म. टा. वृत्तसेवा, कागल
‘विधायकतेचा हा डॉल्बीमुक्त गणेश उत्सव एकजुटीने साजरा करूया. कागलची ही रचनात्मक, होकारात्मक डॉल्बीमुक्तीची ऊर्जा सर्वदूर पसरेल, अशी अपेक्षा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली.
कागल येथे बहुउद्देशिय हॉलमध्ये शाहू ग्रुप आणि कागल पोलिस ठाण्याच्यावतीने आयोजित डॉल्बीमुक्त गणेश उत्सव आणि गणराया अॅवॉर्ड अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
नांगरे पाटील म्हणाले,‘स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या युवकांच्या गाथा गणेशोत्सवातून सर्वसामान्यांपर्यंत मांडल्या. त्याचा स्वातंत्र्य मिळण्यास हातभार लागला. परंतु आज प्रत्येक खेडोपाड्यात-गल्ली बोळात पोहचलेला गणेश उत्सव राज्यातील एक लाख अधिकृत मंडळांमधून बाराशे कोटी रूपयांच्या वर्गणीचा चुराडा करतो. त्यातच म्युझिक आणि ड्रग्ज व्यसनाचे खूप जवळचे नाते आहे. म्हणूनच १३० ते १४० डेसिबल आवाजाच्या डॉल्बीच्या भिंती आज वृद्ध, गरोदर महिलांच्या बाळांवर आणि रूग्णांच्या जीवावर उठले आहेत. शिवाजी महाराजांपासून संत महात्म्यांपर्यंत चांगले आदर्श असताना आपण धार्मिकतेच्या नावाखाली कोणती गाणी लावतो ही बाब चिंताजनक आहे. चांगुलपणा हा आपला धर्म विसरून माणसामाणसांचे मुडदे पाडणाऱ्या गिधाडांचे आपण ऐकत आहोत. ’
सगळ्यांना सगळं देणारा गणपती पोलिसांना मात्र वार्षिक परिक्षेच्या निमित्ताने मोठे टेन्शन देतो, असे मिश्कीलपणे सांगत नांगरे-पाटील म्हणाले, ‘मशिदीवरून जाणारी मिरवणूक, बाप्पाच्या मूर्ती दुखावल्या जाणे आणि त्यातून होणारे वाद, महिलांवर होणारे आत्याचार या पाशवी बाबी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. मुळात अनंत चतुर्थीच्या रात्री बारानंतर गणेश विसर्जन करणारा नरकात जातो, असे पंचांगच सांगते. तर मग पोलिसांनी कितीजणांबरोबर किती वाद घालायचा ?’
जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे म्हणाले, ‘गणेश उत्सव आला की आम्ही औपचारिकता पूर्ण करतो. परंतु सकारात्मक विचार घेवून बदल घडविणाऱ्या समरजितसिंह घाटगेंमुळे डॉल्बीमुक्तीचा मोठा प्रभाव यावेळी दिसणार आहे. डॉल्बीच्या रूपाने आलेली ही विकृती दूर करण्याचा संकल्प आजपासून करूया. आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ्य घालवणारी ही डॉल्बीची अपप्रवृत्ती नष्ट केली पाहिजे.’
यावेळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव म्हणाले, ‘शाहुंच्या या भूमीने नेहमीच वेगळेपण जपले आहे. उत्सवातील चुकीच्या प्रथा घालवण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांचे योगदान मोलाचे ठरत आहे.
स्वागत कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी केले. यावेळी कागलच्या नगराध्यक्षा संगीता गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, तहसीलदार किशोर घाडगे यांच्यासह शाहू ग्रुपचे संचालक, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक, युवती, विविध मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांगल्या गोष्टींचा संसर्ग वाढू दे
गणपतीबाप्पामुळेच मी घडलो, असे स्पष्ट करून विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘उत्सवात व्याख्यानमालेसाठी आम्ही १९९२ साली वर्गणी गोळा केली. त्यातील पन्नास हजारांपैकी आठ हजार रूपये व्याख्यानावर खर्चून उर्वरित रक्कमेतून स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणली. म्हणूनच आठराशे लोकसंख्या असलेल्या गावातून आय.ए.एस. व आय.पी.एस. अशी मुले १९९७ साली तयार झाली. तीच विधायकतेची दृष्टी व ऊर्जा घेवून समरजितसिंह घाटगे जात आहेत. या चांगल्या गोष्टींचा संसर्ग असाच वाढत राहिला पाहिजे.’
सांस्कृतिक विद्यापीठ व्हावे ...
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘डॉल्बीमुक्ती हा पोलिस आणि माध्यमांचा उपक्रम आहे. मी फक्त प्रायोजक आहे. शंभर वर्षांपूर्वी २४ जुलै १९१७ रोजी शाहू राजांनी प्राथमिक शिक्षणासाठी एक लाख रूपये फंड दिला आणि त्याची सुरवात गणेश उत्सवापासूनच केली. तो वारसा घेवून व्यसनमुक्ती व समाज एकत्र येणे गरजेचे आहे. याकरिता महिलांच्या सहभागाने कुटुंबाप्रमाणे गणेश उत्सव व्हावा हा उद्देश आहे. चालूवर्षी महिलांना गणेश मंडळांचे अध्यक्ष केले. त्यामुळे कागल ही शाहूंचा भूमी आहे हे मंडळांनी दाखवून दिले आहे. येथून पुढे कागल हे राजकीय विद्यापीठ न राहता ते सांस्कृतिक विद्यापीठ व्हावे याचे ब्रँडींग करूया.’
‘विधायकतेचा हा डॉल्बीमुक्त गणेश उत्सव एकजुटीने साजरा करूया. कागलची ही रचनात्मक, होकारात्मक डॉल्बीमुक्तीची ऊर्जा सर्वदूर पसरेल, अशी अपेक्षा कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केली.
कागल येथे बहुउद्देशिय हॉलमध्ये शाहू ग्रुप आणि कागल पोलिस ठाण्याच्यावतीने आयोजित डॉल्बीमुक्त गणेश उत्सव आणि गणराया अॅवॉर्ड अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
नांगरे पाटील म्हणाले,‘स्वातंत्र्यपूर्व काळात टिळकांनी स्वातंत्र्यासाठी आहुती देणाऱ्या युवकांच्या गाथा गणेशोत्सवातून सर्वसामान्यांपर्यंत मांडल्या. त्याचा स्वातंत्र्य मिळण्यास हातभार लागला. परंतु आज प्रत्येक खेडोपाड्यात-गल्ली बोळात पोहचलेला गणेश उत्सव राज्यातील एक लाख अधिकृत मंडळांमधून बाराशे कोटी रूपयांच्या वर्गणीचा चुराडा करतो. त्यातच म्युझिक आणि ड्रग्ज व्यसनाचे खूप जवळचे नाते आहे. म्हणूनच १३० ते १४० डेसिबल आवाजाच्या डॉल्बीच्या भिंती आज वृद्ध, गरोदर महिलांच्या बाळांवर आणि रूग्णांच्या जीवावर उठले आहेत. शिवाजी महाराजांपासून संत महात्म्यांपर्यंत चांगले आदर्श असताना आपण धार्मिकतेच्या नावाखाली कोणती गाणी लावतो ही बाब चिंताजनक आहे. चांगुलपणा हा आपला धर्म विसरून माणसामाणसांचे मुडदे पाडणाऱ्या गिधाडांचे आपण ऐकत आहोत. ’
सगळ्यांना सगळं देणारा गणपती पोलिसांना मात्र वार्षिक परिक्षेच्या निमित्ताने मोठे टेन्शन देतो, असे मिश्कीलपणे सांगत नांगरे-पाटील म्हणाले, ‘मशिदीवरून जाणारी मिरवणूक, बाप्पाच्या मूर्ती दुखावल्या जाणे आणि त्यातून होणारे वाद, महिलांवर होणारे आत्याचार या पाशवी बाबी कुठेतरी थांबल्या पाहिजेत. मुळात अनंत चतुर्थीच्या रात्री बारानंतर गणेश विसर्जन करणारा नरकात जातो, असे पंचांगच सांगते. तर मग पोलिसांनी कितीजणांबरोबर किती वाद घालायचा ?’
जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे म्हणाले, ‘गणेश उत्सव आला की आम्ही औपचारिकता पूर्ण करतो. परंतु सकारात्मक विचार घेवून बदल घडविणाऱ्या समरजितसिंह घाटगेंमुळे डॉल्बीमुक्तीचा मोठा प्रभाव यावेळी दिसणार आहे. डॉल्बीच्या रूपाने आलेली ही विकृती दूर करण्याचा संकल्प आजपासून करूया. आरोग्य आणि सामाजिक स्वास्थ्य घालवणारी ही डॉल्बीची अपप्रवृत्ती नष्ट केली पाहिजे.’
यावेळी करवीरचे उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह जाधव म्हणाले, ‘शाहुंच्या या भूमीने नेहमीच वेगळेपण जपले आहे. उत्सवातील चुकीच्या प्रथा घालवण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांचे योगदान मोलाचे ठरत आहे.
स्वागत कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत गवारी यांनी केले. यावेळी कागलच्या नगराध्यक्षा संगीता गाडेकर, उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले, तहसीलदार किशोर घाडगे यांच्यासह शाहू ग्रुपचे संचालक, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, महाविद्यालयीन युवक, युवती, विविध मंडळांचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चांगल्या गोष्टींचा संसर्ग वाढू दे
गणपतीबाप्पामुळेच मी घडलो, असे स्पष्ट करून विश्वास नांगरे-पाटील म्हणाले, ‘उत्सवात व्याख्यानमालेसाठी आम्ही १९९२ साली वर्गणी गोळा केली. त्यातील पन्नास हजारांपैकी आठ हजार रूपये व्याख्यानावर खर्चून उर्वरित रक्कमेतून स्पर्धा परीक्षेची पुस्तके आणली. म्हणूनच आठराशे लोकसंख्या असलेल्या गावातून आय.ए.एस. व आय.पी.एस. अशी मुले १९९७ साली तयार झाली. तीच विधायकतेची दृष्टी व ऊर्जा घेवून समरजितसिंह घाटगे जात आहेत. या चांगल्या गोष्टींचा संसर्ग असाच वाढत राहिला पाहिजे.’
सांस्कृतिक विद्यापीठ व्हावे ...
शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे म्हणाले, ‘डॉल्बीमुक्ती हा पोलिस आणि माध्यमांचा उपक्रम आहे. मी फक्त प्रायोजक आहे. शंभर वर्षांपूर्वी २४ जुलै १९१७ रोजी शाहू राजांनी प्राथमिक शिक्षणासाठी एक लाख रूपये फंड दिला आणि त्याची सुरवात गणेश उत्सवापासूनच केली. तो वारसा घेवून व्यसनमुक्ती व समाज एकत्र येणे गरजेचे आहे. याकरिता महिलांच्या सहभागाने कुटुंबाप्रमाणे गणेश उत्सव व्हावा हा उद्देश आहे. चालूवर्षी महिलांना गणेश मंडळांचे अध्यक्ष केले. त्यामुळे कागल ही शाहूंचा भूमी आहे हे मंडळांनी दाखवून दिले आहे. येथून पुढे कागल हे राजकीय विद्यापीठ न राहता ते सांस्कृतिक विद्यापीठ व्हावे याचे ब्रँडींग करूया.’