अ‍ॅपशहर

नागपंचमीसाठी शिराळ्यात यंत्रणा सज्ज

जिवंत नागांची पूजा करण्यास परवानगी न मिळाल्याने नाराज असलेले शिराळावासीय आता नागपंचमीच्या तयारीत गुंगले आहेत. गुरुवारी होणाऱ्या नागपंचमी उत्सवाची प्रशासनाने नेटकी तयारी केली आहे.

Maharashtra Times 27 Jul 2017, 1:40 am
शिराळा : जिवंत नागांची पूजा करण्यास परवानगी न मिळाल्याने नाराज असलेले शिराळावासीय आता नागपंचमीच्या तयारीत गुंगले आहेत. गुरुवारी होणाऱ्या नागपंचमी उत्सवाची प्रशासनाने नेटकी तयारी केली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shirala preapares for naag panchami
नागपंचमीसाठी शिराळ्यात यंत्रणा सज्ज


नगर पंचायतीने स्वच्छता, पिण्याचे पाणी, आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत. बंदोबस्तासाठी चार उपविभागीय पोलीस अधिकारी, १४ पोलिस निरीक्षक, ३३ फौजदार आणि ५००हून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वन विभागाचे एक वनसंरक्षक, चार विभागीय वनाधिकारी आणि १५८ इतर कर्मचारी कार्यरत असणार आहेत. एसटी आगाराच्या ७० गाड्या प्रवाशांची बसस्थानकापर्यंत ये-जा करणार आहेत. २००२ पासून नागपंचमी उत्सव न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. त्यामुळे नागावर श्रद्धा असूनही शिराळा शहरातील नागरिकांना जिवंत नागाची पूजा करता येत नाही. तरीही नागपंचमी उत्सवाची देशभर ख्याती असल्यामुळे हजारो लोक प्रत्येक वर्षी हजेरी लावतात. कायद्याचा मान राखून उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेऊन नागपंचमी साजरी करावी, असे आवाहन सांगलीचे जिल्हाधिकारी विजय काळम–पाटील यांनी नागमंडळे,शासकीय अधिकारी यांच्या बैठकीवेळी केले आहे.
नागपंचमीदिवशी जिवंत नागांचे खेळ करण्याची परवानगी मिळावी, यासाठी शिराळावासीयांनी नगरपंचायतीच्या निवडणुकीवरही बहिष्कार घातला होता. मात्र, न्यायालयातून परवानगी मिळाली नाही. तसेच, शिराळ्यासाठी कायद्यात बदल करण्याचे आश्वासन तत्कालीन केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले होते. मात्र, त्यावरही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे यंदा शिराळ्यात निरुत्साह जाणवत आहे.
परंपरा बाराव्या शतकापासून
शिराळ्यात नागांच्या जिवंत पूजेची परंपरा बाराव्या शतकापासून असल्याचे सांगितले जाते. बाराव्या शतकात नागपंचमीच्या दिवशी नाथ संप्रदायातील गुरू गोरक्षनाथ भिक्षा मागण्यासाठी गावातील महाजन यांच्या घरी गेले. त्या घरातील गृहिणी मातीच्या प्रतीकात्मक नागाची पूजा करीत असल्यामुळे तिला भिक्षा वाढण्यासाठी वेळ झाला. भिक्षा वाढण्यास वेळ लागल्याचे कारण विचारल्यानंतर गोरक्षनाथांनी जिवंत नागाची पूजा करू शकाल का, असा प्रश्न केला. त्या गृहिणीने तत्काळ होकार दिला. त्यापासून जिवंत नागांच्या पूजेस शिराळ्यात सुरवात झाली, अशी आख्यायिका आहे. त्यावेळी जवळपासच्या बत्तीस खेड्यातील लोक गोरक्षनाथांचे शिष्य बनले. त्यामुळे गावालाही बत्तीस शिराळा असे नाव पडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज