कोल्हापूर: सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान पुर्ण झाले असून उर्वरीत जिल्ह्यात नेत्यांकडून प्रचाराचा धडाका सुरू आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्यात आलेली मराठा आरक्षणाची लाट आता शांत झाली असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले आहे. मराठा आरक्षण मिळाल्या शिवाय शांत बसणार नाही. येत्या लोकसभा निवडणूकीत प्रत्येक जिल्ह्यात मराठा उमेदवार उभे करणार अशी भूमिका घेतलेले मनोज जरांगे पाटील आता यू टर्न घेतल्याने आणि निवडणूक निकालानंतर निर्णय घेण्याचं जाहीर केल्याने मराठा समाजातील आरक्षणाची धग कमी झाली की काय, असा प्रश्न चिन्ह निमार्ण झाला आहे.
लाखोंचे मोर्चे , उपोषण आणि 'एक मराठा लाख मराठा'ची घोषणानी गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षण प्रश्न धगधगत आहे. विशेषत: आगामी लोकसभा निवडणुक लक्षात घेऊन राज्य सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या सगे सोयरांचे मागण्या मान्य करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत येण्यापासून वेशीवरच रोखले. मात्र आता सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा नेते किंवा उमेदवार मराठा आरक्षण प्रश्न एक शब्द ही काढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे सामान्य मराठा मतदार कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या मराठा समाजाबद्दल आरक्षणावरून मत मतांतर असल्याचे दिसून येत आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, सकल मराठा समाज यासारख्या अनेक संघटनांमधून आलेल्या मागण्या या वेगवेगळ्या असल्याने काही जण सरकारने मान्य केलेल्या मागण्या मध्ये समाधानी असल्याचे म्हणतात तर काहीजण कुणबी म्हणून आरक्षणाला विरोध करत आहेत. सर काही जण कुणबी का होईना, पण आरक्षण मिळाल पाहिजे अशा जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. मात्र जरांगे पाटील यांनी केलेली मागणी संदर्भात सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्याची सुनावणी अद्याप सुरू आहे. यामुळे येत्या निवडणुकीत मराठा मतदार कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आणि आमची मराठा आरक्षणची मागणी एकच आहे. मात्र दोघांच्या मागायच्या पद्धती वेगळ्या आहेत. आम्हाला आरक्षण टिकल पाहिजे असं वाटत तसेच हे आरक्षण कुणबी म्हणून देण्यास आमचा विरोध आहे. सध्याचा मिळालेलं दहा टक्के मराठा आरक्षण हे टिकवणे आणि त्याचा लाभ घेण म्हणजे आता होणाऱ्या मेगाभरती मध्ये विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, शिक्षणामधे लाभ घेतला पाहिजे आणि आरक्षण टिकवणे ही सध्या आमची भूमिका आहे. बाकी राजकारणामध्ये प्रत्येक पक्षामध्ये मराठा आहे त्यामुळे कोणत्याही विशिष्ट पक्षाला पाठिंबा आणि विरोध असं काहीही नाही जे ज्याच्याबरोबर जातील ते त्याच्याबरोबर असे आमचे धोरण आहे.- दिलीप पाटील,मराठा क्रांती मोर्चा
जरांगे पाटील यांनी लोकसभेमध्ये उमेदवार उभे करायचे म्हटले होते. मात्र ताकद कमी असल्याने त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र उमेदवार उभे करायचे हे विधानसभेलाही होऊ शकत...सध्याच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणताही उमेदवार घेत नाहीय तसेच मराठा आरक्षण प्रकरण हे उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. यावर सुनावणी सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या त्या कालखंडात वेगळ्या होत्या...ते टिकू शकत नाही म्हटल्यावर ओबीसीमध्ये आपला समाज गेला तर आरक्षण मिळू शकेल अशी लोकांना वाटू लागले. मात्र यामुळे ओबीसी समाजातील लोकांना आपल्यावर अन्याय होईल असे वाटत आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी समाजावर अन्याय केला त्यांना पाडायचे असेल तर पाडा अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीय.- वसंत मुळीक, अखिल भारतीय मराठा महासंघ
सकल मराठा समाजाने यंदा च्या निवडणुकीत कोणाला ही पाठिंबा दिला नाही. लोकशाहीनुसार योग्य त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षण आणि लोकसभा निवडणूक याचा काहीही संबंध नाही. मराठा समाजामधे कोणीही कुठलाही फतवा काढलेला नाही आणि काढू शकणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सक्षमपणे सुरू राहील. मराठा आरक्षणासाठी यापूर्वीही अनेकांनी नेतृत्व केल आताही पुढे कोणीही करू शकत मात्र कोणत्याही एका व्यक्तीचे मत हे मराठा समाजाचे मत असू शकत नाही. आमच मत ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे असे आहे मात्र या निवडणुका झाल्यानंतर हे आंदोलन असेच सुरू राहील.- दिलीप देसाई,सकल मराठा समाज, कोल्हापूर
जरांगे पाटलांची भूमिका सुरुवातीला जी होती ती आज देखील आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना फसवलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे. मराठा समाजातील जे मराठा समाजावर प्रेम करतात आणि ज्यांचं अंतकरण सांगतय की एकनाथ शिंदे आणि शासन यांनी मराठा समाजाला फसवल आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे ही भूमिका आमची आहे. बऱ्याच वर्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात बहुसंख्य मराठा समाज एकत्र झाला आहे. त्यांच्या घेतलेल्या भूमिकाशी बहुतांश समाज संमत आहे. ज्यांना कुणबी मधून आरक्षण मिळत आहे. त्यांना त्यातून मिळावं तसेच ज्यांचा कुणबीशी संबंध नाही त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळाव ज्या त्या भागातील स्थितीप्रमाणे या मागण्या आहेत.- ॲड. प्रवीण इंदूलकर
लाखोंचे मोर्चे , उपोषण आणि 'एक मराठा लाख मराठा'ची घोषणानी गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षण प्रश्न धगधगत आहे. विशेषत: आगामी लोकसभा निवडणुक लक्षात घेऊन राज्य सरकारने मराठा नेते मनोज जरांगे पाटलांच्या सगे सोयरांचे मागण्या मान्य करत मुख्यमंत्र्यांनी त्यांना मुंबईत येण्यापासून वेशीवरच रोखले. मात्र आता सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा नेते किंवा उमेदवार मराठा आरक्षण प्रश्न एक शब्द ही काढत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे सामान्य मराठा मतदार कोणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सध्या मराठा समाजाबद्दल आरक्षणावरून मत मतांतर असल्याचे दिसून येत आहे. तसेच मराठा क्रांती मोर्चा, मराठा ठोक मोर्चा, सकल मराठा समाज यासारख्या अनेक संघटनांमधून आलेल्या मागण्या या वेगवेगळ्या असल्याने काही जण सरकारने मान्य केलेल्या मागण्या मध्ये समाधानी असल्याचे म्हणतात तर काहीजण कुणबी म्हणून आरक्षणाला विरोध करत आहेत. सर काही जण कुणबी का होईना, पण आरक्षण मिळाल पाहिजे अशा जरांगे पाटलांच्या भूमिकेला पाठिंबा देत आहेत. मात्र जरांगे पाटील यांनी केलेली मागणी संदर्भात सध्या उच्च न्यायालयात याचिका दाखल असून त्याची सुनावणी अद्याप सुरू आहे. यामुळे येत्या निवडणुकीत मराठा मतदार कोणाच्या बाजूने झुकणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांची आणि आमची मराठा आरक्षणची मागणी एकच आहे. मात्र दोघांच्या मागायच्या पद्धती वेगळ्या आहेत. आम्हाला आरक्षण टिकल पाहिजे असं वाटत तसेच हे आरक्षण कुणबी म्हणून देण्यास आमचा विरोध आहे. सध्याचा मिळालेलं दहा टक्के मराठा आरक्षण हे टिकवणे आणि त्याचा लाभ घेण म्हणजे आता होणाऱ्या मेगाभरती मध्ये विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे, शिक्षणामधे लाभ घेतला पाहिजे आणि आरक्षण टिकवणे ही सध्या आमची भूमिका आहे. बाकी राजकारणामध्ये प्रत्येक पक्षामध्ये मराठा आहे त्यामुळे कोणत्याही विशिष्ट पक्षाला पाठिंबा आणि विरोध असं काहीही नाही जे ज्याच्याबरोबर जातील ते त्याच्याबरोबर असे आमचे धोरण आहे.- दिलीप पाटील,मराठा क्रांती मोर्चा
जरांगे पाटील यांनी लोकसभेमध्ये उमेदवार उभे करायचे म्हटले होते. मात्र ताकद कमी असल्याने त्यांनी हा निर्णय मागे घेतला आहे. मात्र उमेदवार उभे करायचे हे विधानसभेलाही होऊ शकत...सध्याच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणताही उमेदवार घेत नाहीय तसेच मराठा आरक्षण प्रकरण हे उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. यावर सुनावणी सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या त्या कालखंडात वेगळ्या होत्या...ते टिकू शकत नाही म्हटल्यावर ओबीसीमध्ये आपला समाज गेला तर आरक्षण मिळू शकेल अशी लोकांना वाटू लागले. मात्र यामुळे ओबीसी समाजातील लोकांना आपल्यावर अन्याय होईल असे वाटत आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी समाजावर अन्याय केला त्यांना पाडायचे असेल तर पाडा अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीय.- वसंत मुळीक, अखिल भारतीय मराठा महासंघ
सकल मराठा समाजाने यंदा च्या निवडणुकीत कोणाला ही पाठिंबा दिला नाही. लोकशाहीनुसार योग्य त्या व्यक्तीला मतदान करण्याचा अधिकार आहे. मराठा आरक्षण आणि लोकसभा निवडणूक याचा काहीही संबंध नाही. मराठा समाजामधे कोणीही कुठलाही फतवा काढलेला नाही आणि काढू शकणार नाही. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सक्षमपणे सुरू राहील. मराठा आरक्षणासाठी यापूर्वीही अनेकांनी नेतृत्व केल आताही पुढे कोणीही करू शकत मात्र कोणत्याही एका व्यक्तीचे मत हे मराठा समाजाचे मत असू शकत नाही. आमच मत ओबीसी मधून आरक्षण मिळाले पाहिजे असे आहे मात्र या निवडणुका झाल्यानंतर हे आंदोलन असेच सुरू राहील.- दिलीप देसाई,सकल मराठा समाज, कोल्हापूर
जरांगे पाटलांची भूमिका सुरुवातीला जी होती ती आज देखील आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठ्यांना फसवलं त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायची वेळ आली आहे. मराठा समाजातील जे मराठा समाजावर प्रेम करतात आणि ज्यांचं अंतकरण सांगतय की एकनाथ शिंदे आणि शासन यांनी मराठा समाजाला फसवल आहे. त्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा आहे ही भूमिका आमची आहे. बऱ्याच वर्षांनी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात बहुसंख्य मराठा समाज एकत्र झाला आहे. त्यांच्या घेतलेल्या भूमिकाशी बहुतांश समाज संमत आहे. ज्यांना कुणबी मधून आरक्षण मिळत आहे. त्यांना त्यातून मिळावं तसेच ज्यांचा कुणबीशी संबंध नाही त्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळाव ज्या त्या भागातील स्थितीप्रमाणे या मागण्या आहेत.- ॲड. प्रवीण इंदूलकर