म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
ऋणमुक्तेश्वर तालीम परिसरातील भाजी मंडईमुळे त्रास होऊ लागला आहे. या परिसरात रस्त्यांवर भाजी मंडई असल्याने पर्यायी मार्गावरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
गंगावेश येथील ऋणमुक्तेश्वर तालीम परिसरात भाजी मंडई भरते. या मंडईत ग्रामीण भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात येतात. भाजी मंडई परिसरात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना ये जा करताना त्रास होत आहे. परिसरातील नागरिकांना वाहने बाहेर लावावी लागतात. भाजी मंडई बंद झाल्यावर नागरिकांना वाहने घरी आणावी लागतात. आजारी पडल्यावर नागरिकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी रिक्षाही येत नाहीत. या मंडईत येण्यासाठी राजर्षी शाहू उद्यानाच्या पूर्व बाजूला सरंक्षक भिंतीजवळ महानगरपालिकेने रस्त्यांवर अतिक्रमण करुन दुकान गाळा बांधला आहे. त्याचा फटका परिसरातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात नागरिकांनी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रार करुन महानगरपालिकेने दुर्लक्ष केले आहे. हा रस्ता नागरिकांसाठी खुला करुन द्यावा, अशी मागणी परिसरातून नागरिकांकडून केली जात आहे.
सोळा वर्षे पाठपुरावा
महानगरपालिकेने अतिक्रमण करून रस्त्यावर गाळा बांधण्यात आला आहे. परिसरातील काही संस्था व नागरिकांनी हे अतिक्रमण हटवावे, या मागणीसाठी २००३ पासून पाठपुरावा केला आहे. पण महानगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. महानगरपालिकेने अतिक्रमण केलेला गाळा हटवावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. स्थानिक नगसेवकांनीही याबाबत पाठपुरावा केला आहे.