब्यात ३ कोटी, ७ लाख, ६३ हजाराची रोकड असल्याचे १२ मार्च, २०१६ रोजी चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर सलग चार दिवस संबधित रकमेचा मालक सापडत नसल्याचा आभास निर्माण करणाऱ्या सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा बनाव कसा केला, याचा उलगडा अधिक विस्ताराने समोर आला आहे. १६ मार्च, २०१६ रोजी पहाटे झुंजार सरनोबत याने कोडोली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद देऊन त्या रकमेवर मालकी सांगितली. त्या दिवसांपर्यंत वारणानगर शिक्षक कॉलनीतील इमारतीत एकूण किती रोकड होती. त्यापैकी किती चोरीला गेली. किती रकमेची चोरी पोलिसांनी केली, याबाबत सर्व माहिती पोलिस खात्याला होती. कोडोली पोलिसांत फिर्याद देताना सरनोबत यांच्याकडे त्या पोलिसांनी कसून चौकशी केली. चोरीला गेलेली १४ कोटी आणि प्रत्यक्षात फिर्यादीत कमी रक्कम नोंदवावी लागत असल्याने सरनोबत यांची कोंडी झाली. एकूण रकमेची जुळवा-जुळव करून पुरावा म्हणून त्यांनी पोलिसांना काय दाखविले. ते पोलिसांनी कशाच्या आधारे मान्य करुन त्यांची फिर्याद नोंदवून घेऊन मोहिद्दीन मुल्ला याला अटक केली. हे सर्व करताना सरनोबत यांनी खरी रक्कम किती होती, हे सांगितले. पण त्याकडे कोडोली पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे.
सरनोबतांचा पोलिसांसमोर प्रस्ताव
वारणानगरमधील शिक्षक कॉलनीतील कोट्यवधी रुपयांची मालकी शिरावर घेतल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती घेऊन फिर्यादी सरनोबत पोलिस निरीक्षक घनवटसह अन्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते. १४ कोटी रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी सरनोबत यांनी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले. सरनोबतांनी आता ज्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले आहे. त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांनी मध्यस्थाकरवी अनेकदा संपर्क साधला होता. काही रक्कम ठेवून घ्या आणि उर्वरित रक्कम आपल्याला द्यावी, असाही त्यांचा प्रस्ताव दिल्याचे समजते. परंतु ज्यांच्या हाताला जितका वाटा लागला तो सोडायला कोणी तयार नव्हते. या दरम्यान सांगलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेली ही करामत माहीत होती, असेही सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याबाबतीत काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
पैसे परत करण्याचा काहींचा सल्ला
काही अनुभवी अधिकाऱ्यांनीही संबधित संशयितांना सरनोबतांचे पैसे परत करण्याचा सल्ला देण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यावेळी संशयितांपैकी काहींनी ‘आम्ही आता पैसे दिले आणि त्यांनी पुन्हा गुन्हा दाखल केला तर काय करू,’ असा प्रतिसवाल करत गप्प राहणे पसंत केले.
मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये सुरुवातीला बेहिशोबी आणि मालकच नसलेली सुमारे तीन कोटी रुपयांची रोकड सापडल्यानंतर वर्षभर याबाबत प्रचंड संभ्रमावस्था होती. मुळातच पोलिस दलात अनेक गोष्टी लपून राहत नाहीत. त्यामुळे एवढ्या मोठ्या रकमेबाबत वर्षभरापूर्वी पहिल्या चार दिवसांतच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊनही वर्षभरानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. मुळात या प्रकरणात वरिष्ठांनी घेतलेल्या भूमिकेमुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब लागल्याचे समोर येत आहे. संशयितांनी मिळालेली रक्कम विविध कामांसाठी गुंतवली. त्यानंतर प्रकरण अंगाशी येत असताना ती परत करावी तरी धोका आणि जवळ ठेवावी तरी धोका अशी, परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच मैनुद्दीन मुल्लाचे फरार होणे, संशयित पोलिसांचा ठावठिकाणा न लागणे, फिर्यादी झुंजार सरनोबतकडून एकूण रकमेबाबत खुलासा न होणे या सर्वच बाबी अजूनही तपासातील कच्चे दुवे समोर आणत आहे.
