म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधारी गटातील उर्वरित अकरा संचालकांना चेअरमनपदाच्या मांडवाखालून घालवण्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेचा एक वर्षाचा की त्यापेक्षा कमी कालावधीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन होणार हे लवकरच समजणार आहे. यासाठी सुकाणू समिती व संचालकांची लवकरच बैठक होणार आहे. त्यानंतर फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.
शिक्षक बँकेत गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेल्या कारभाराचे मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षक संघाचे बारा तर पुरोगामी पॅनेलचे तीन व शिक्षक समितीचे दोन अशी संचालक मंडळाची संख्या आहे. सत्तारुढ शिक्षक संघाची सुकाणू समिती आहे. संचालक मंडळातून पदाधिकारी होण्याची संधी देण्यासाठी या समितीसमोर यापूर्वी चर्चा होऊन नावे निश्चित केली आहेत. गेल्या वर्षभरात झालेल्या कारभाराच्या आरोपांवरुन सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता होती. मात्र ही सभा शांततेत झाली.
सुकाणू समितीमध्ये ठरल्याप्रमाणे सध्याचे चेअरमन राजमोहन पाटील, व्हाईस चेअरमन बाजीराव कांबळे तसेच तज्ज्ञ संचालक राजाराम वरुटे यांनी रविवारी संचालक मंडळासमोर राजीनामे सादर केले. यापाठीमागे नवीन संचालकांना पदाधिकारी होण्याची संधी देण्याचा विचार असला तरी सत्तारुढमध्ये काही धुसफूस असल्याची चर्चा आहे. मात्र काही संचालक चेअरमन होण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी बँकेमध्ये नवीन पद्धती अवलंबली जाण्याची शक्यता आहे. ११ संचालक असून त्या सर्वांना चेअरमनपदाची संधी द्यायची झाल्यास चार महिन्याचाही कालावधी येणार नाही. त्यामुळे बँकेचा कारभार कसा चालवणार हा प्रश्न आहे. सध्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवून त्यांच्याकडून नवीन निवडीच्या तारखेची प्रतीक्षा केली जात आहे. तारीख आल्यानंतर सुकाणू समिती व संचालक मंडळ एकत्रित बसून नवीन पदाधिकाऱ्यांबाबत व कालावधीबाबत निर्णय घेणार आहेत. यामुळे शिक्षक बँकेची वाटचाल महापालिकेतील राजकारणाच्या दिशेने सुरू असल्याचे दिसते.
प्राथमिक शिक्षक बँकेच्या सत्ताधारी गटातील उर्वरित अकरा संचालकांना चेअरमनपदाच्या मांडवाखालून घालवण्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतल्याचे समजते. त्यामुळे महापालिकेचा एक वर्षाचा की त्यापेक्षा कमी कालावधीचे चेअरमन, व्हाइस चेअरमन होणार हे लवकरच समजणार आहे. यासाठी सुकाणू समिती व संचालकांची लवकरच बैठक होणार आहे. त्यानंतर फॉर्म्युला निश्चित केला जाणार आहे.
शिक्षक बँकेत गेल्या वर्षभरापासून सत्ताधारी व विरोधकांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. गेल्या पंचवार्षिकमध्ये झालेल्या कारभाराचे मुद्दे उपस्थित करत सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षक संघाचे बारा तर पुरोगामी पॅनेलचे तीन व शिक्षक समितीचे दोन अशी संचालक मंडळाची संख्या आहे. सत्तारुढ शिक्षक संघाची सुकाणू समिती आहे. संचालक मंडळातून पदाधिकारी होण्याची संधी देण्यासाठी या समितीसमोर यापूर्वी चर्चा होऊन नावे निश्चित केली आहेत. गेल्या वर्षभरात झालेल्या कारभाराच्या आरोपांवरुन सर्वसाधारण सभेमध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता होती. मात्र ही सभा शांततेत झाली.
सुकाणू समितीमध्ये ठरल्याप्रमाणे सध्याचे चेअरमन राजमोहन पाटील, व्हाईस चेअरमन बाजीराव कांबळे तसेच तज्ज्ञ संचालक राजाराम वरुटे यांनी रविवारी संचालक मंडळासमोर राजीनामे सादर केले. यापाठीमागे नवीन संचालकांना पदाधिकारी होण्याची संधी देण्याचा विचार असला तरी सत्तारुढमध्ये काही धुसफूस असल्याची चर्चा आहे. मात्र काही संचालक चेअरमन होण्यासाठी प्रचंड इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी बँकेमध्ये नवीन पद्धती अवलंबली जाण्याची शक्यता आहे. ११ संचालक असून त्या सर्वांना चेअरमनपदाची संधी द्यायची झाल्यास चार महिन्याचाही कालावधी येणार नाही. त्यामुळे बँकेचा कारभार कसा चालवणार हा प्रश्न आहे. सध्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे पाठवून त्यांच्याकडून नवीन निवडीच्या तारखेची प्रतीक्षा केली जात आहे. तारीख आल्यानंतर सुकाणू समिती व संचालक मंडळ एकत्रित बसून नवीन पदाधिकाऱ्यांबाबत व कालावधीबाबत निर्णय घेणार आहेत. यामुळे शिक्षक बँकेची वाटचाल महापालिकेतील राजकारणाच्या दिशेने सुरू असल्याचे दिसते.