कोल्हापूर : 'समाजाच्या जडणघडणीत सत्यशोधक समाजाचे योगदान अग्रकमाचे आहे. सत्यशोधकांच्या विचार कार्याचा वारसा पुढील पिढीने जपायला पाहिजे' असे प्रतिपादन प्रा. डॉ. विलास पोवार यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बिंदू चौकातील पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाच्या ६८व्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित समारंभात ते बोलत होते. प्रारंभी, महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या पुतळयाना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. राजवैभव शोभा रामचंद्र यांनी प्रास्ताविक केले. सीमा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला छाया पोवार, किरण गवळी, युवराज कदम, आरती रेडेकर, संघसेन जगतकर, रमेश वडणगेकर, कपिल मुळे, प्रशांत आंबी, अॅड. बाळासाहेब पोवार, शिवाजी माळी उपस्थित होते.
‘सत्यशोधकांचा वारसा’
'समाजाच्या जडणघडणीत सत्यशोधक समाजाचे योगदान अग्रकमाचे आहे सत्यशोधकांच्या विचार कार्याचा वारसा पुढील पिढीने जपायला पाहिजे' असे प्रतिपादन प्रा डॉ...
Maharashtra Times 10 Dec 2018, 4:00 am