अ‍ॅपशहर

​शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदारांची तयारी, पण...

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपी देण्यास कारखाने तयार झाले आहेत. पण वाहतूक आणि तोडणीची रक्कम देण्यास नकार दिल्याने कारखानदारांशी बैठख निष्पळ ठरली. यामुळे आता यावर तोडगा कसा निघणार असा प्रश्न आहे.

Authored byगुरुबाळ माळी | महाराष्ट्र टाइम्स 1 Nov 2020, 10:53 am
म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदारांनी तयारी दर्शविली, मात्र तोडणी वाहतुकीत वाढ झालेली १४ टक्के रक्कम देण्यास नकार दिल्याने कारखानदार व स्वाभिमानी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक निष्फळ ठरली. अध्यक्षस्थानी पालकमंत्री सतेज पाटील होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sugarcane factory
शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदारांची तयारी, पण... ( प्रातिनिधिक फोटो )


साखर हंगाम सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पाटील यांनी संयुक्त बैठक बोलाविली होती. या बैठकीत एकरकमी एफआरपी देण्यास सर्व कारखानदार तयार झाले. त्यामुळे संघटनेची पहिली मागणी मान्य झाली. मात्र ऊसतोड मजूरांना १४ टक्के मजूरी वाढविण्याचा निर्णय झाला आहे. ही मजूरी कारखान्यांनी द्यावी, ती शेतकऱ्यांकडून घेऊ नये अशी मागणी संघटनेच्या प्रतिनिधींनी केली. ती फेटाळून लावल्याने प्रतिनिधी बैठकीतून बाहेर गेले. यामुळे तोडगा काढण्यासाठी बोलाविलेली पहिली बैठक निष्फळ ठरली.

मराठा आरक्षणाबाबत 'त्या' चर्चा; जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका

ऊसतोडणी मजुरांसाठी शाहू कारखान्याने उभारले कोविड सेंटर

या बैठकीस ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आमदार प्रकाश आवाडे, स्वाभिमानी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील उपस्थित होते. संघटनेची ऊस परिषद २ नोव्हेंबरला होणार आहे. परिषदेत निर्णय होईपर्यंत कोणत्याही कारखान्याची धुराडी पेटवू देणार नाही, पेटविण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी दिला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज