अ‍ॅपशहर

साखर कारखान्यांचे सांडपाणी पंचगंगेत

कोल्हापूर: गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याऐवजी बायपासद्वारे ते सांडपाणी पंचगंगा नदीत सोडण्याची साखर कारखान्यांनी केलेली व्यवस्था सोमवारी उघड झाली. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाहणी समितीने सोमवारी विविध कारखान्यांना एकाचवेळी अचानक भेटी देऊन पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित कारखान्यांना बायपास व्यवस्था तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची खात्री करण्यासाठी पुन्हा पाहणी केली जाणार आहे.

Maharashtra Times 7 Nov 2017, 3:00 am
कोल्हापूर: गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याऐवजी बायपासद्वारे ते सांडपाणी पंचगंगा नदीत सोडण्याची साखर कारखान्यांनी केलेली व्यवस्था सोमवारी उघड झाली. प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील पाहणी समितीने सोमवारी विविध कारखान्यांना एकाचवेळी अचानक भेटी देऊन पाहणी केली. त्यावेळी हा प्रकार उघड झाल्यानंतर संबंधित कारखान्यांना बायपास व्यवस्था तातडीने काढण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची खात्री करण्यासाठी पुन्हा पाहणी केली जाणार आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sewage problem panchganga kolhapur
साखर कारखान्यांचे सांडपाणी पंचगंगेत


साखर कारखान्यांच्या गळीत हंगामास सुरुवात होण्यापूर्वी पंचगंगा नदी काठावरील कारखान्यातून निघणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था पाहण्यासाठी सोमवारी समितीने दौरा आयोजित केला होता. प्रांताधिकाऱ्यांच्यावतीने तहसीलदार उत्तम दिघे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रा​देशिक अधिकारी दिलीप खेडकर, उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड, महापालिकेचे पर्यावरण अभियंता समीर व्याघ्रांबरे, पोलिस, जिल्हा परिषद यांच्या प्रतिनिधींनी दोन टीमद्वारे पाहणी केली.

या कारखान्यांबरोबर पंचतारांकित एमआयडीसीमधील सीईटीपीचीही पाहणी केली. कारखान्यांची अचानक तपासणी केली असता अनेक कारखान्यांनी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था केली आहे. पण या प्रक्रियेऐवजी बहुतांश सांडपाणी थेट पंचगंगा नदीमध्ये सोडण्याची बायपास व्यवस्था केल्याचेही दिसून आले. सांडपाणी सोडण्याचे आउटलेट कुठे आहे, कशा प्रकारे सांडपाणी सोडले जाते याची छायाचित्रे घेण्यात आली. अचानक केलेल्या पाहणीमुळे कारखान्यांच्या यंत्रणेची धावपळ उडाली. गंभीर त्रुटी दिसून आल्यानंतर समितीने तिथेच ही बायपास व्यवस्था काढून घेण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार आहे. तर कारखान्यांनी ही व्यवस्था काढून घेतली आहे का याची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज