कोल्हापूर: विनापरवाना व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर महापालिका कारवाई करत आहे. कारवाई करताना हायकोर्टाचे पत्र दाखवले जात आहे. महापालिकेचा सर्व कारभार कोर्टाच्या निर्देशानुसार होतो का? असा प्रश्न उपस्थित करत मंडळावरील कारवाई थांबवा, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात म्हटले आहे, 'लहान गल्ली व उपनगरांमध्ये गणेशोत्सवासाठी मंडप उभारले आहेत. वाहतुकीस अडथळा होत नसताना, महापालिका हायकोर्टाचे पत्र दाखवून कारवाई करत आहेत. शहरात अनेकठिकाणी फुटपाथवर अतिक्रमण झाले असून अनाधिकृत बांधकामाना अभय दिले जात आहे. मात्र केवळ दहा दिवसांच्या गणेशोत्सवात प्रशासन आडकाठी निर्माण करत आहे. मंडळांनी जर परवानगी घेतली नसल्यास प्रशासनाने त्यांना परवानगी द्यावी, पण मंडप काढू नये असेही पत्रकात स्पष्ट केले आहे.
मंडळांवरील कारवाई थांबवा
विनापरवाना व वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळावर महापालिका कारवाई करत आहे कारवाई करताना हायकोर्टाचे पत्र दाखवले जात आहे...
Maharashtra Times 16 Sep 2018, 4:00 am