म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर जलवाहिनी गळती किंवा विद्युतपुरवठ्यामध्ये कोणताही बिघाड नसताना गेल्या दोन दिवसांपासून उपनगरामध्ये पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत नगरसेवकांनी थेट आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चांगलीच झाडाझडती घेतली. सोमवारपासून (ता. १६) करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरात बंद सदृश्य स्थिती दिसत आहे. महापालिका प्रशासनाच्यावतीने गर्दी टाळण्याचे आवाहनही केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा विभागाने शटडाऊन घेऊन करण्यात येणारी दुरुस्तीची कामे लांबणीवर टाकली. त्यामुळे आठ दिवसांत पिण्याच्या पाण्याची कोणतीही समस्या नसली, तरी कर्मचाऱ्यांनी अचानक घेतलेल्या सुट्ट्यांमुळे विशेषत: उपनगरातील पाणीपुरवठा खंडीत झाला. त्याबाबतची तक्रार नगरसेवकांनीच आयुक्तांकडे सोमवारी केली. त्याची दखल घेत त्यांनी पाणीपुरवठा विभागाच्या निवडक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आयुक्तांनी चांगलीच झाडाझडती घेतली. त्यानंतरही मंगळवारी सकाळी उपनगरामध्ये पाणीपुरवठा होऊ शकला नाही. तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला.
उपनगरांत काही ठिकाणी पाणी
म टा...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Mar 2020, 4:00 am