कोल्हापूर: दारू पिऊन आईला सतत त्रास देणाऱ्या बापाचा मुलानेच डोक्यात पार घालून खून केला. नंतर हा अपघात असल्याचे भासविण्यासाठी रस्त्याच्या कडेला मृतदेह टाकून दिला. मात्र, पोलिसांना संशय आल्याने तीन दिवसानंतर खूनाचा प्रकार उघडकीस आला. कागल तालुक्यातील केनवडे येथे घडलेल्या या घटनेत अमोल दत्तात्रय पाटील यास अटक करण्यात आली आहे. ( Son Killed Father In Kolhapur ) वाचा: कल्पिता पिंपळे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली ही एकमेव विनंती!
केनवडे येथील दत्तात्रय पाटील हे इचलकरंजी येथे राहत होते. त्यांच्याशी पटत नसल्याने पत्नी व मुलगा दोघे केनवडे येथे राहतात. दत्तात्रय पाटील अधून मधून केनवडे येथे येत होते. तेथे त्यांचा भावांशी वाद होता. हा वाद त्यांच्या मुलाने मिटवला होता. याचा त्याला राग होता. याशिवाय तो पत्नी आणि मुलांशी विविध कारणाने वाद घालत मारहाण करत होता. सतत दारू पिऊन त्रास देत होता. यामुळे मुलगा अमोल याच्या मनत राग होता. चार दिवसांपूर्वी दत्तात्रय पाटील याने दारू पिऊन पुन्हा घरात वाद घातला. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. रात्री उशिरा परत घरी येत असताना मुलगा अमोल याने त्याला कागल ते निढोरी रस्त्यावर गाठले. लोखंडी पार त्याने वडिलांच्या डोक्यावर मारला. वार वर्मी लागल्याने दत्तात्रय पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मुलाने मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून घर गाठले.
वाचा: हे काम माझे हितचिंतकच करताहेत!; वाढदिवशी खडसेंची फटकेबाजी
कागल पोलिसांना अपघाताची वर्दी मिळाली. त्यानुसार त्यांनी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पाटील याचा मृत्यू झाल्याची नोंद केली. पण वैद्यकीय अहवाल आणि गावातील चर्चेच्या संशयावरून त्यांनी अधिक तपास केला. तेव्हा हा अपघात नसून खून असल्याचे उघडकीस आले. केवळ डोक्याला एकाच ठिकाणी इजा झाल्याचा वैद्यकीय अहवाल आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्यातून हा अपघात नसून खून झाल्याची शंका पोलिसांना आल्याने त्यादृष्टीने तपासाची चक्रे सुरू केली. खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तेव्हा मुलानेच बापाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप वाकचौरे यांनी केला.
वाचा: हृदयद्रावक! मुंबईच्या मुलीचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू
केनवडे येथील दत्तात्रय पाटील हे इचलकरंजी येथे राहत होते. त्यांच्याशी पटत नसल्याने पत्नी व मुलगा दोघे केनवडे येथे राहतात. दत्तात्रय पाटील अधून मधून केनवडे येथे येत होते. तेथे त्यांचा भावांशी वाद होता. हा वाद त्यांच्या मुलाने मिटवला होता. याचा त्याला राग होता. याशिवाय तो पत्नी आणि मुलांशी विविध कारणाने वाद घालत मारहाण करत होता. सतत दारू पिऊन त्रास देत होता. यामुळे मुलगा अमोल याच्या मनत राग होता. चार दिवसांपूर्वी दत्तात्रय पाटील याने दारू पिऊन पुन्हा घरात वाद घातला. त्यानंतर तो घरातून बाहेर पडला. रात्री उशिरा परत घरी येत असताना मुलगा अमोल याने त्याला कागल ते निढोरी रस्त्यावर गाठले. लोखंडी पार त्याने वडिलांच्या डोक्यावर मारला. वार वर्मी लागल्याने दत्तात्रय पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मुलाने मृतदेह रस्त्याच्या बाजूला फेकून घर गाठले.
वाचा: हे काम माझे हितचिंतकच करताहेत!; वाढदिवशी खडसेंची फटकेबाजी
कागल पोलिसांना अपघाताची वर्दी मिळाली. त्यानुसार त्यांनी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पाटील याचा मृत्यू झाल्याची नोंद केली. पण वैद्यकीय अहवाल आणि गावातील चर्चेच्या संशयावरून त्यांनी अधिक तपास केला. तेव्हा हा अपघात नसून खून असल्याचे उघडकीस आले. केवळ डोक्याला एकाच ठिकाणी इजा झाल्याचा वैद्यकीय अहवाल आल्याने पोलिसांचा संशय बळावला होता. त्यातून हा अपघात नसून खून झाल्याची शंका पोलिसांना आल्याने त्यादृष्टीने तपासाची चक्रे सुरू केली. खून असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला. तेव्हा मुलानेच बापाचा खून केल्याचे निष्पन्न झाले. मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली. त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दिलीप वाकचौरे यांनी केला.
वाचा: हृदयद्रावक! मुंबईच्या मुलीचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू