कोल्हापूर:करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीवर सूर्य किरणे कमरेपर्यंत पोचली. दुसऱ्यादिवशी किरणोत्सव झाला असून शुक्रवारी (२) सूर्यकिरणे देवीच्या मुखावर पडतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. दरम्यान आज अभ्यासकांना किरणोत्सवाच्यावेळी अडथळे निदर्शनास आले असून महानगरपालिकेने हे अडथळे हटवावेत, अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली.
काल बुधवारी (३१) पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणांचा प्रवास कसा होता, याची उत्सुकता भाविक व अभ्यासकांना होती. किरणोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी किरणोत्सव काळात भाविकांना मंदिरात प्रवेश दिला नव्हता. त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था केली होती. आज सायंकाळी पाच वाजून ५६ मिनिटांनी सूर्यकिरणे गणपती चौकात आली. त्यानंतर किरणांचा प्रवास कासव चौकाकडे सुरु झाला. सहा वाजून तीन मिनिटांनी किरणे कासवचौका पार करत सहा वाजून पाच मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरा गाठला. त्यानंतर तांबूस रंगाची किरणे सहा वाजून आठ मिनिटांनी संगमरवरी पायरीपर्यंत पोचली. पुढच्याच मिनिटाला किरणांनी पहिली पायरी तर दुसरी पायरी सहा वाजून १० मिनिटांनी गाठली. तिसरी पायरी सहा वाजून १३ मिनिटांनी तर सहा वाजून १४ मिनिटाला किरणे चांदीच्या पायरीपर्यंत पोचली.
किरणांचा प्रवेश थेट देवीच्या गाभाऱ्यात पोचल्याने भाविकांची उत्सुकता ताणली गेली. एकीकडे सूर्य मावळतीला निघाला होता. तर दुसरीकडे इमारतीच्या काही भागांचा अडथळा येत होता. किरणांची प्रखरताही कमी आली होती. सहा वाजून १५ मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केली. सहा वाजून १६ मिनिटांनी गुडघ्यापर्यंत तर सहा वाजून १७ मिनिटांनी किरणे कमरेपर्यंत पोचल्याने किरणोत्सव पूर्ण झाला. सहा वाजून १८ मिनिटानंतर किरणे लुप्त झाली. किरणोत्सव पूर्ण झाल्याने देवीची आरती करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर पोलिस उप अधीक्षक डॉ.प्रशांत अमृतकर, करवीर पोलिस उप अधीक्षक सूरज गुरव, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे, किरणोत्सव अभ्यास समितीचे सदस्य प्रा. किशोर हिरासकर, उदय गायकवाड, शाहिर राजू राऊत, विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी रक्षता खटावकर, शितल माळवी, करिश्मा रिकीबदार उपस्थित होत्या
अडथळे हटवा
महानगरपालिकेने अडथळे हटवावेत, किरणोत्सव मार्गातील अडथळे हटवावेत, अशी मागणी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. आगळगावकर, मिणचेकर, वैद्य आणि देशिंगे यांच्या इमारतीचे अडथळे किरणोत्सव मार्गात येत असल्याचे किरणोत्सव अभ्यास समितीला आढळून आले.
काल बुधवारी (३१) पहिल्या दिवशी सूर्यकिरणांनी देवीच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी सूर्यकिरणांचा प्रवास कसा होता, याची उत्सुकता भाविक व अभ्यासकांना होती. किरणोत्सवाचा अभ्यास करण्यासाठी किरणोत्सव काळात भाविकांना मंदिरात प्रवेश दिला नव्हता. त्यांच्यासाठी स्क्रीनची व्यवस्था केली होती. आज सायंकाळी पाच वाजून ५६ मिनिटांनी सूर्यकिरणे गणपती चौकात आली. त्यानंतर किरणांचा प्रवास कासव चौकाकडे सुरु झाला. सहा वाजून तीन मिनिटांनी किरणे कासवचौका पार करत सहा वाजून पाच मिनिटांनी किरणांनी पितळी उंबरा गाठला. त्यानंतर तांबूस रंगाची किरणे सहा वाजून आठ मिनिटांनी संगमरवरी पायरीपर्यंत पोचली. पुढच्याच मिनिटाला किरणांनी पहिली पायरी तर दुसरी पायरी सहा वाजून १० मिनिटांनी गाठली. तिसरी पायरी सहा वाजून १३ मिनिटांनी तर सहा वाजून १४ मिनिटाला किरणे चांदीच्या पायरीपर्यंत पोचली.
किरणांचा प्रवेश थेट देवीच्या गाभाऱ्यात पोचल्याने भाविकांची उत्सुकता ताणली गेली. एकीकडे सूर्य मावळतीला निघाला होता. तर दुसरीकडे इमारतीच्या काही भागांचा अडथळा येत होता. किरणांची प्रखरताही कमी आली होती. सहा वाजून १५ मिनिटांनी किरणांनी चरणस्पर्श केली. सहा वाजून १६ मिनिटांनी गुडघ्यापर्यंत तर सहा वाजून १७ मिनिटांनी किरणे कमरेपर्यंत पोचल्याने किरणोत्सव पूर्ण झाला. सहा वाजून १८ मिनिटानंतर किरणे लुप्त झाली. किरणोत्सव पूर्ण झाल्याने देवीची आरती करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, शहर पोलिस उप अधीक्षक डॉ.प्रशांत अमृतकर, करवीर पोलिस उप अधीक्षक सूरज गुरव, नगर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समिती सदस्या संगीता खाडे, किरणोत्सव अभ्यास समितीचे सदस्य प्रा. किशोर हिरासकर, उदय गायकवाड, शाहिर राजू राऊत, विवेकानंद महाविद्यालयाच्या विद्यार्थीनी रक्षता खटावकर, शितल माळवी, करिश्मा रिकीबदार उपस्थित होत्या
अडथळे हटवा
महानगरपालिकेने अडथळे हटवावेत, किरणोत्सव मार्गातील अडथळे हटवावेत, अशी मागणी देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केली. आगळगावकर, मिणचेकर, वैद्य आणि देशिंगे यांच्या इमारतीचे अडथळे किरणोत्सव मार्गात येत असल्याचे किरणोत्सव अभ्यास समितीला आढळून आले.