अ‍ॅपशहर

पानसरे हत्येतील संशयितांसाठी स्वतंत्र पथके

'कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग आकोलकर यांना कोर्टाने फरार घोषित केले आहे. या संशयितांना अटक होणे गरजेचे आहे. त्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथक तयार करून राज्यात सर्वत्र शोध घ्या. त्यांची माहिती पत्रके सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करा.

Maharashtra Times 25 Jan 2018, 2:07 pm
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम goving


'कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येतील संशयित आरोपी विनय पवार आणि सारंग आकोलकर यांना कोर्टाने फरार घोषित केले आहे. या संशयितांना अटक होणे गरजेचे आहे. त्यांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथक तयार करून राज्यात सर्वत्र शोध घ्या. त्यांची माहिती पत्रके सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करा. प्रसार माध्यमातून माहिती द्या,' अशा सूचना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी तपास अधिकाऱ्यांना दिल्या. बुधवारी (ता. २४) झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी तपासाचा आढावा घेतला. कॉम्रेड पानसरे तपासासंबंधी आढावा बैठक बुधवारी सकाळी विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात पार पडली.

बैठकीत तपास अधिकारी व अपर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी, पोलिस निरीक्षक उदय डुबल, सहायक पोलिस निरीक्षक युवराज आठरे अशा आठ पथकांच्या प्रमुखांनी आजवरच्या तपासाची माहिती नांगरे-पाटील यांना दिली. पानसरे हत्येतील संशयित आरोपी पवार आणि अकोलकर हे दोघे फरार आहेत. त्यांच्या अटकेसाठी विशेष प्रयत्न करण गरजेचे आहे. कर्नाटकातील ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत डॉ. एम. एम. कलबुर्गी यांच्या खूनप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारसह, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, सीबीआय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर तपासाचे गांभीर्य वाढले आहे. फरार दोन्ही संशयितांच्या अटकेसाठी स्वतंत्र पथके तयार करून राज्यभर शोध घ्या, अशा सूचना आयजी नांगरे-पाटील यांनी बैठकीत दिल्या आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज