इचलकरंजी
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या शेतीमालास दीडपट हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, आयजीएम हॉस्पिटल व तेथील कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने आंदोलने केली जात आहेत. मात्र सरकार या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने कॉ. हणंमत लोहार, मारुती आजगेकर यांच्या नेतृत्त्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने शिरस्तेदार मनोज ऐतवडे यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारला डाव्या पक्षाने पाठींबा दिला होता. त्यावेळी स्वामीनाथन आयोगाची नियुक्ती करण्यात आली. समितीने अहवालही सादर केला. पण त्याची अंमलबजावणी आजतागायत झाली नाही. आज देशभर विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उत्पादन वाढूनही योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे कोणतीही वर्गवारी न करता सरसकट कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर व कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळावी. शहरातील आयजीएम हॉस्पिटल सध्या राज्य सरकारने हस्तांतरण करुन घेतले आहे. पण येथे कोणत्याही सुविधा नसून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चार महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. शहरात कामगार वर्ग जास्त असून सोयी सुविधा नसल्याने उपचार घेता येत नाहीत. तरी हॉस्पिटलमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांच्या शेतीमालास दीडपट हमीभाव मिळावा, सरसकट कर्जमाफी करुन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, आयजीएम हॉस्पिटल व तेथील कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लागावेत यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी वेगवेगळ्या मार्गाने सातत्याने आंदोलने केली जात आहेत. मात्र सरकार या प्रश्नांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने कॉ. हणंमत लोहार, मारुती आजगेकर यांच्या नेतृत्त्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने शिरस्तेदार मनोज ऐतवडे यांना निवेदन देण्यात आले.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारला डाव्या पक्षाने पाठींबा दिला होता. त्यावेळी स्वामीनाथन आयोगाची नियुक्ती करण्यात आली. समितीने अहवालही सादर केला. पण त्याची अंमलबजावणी आजतागायत झाली नाही. आज देशभर विक्रमी अन्नधान्य उत्पादन झाल्याने हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. उत्पादन वाढूनही योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी आत्महत्या करीत आहेत. त्यामुळे कोणतीही वर्गवारी न करता सरसकट कर्जमाफी होऊन सातबारा कोरा झाला पाहिजे. त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर व कामगारांना दरमहा तीन हजार रुपये पेन्शन मिळावी. शहरातील आयजीएम हॉस्पिटल सध्या राज्य सरकारने हस्तांतरण करुन घेतले आहे. पण येथे कोणत्याही सुविधा नसून येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना चार महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. शहरात कामगार वर्ग जास्त असून सोयी सुविधा नसल्याने उपचार घेता येत नाहीत. तरी हॉस्पिटलमध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.