म. टा. वृत्तसेवा, कसबा बावडा,
मोबाइलचे तीन हजार रुपयांसाठी गांधीनगर येथील तरुणाचा मित्रानेच खून केल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संजय बेले या संशयितांला ताब्यात घेतले आहे. अतुल शिवाजी अंबुरे (वय २१, रा. धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतुल अंबुरे याने त्यांच्याच भागातील संजय बेले याच्याकडून सात हजार पाचशे रुपयाला मोबाइल विकत घेतला होता. अंबुरे याने साडेसात हजारांपैकी चार हजार रुपये दिले होते. परंतु राहिलेले पैसे देण्यासाठी अंबुरे यांच्याकडून विलंब झाला होता. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संजय बेले, दत्ता पांडुरंग दळवे आणि शिवाजी गणपतराव शिंदे यांनी अंबुरे याला रेल्वेलाइन जवळील वंदना फटाका गोडाऊन येथे बोलवून घेतले. यावेळी अतुल आणि संजय यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यात संजय बेले हा खाली पडला असता त्याला दारुची बाटली फुटून हाताला जखम झाली. त्याने रागाने ती फुटलेली बाटली तशीच उचलून अतुल अंबुरे याच्या गळ्यावर वार केला. त्यामध्ये अंबुरे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याच्या तोंडावर व पाठीवर फुटलेल्या बाटलीच्या काचांनी आणि दगडांनी हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पळाले. गांधीनगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानतंर पोलिसांनी केलेल्या पाहणीत अंबुरे मृत झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण करीत आहेत.
मोबाइलचे तीन हजार रुपयांसाठी गांधीनगर येथील तरुणाचा मित्रानेच खून केल्याची घटना गांधीनगर परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी संजय बेले या संशयितांला ताब्यात घेतले आहे. अतुल शिवाजी अंबुरे (वय २१, रा. धारासूर, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अतुल अंबुरे याने त्यांच्याच भागातील संजय बेले याच्याकडून सात हजार पाचशे रुपयाला मोबाइल विकत घेतला होता. अंबुरे याने साडेसात हजारांपैकी चार हजार रुपये दिले होते. परंतु राहिलेले पैसे देण्यासाठी अंबुरे यांच्याकडून विलंब झाला होता. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास संजय बेले, दत्ता पांडुरंग दळवे आणि शिवाजी गणपतराव शिंदे यांनी अंबुरे याला रेल्वेलाइन जवळील वंदना फटाका गोडाऊन येथे बोलवून घेतले. यावेळी अतुल आणि संजय यांच्यात वाद झाला. वादाचे रुपांतर मारामारीत झाले. यात संजय बेले हा खाली पडला असता त्याला दारुची बाटली फुटून हाताला जखम झाली. त्याने रागाने ती फुटलेली बाटली तशीच उचलून अतुल अंबुरे याच्या गळ्यावर वार केला. त्यामध्ये अंबुरे हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर सर्वांनी मिळून त्याच्या तोंडावर व पाठीवर फुटलेल्या बाटलीच्या काचांनी आणि दगडांनी हल्ला केला. यानंतर हल्लेखोर पळाले. गांधीनगर पोलिसांना याची माहिती मिळाल्यानतंर पोलिसांनी केलेल्या पाहणीत अंबुरे मृत झाल्याचे लक्षात आले. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण करीत आहेत.