कोल्हापूर
शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गणपतीपुळेहून दर्शन घेऊन परत येत असताना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला.
बसमध्ये एकाच कुटुंबातील १७ जण होते. पुणे बालेवाडी येथील भरत केदारी यांचे हे कुटुंब असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. बसचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने शिवाजी पुलाचा कठडा ओलांडून बस १०० फूट खाली पंचगंगा नदीत कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अपघातात चार जणांना वाचवण्यात यश आल्याचं कळतंय. त्यांना जवळच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस आणि स्थानिक तरुणांकडून घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. बस बाहेर काढण्यासाठी तीन क्रेनची मदत घेतली जात आहे.
शिवाजी पुलावरून मिनी बस पंचगंगा नदीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. गणपतीपुळेहून दर्शन घेऊन परत येत असताना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास हा अपघात झाला.
बसमध्ये एकाच कुटुंबातील १७ जण होते. पुणे बालेवाडी येथील भरत केदारी यांचे हे कुटुंब असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. बसचालकाचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने शिवाजी पुलाचा कठडा ओलांडून बस १०० फूट खाली पंचगंगा नदीत कोसळली आणि क्षणार्धात होत्याचे नव्हते झाले. अपघातात चार जणांना वाचवण्यात यश आल्याचं कळतंय. त्यांना जवळच्या सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस आणि स्थानिक तरुणांकडून घटनास्थळावर बचावकार्य सुरू आहे. बस बाहेर काढण्यासाठी तीन क्रेनची मदत घेतली जात आहे.