एखादा गुन्हा घडल्यानंतर त्याची उकल होण्यास कितीही विलंब लागू शकतो. परंतु सध्याच्या कोट्यवधीच्या चोरी प्रकरणात जे काय घडलेय ते पहिल्या चारच दिवसांतच घडून गेले आहे. नेमके काय आणि कसे घडले याची कल्पना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना होती. या प्रकरणाची व्याप्ती त्यांच्याही कल्पनेपलिकडे होती. त्यामुळेच या प्रकरणाचा तपास सुरू झाला. मुळात चोरटा मैनुद्दीन आणि फिर्यादी झुंजार सरनोबत या दोघांचीही भूमिका पहिल्यापासून संशयास्पद आहे. सरनोबतने तक्रार केल्यानंतर जर या प्रकरणाच्या तपासाला वेग आला असे म्हणायचे असेल तर, ते हास्यास्पद ठरेल. कारण पोलिस अधिकारी इतकेही भाबडे नाहीत. त्यांच्या चाणाक्ष नजरेतीलन फिर्यादी आणि अन्य साक्षीदार कोणत्या पद्धतीने माहिती देत आहेत हे बहुदा सुटत नाही. त्यामुळे या प्रकरणात वरिष्ठांनी केलेल्या वर्षभराच्या तपासाबाबतही काही प्रश्न निर्माण होतात.
बेथेलहेमनगरमध्ये नातेवाईकांच्या घरी आलेल्या आणि अधून मधून बदली ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या मैनुद्दीन याच्या ताब्यात ३ कोटी, ७ लाख, ६३ हजाराची रोकड असल्याचे १२ मार्च, २०१६ रोजी चव्हाट्यावर आले होते. त्यानंतर सलग चार दिवस संबधित रकमेचा मालक सापडत नसल्याचा आभास निर्माण करणाऱ्या सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी हा बनाव कसा केला, याचा उलगडा अधिक विस्ताराने समोर आला आहे. १६ मार्च, २०१६ रोजी पहाटे झुंजार सरनोबत याने कोडोली पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद देऊन त्या रकमेवर मालकी सांगितली. त्या दिवसांपर्यंत वारणानगर शिक्षक कॉलनीतील इमारतीत एकूण किती रोकड होती. त्यापैकी किती चोरीला गेली. किती रकमेची चोरी पोलिसांनी केली, याबाबत सर्व माहिती पोलिस खात्याला होती. कोडोली पोलिसांत फिर्याद देताना सरनोबत यांच्याकडे त्या पोलिसांनी कसून चौकशी केली. चोरीला गेलेली १४ कोटी आणि प्रत्यक्षात फिर्यादीत कमी रक्कम नोंदवावी लागत असल्याने सरनोबत यांची कोंडी झाली. एकूण रकमेची जुळवा-जुळव करून पुरावा म्हणून त्यांनी पोलिसांना काय दाखविले. ते पोलिसांनी कशाच्या आधारे मान्य करुन त्यांची फिर्याद नोंदवून घेऊन मोहिद्दीन मुल्ला याला अटक केली. हे सर्व करताना सरनोबत यांनी खरी रक्कम किती होती, हे सांगितले. पण त्याकडे कोडोली पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचे समोर येत आहे.
सरनोबतांचा पोलिसांसमोर प्रस्ताव
वारणानगरमधील शिक्षक कॉलनीतील कोट्यवधी रुपयांची मालकी शिरावर घेतल्यानंतर नेमकी वस्तुस्थिती घेऊन फिर्यादी सरनोबत पोलिस निरीक्षक घनवटसह अन्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात होते. १४ कोटी रुपयांची रक्कम मिळविण्यासाठी सरनोबत यांनी वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले. सरनोबतांनी आता ज्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्याचे धाडस दाखविले आहे. त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांनी मध्यस्थाकरवी अनेकदा संपर्क साधला होता. काही रक्कम ठेवून घ्या आणि उर्वरित रक्कम आपल्याला द्यावी, असाही त्यांचा प्रस्ताव दिल्याचे समजते. परंतु ज्यांच्या हाताला जितका वाटा लागला तो सोडायला कोणी तयार नव्हते. या दरम्यान सांगलीचे तत्कालीन पोलिस अधीक्षक सुनील फुलारी यांनाही स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेली ही करामत माहीत होती, असेही सांगण्यात येते. त्यामुळेच त्यांनी तत्कालीन पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्याबाबतीत काही निर्णय घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात त्यांना यश आले नाही.
पैसे परत करण्याचा काहींचा सल्ला
काही अनुभवी अधिकाऱ्यांनीही संबधित संशयितांना सरनोबतांचे पैसे परत करण्याचा सल्ला देण्याचा सल्ला दिला होता. परंतु त्यावेळी संशयितांपैकी काहींनी ‘आम्ही आता पैसे दिले आणि त्यांनी पुन्हा गुन्हा दाखल केला तर काय करू,’ असा प्रतिसवाल करत गप्प राहणे पसंत केले.