म. टा. वृत्तसेवा, इचलकरंजी
दोन वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करून स्वत: गळफास लावून आईने आत्महत्या केल्याची घटना येथील तोरणानगर परिसरातील घडली. अर्चना राकेश कुंभार (वय २७) असे मातेचे नाव असून काव्या राकेश कुंभार असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. याप्रकरणी राकेश कुंभार यांनी शहापूर पोलिसात वर्दी दिली आहे.
शहापूर परिसरातील तोरणानगर भागात राकेश कुंभार हे कुटुंबासह राहण्यास आहेत. राकेश कुंभार (वय ३१) हे यंत्रमाग कामगार असून त्यांचा तीन वर्षांपुर्वी कोल्हापूरातील अर्चना हिच्याशी विवाह झाला होता. परंतु पती पसंत नसल्याच्या कारणावरुन उभयंतामध्ये नेहमी वाद घडत होता. वादाचे प्रकरण अनेकवेळा पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. या वादाला कंटाळून राकेश याची आई आणि भाऊ हे अर्चना हिला घेऊन जाण्याबाबत सांगण्यासाठी कोल्हापूर येथील तिच्या मामाच्या घरी गेले होते. सोमवारी राकेश दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून अर्चना हिने मुलगी काव्या हिचा साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तीन वाजण्याच्या सुमारास राकेश घरी आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. त्यांनी तातडीने काव्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु तिचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना तोरणानगर परिसरात समजताच घटनास्थळी नातेवाईकांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सीताराम डुबल, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी भेट देऊन माहिती घेतली. कौटुंबिक वादातून अशाप्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
दोन वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करून स्वत: गळफास लावून आईने आत्महत्या केल्याची घटना येथील तोरणानगर परिसरातील घडली. अर्चना राकेश कुंभार (वय २७) असे मातेचे नाव असून काव्या राकेश कुंभार असे दुर्दैवी मुलीचे नाव आहे. या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. घरगुती वादातून हा प्रकार घडल्याचे समजते. याप्रकरणी राकेश कुंभार यांनी शहापूर पोलिसात वर्दी दिली आहे.
शहापूर परिसरातील तोरणानगर भागात राकेश कुंभार हे कुटुंबासह राहण्यास आहेत. राकेश कुंभार (वय ३१) हे यंत्रमाग कामगार असून त्यांचा तीन वर्षांपुर्वी कोल्हापूरातील अर्चना हिच्याशी विवाह झाला होता. परंतु पती पसंत नसल्याच्या कारणावरुन उभयंतामध्ये नेहमी वाद घडत होता. वादाचे प्रकरण अनेकवेळा पोलिस ठाण्यापर्यंत गेले होते. या वादाला कंटाळून राकेश याची आई आणि भाऊ हे अर्चना हिला घेऊन जाण्याबाबत सांगण्यासाठी कोल्हापूर येथील तिच्या मामाच्या घरी गेले होते. सोमवारी राकेश दुपारच्या सुमारास काही कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरी कोणी नसल्याचे पाहून अर्चना हिने मुलगी काव्या हिचा साडीने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वत: साडीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. तीन वाजण्याच्या सुमारास राकेश घरी आल्यानंतर ही घटना निदर्शनास आली. त्यांनी तातडीने काव्याला खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु तिचा उपचारापुर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना तोरणानगर परिसरात समजताच घटनास्थळी नातेवाईकांनी व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकत होता. घटनेची माहिती मिळताच शहापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सीताराम डुबल, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रज्ञा देशमुख यांनी भेट देऊन माहिती घेतली. कौटुंबिक वादातून अशाप्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती.