म. टा. वृत्तसेवा शाहूवाडी
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वारूळ (ता.शाहूवाडी) गावच्या हद्दीतील कडवी नदीच्या पूलावरून भरधाव स्विफ्ट कार नदीत पुराच्या पाण्यात कोसळली. स्थानिक नागरिकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने गाडीतील इचलकरंजीतील तिघेजण सुखरूप बचावले. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली असून अपघातग्रस्त कार पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे.
घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी अमित नंदनगे, सचिन पाटील, पिंटू खान (सर्वजण रा. इचलकरंजी) हे तिघे मित्र इचलकरंजीतून आपली मारूती स्विफ्ट (एम. एच. ०ई २३४९) या कारने पावसाळी सहलीसाठी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरून शाहूवाडी तालुक्यातील केर्ले धबधबा व अन्य ठिकाणे पाहण्यासाठी जात होते. ही स्विफ्ट कार वारूळ गावच्या हद्दीतील वळणावरून भरधाव वेगाने आंबा दिशेने जात असताना कडवी नदीत पूलावरून डावीकडील बाजूला गाडी सरळ खाली नदीत कोसळली. यावेळी चालकांने प्रसावधान राखून गाडीचे दरवाजे उघडल्यामुळे गाडीतील अमित नंदनगे, सचिन पाटील, पिंटू खान हे सर्व नदीच्या पाण्यात पडले. कार पूलावरुन थेट नदीत पडल्याने मोठा आवाज झाला. वारूळ गावातील ग्रामस्थांनी तातडीने नदीतील पूराच्या पाण्यात उतरून तिघांनाही सुखरुप बाहेर काढले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हे तिघेही बचावले. दोन वर्षापूर्वी याच पूलावरून गाडी नदीत पडली होती. या मार्गावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. साइड पट्ट्याही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर कोठे ना कोठे नेहमी अपघात होत असतात. यावेळी केशव सपकाळ, प्रकाश पाटील, किरण परीट, रावजी पाटील, परशुराम मिरजकर, संतोष पाटील, बंडू आरसेकर, आदी युवकांनी अपघातग्रस्तांना मदत केली.
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील वारूळ (ता.शाहूवाडी) गावच्या हद्दीतील कडवी नदीच्या पूलावरून भरधाव स्विफ्ट कार नदीत पुराच्या पाण्यात कोसळली. स्थानिक नागरिकांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने गाडीतील इचलकरंजीतील तिघेजण सुखरूप बचावले. शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली असून अपघातग्रस्त कार पुराच्या पाण्यात अडकून पडली आहे.
घटनास्थळावरून समजलेली अधिक माहिती अशी अमित नंदनगे, सचिन पाटील, पिंटू खान (सर्वजण रा. इचलकरंजी) हे तिघे मित्र इचलकरंजीतून आपली मारूती स्विफ्ट (एम. एच. ०ई २३४९) या कारने पावसाळी सहलीसाठी कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरून शाहूवाडी तालुक्यातील केर्ले धबधबा व अन्य ठिकाणे पाहण्यासाठी जात होते. ही स्विफ्ट कार वारूळ गावच्या हद्दीतील वळणावरून भरधाव वेगाने आंबा दिशेने जात असताना कडवी नदीत पूलावरून डावीकडील बाजूला गाडी सरळ खाली नदीत कोसळली. यावेळी चालकांने प्रसावधान राखून गाडीचे दरवाजे उघडल्यामुळे गाडीतील अमित नंदनगे, सचिन पाटील, पिंटू खान हे सर्व नदीच्या पाण्यात पडले. कार पूलावरुन थेट नदीत पडल्याने मोठा आवाज झाला. वारूळ गावातील ग्रामस्थांनी तातडीने नदीतील पूराच्या पाण्यात उतरून तिघांनाही सुखरुप बाहेर काढले. केवळ दैव बलवत्तर म्हणूनच हे तिघेही बचावले. दोन वर्षापूर्वी याच पूलावरून गाडी नदीत पडली होती. या मार्गावर पावसामुळे मोठे खड्डे पडले आहेत. साइड पट्ट्याही भरलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावर कोठे ना कोठे नेहमी अपघात होत असतात. यावेळी केशव सपकाळ, प्रकाश पाटील, किरण परीट, रावजी पाटील, परशुराम मिरजकर, संतोष पाटील, बंडू आरसेकर, आदी युवकांनी अपघातग्रस्तांना मदत केली.