कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आवश्यक ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र आणण्यासाठी निवडणूक प्रशासनाचे पथक शुक्रवारी तमिळनाडूला रवाना झाले. तेथून यंत्र आल्यानंतर त्यांची तपासणी करण्यात येणार आहे. बंदोबस्तात यंत्रे आणण्यासाठी बंदूकधारी चार पोलिसही गेले आहेत. यंत्रे येथे येण्यासाठी चार ते पाच दिवस लागतील, असे निवडणूक प्रशासनाकडून सांगण्यात आले.
००००