अ‍ॅपशहर

‘झेडपी’ त रंगणार ‘टी ट्वेंटी’

कोल्हापूर ः कोणत्याही देशाचा खेळाडू घेऊन त्याच्यावर फ्रँचाइजचा शिक्का मारत ज्या पद्ध्तीने क्रिकेटमध्ये ‘ट्वेंटी ट्वेंटी’ सामने होतात किंवा प्रो कब्बडी रंगते असेच सामाने यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेतही रंगण्याची चिन्हे आहेत.

Maharashtra Times 13 Jan 2017, 3:00 am
Gurubal.Mali @timesgroup.com
महाराष्ट्र टाइम्स.कॉम t 20 in zilla parishad
‘झेडपी’ त रंगणार ‘टी ट्वेंटी’


Tweet: gurubalmaliMT

कोल्हापूर ः कोणत्याही देशाचा खेळाडू घेऊन त्याच्यावर फ्रँचाइजचा शिक्का मारत ज्या पद्ध्तीने क्रिकेटमध्ये ‘ट्वेंटी ट्वेंटी’ सामने होतात किंवा प्रो कब्बडी रंगते असेच सामाने यंदा कोल्हापूर जिल्हा परिषदेतही रंगण्याची चिन्हे आहेत. दोन्ही काँग्रेस, भाजप-शिवसेनेससह सर्वच पक्षांकडे ​प्रबळ उमेदवार नसल्याने मिळेल त्या उमेदवारावर सध्या पक्षाचा शिक्का मारण्याची स्पर्धा सुरू आहे.

जिल्हा परिषदेसाठी २१ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. अजून उमेदवार निश्चित झालेले नाहीत. तरीही जिथे चुरस आहे तेथे उमेदवारी मिळाल्याच्या थाटात काहींनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. पण काही मतदारसंघात पक्षांना उमेदवार शोधण्याची वेळ आली आहे. प्रबळ उमेदवार मिळावा यासाठी सर्वच पक्षानी मुलाखतीचा फार्स सुरू ठेवला आहे. शेवटच्या क्षणापर्यंत हा फार्स सुरू ठेवत उमेदवारीचा घोळ सुरू ठेवण्यात येणार आहे. इतर पक्षाचा चांगला उमेदवार आपल्याला मिळावा यासाठीच हा टाइमपासचा खेळ सुरू राहील.

ग्रामीण भागात काँग्रेस व राष्ट्रवादीची ताकद आहे. पण यावेळी अनेकांनी भाजपची वाट धरल्याने व शिवसेनेचे सहा आमदार निवडून आल्याने दोन्ही काँग्रेसची अडचण झाली आहे. भाजपची मदार ‘इनकमिंग’वर आहे. शिवाय ताराराणी आघाडी, शिवसेना, जनसुराज्य आणि स्वाभिमानीच्या जीवावर भाजप जिल्हा परिषदेवर झेंडा फडकवण्याचे स्वप्न पाहत आहे. सेनेचे पाच आमदार असले तरी निश्चित निवडून येण्यासारखे मतदारसंघ त्यांच्याकडे कमी आहेत. शिरोळ तालुक्यात अचानक भाजपची ताकद वाढल्याने स्वाभिमानीची अडचण होणार आहे. जनसुराज्यविरोधात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पक्ष एकत्र येणार असल्याने पन्हाळा तालुक्यात विनय कोरेंची कोंडी होणार आहे.

या पार्श्वभूमीवर कोणत्याच पक्षाला प्रबळ उमेदवार मिळण्याची व एकहाती सत्ता येण्याची अजिबात शक्यता नाही. यामुळे सध्या सर्वच पक्षांनी ‘ट्वेंटी ट्वेंटी’ खेळण्याची तयारी केली आहे. जो प्रबळ उमेदवार असेल त्याला घेऊन त्याच्यावर पक्षाचा शिक्का मारण्याचा प्रयत्न सुरू आहे. भाजपने तर आमचा शिक्का नको असेल तर ‘ताराराणी’चा बिल्ला घ्या. पण, आमच्या बाजूने लढा, असा प्रस्तावच अनेकांना दिला आहे.



जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस ताकदीने उतरणार आहे. जेथे प्रबळ उमेदवार नसतील तेथे स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून आघाडी करण्यात येईल. ही आघाडी भाजप वगळता कोणत्याही पक्षाशी होण्याची शक्यता आहे. जिंकणाऱ्या उमेदवाराचा सध्या शोध सुरू आहे.

सतेज पाटील, आमदार

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज