अ‍ॅपशहर

विद्यापीठाच्या नावात बदल नको

शिवाजी विद्यापीठाला नाव देताना मान्यवर तज्ज्ञांनी दूरदृष्टी ठेवली होती. सध्या शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय ऐरणीवर असताना नावात बदल केल्यास विद्यापीठाचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने केला जाईल, त्यामुळे शिवाजी विद्यापाठी हे नाव कायम ठेवावे अशी मागणी जिल्हा नाबार्डतंर्गत शेतकरी संघाचे उपाध्यक्ष एम. आर. चौगुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिले असून त्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनाही दिली आहे.

Maharashtra Times 27 Dec 2016, 3:00 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम shivaji university name change
विद्यापीठाच्या नावात बदल नको


शिवाजी विद्यापीठाला नाव देताना मान्यवर तज्ज्ञांनी दूरदृष्टी ठेवली होती. सध्या शिवाजी विद्यापीठाच्या नामकरणाचा विषय ऐरणीवर असताना नावात बदल केल्यास विद्यापीठाचा उल्लेख वेगळ्या पद्धतीने केला जाईल, त्यामुळे शिवाजी विद्यापाठी हे नाव कायम ठेवावे अशी मागणी जिल्हा नाबार्डतंर्गत शेतकरी संघाचे उपाध्यक्ष एम. आर. चौगुले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी उच्चशिक्षण मंत्री विनोद तावडे यांना दिले असून त्याची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनाही दिली आहे.

निवेदनात म्हटले आहे, ‘शिवाजी विद्यापीठ ही तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कोल्हापूरला दिलेली देणगी आहे. या विद्यापीठाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ करावे, अशी मागणी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. अशीच मागणी विद्यापीठाच्या स्थापनेवेळी एस. एम. जोशी व ना. ग. गोरे आदींनी केली होती. त्यावेळी चव्हाण यांनी श्रद्धेने दिलेले नाव कसे बाजूला पडते, हे सोदाहरण स्पष्ट केले. कोल्हापुरात छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल आहे, त्याचा उल्लेख सीपीआर असाच करतात. तर श्रीमंत महाराणी ताराबाई ट्रेनिंग कॉलेजचा उल्लेख एसएमटीटी कॉलेज असा होत राहिला आहे. तसेच मुंबई येथील व्ही. टी. स्टेशनचे नाव छत्रपती शिवाजी टर्मिनल्स असे केले. मात्र त्याचाही उल्लेख सध्या सीएसटी असा होत आहे. यामुळे मूळ नाव बाजूला पडत आहे.

त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव दिल्यास सीएसएम विद्यापीठ असा होणार आहे. यातून मूळ हेतू नष्ट होणार आहे. त्यामुळे नामकरणाची मागणी करणाऱ्यांनी या बाबींचा विचार करुन नामाकरणाची मागणी करु नये, असेही आवाहन चौगुले यांनी केले आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज