म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर
गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी शहरात अर्धा ते पाऊण तास दमदार हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळी झालेल्या जोरदार सरींमुळे फेरीवाल्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. गडहिंग्लज, गारगोटी आणि चंदगड परिसरातही पावसाने चांगली हजेरी लावली. पाटगाव धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून, बारवे ते भुदरगड किल्ला आणि मठगाव ते तांबाळे मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली.
मान्सूनचा सुरुवातीचा टप्पा चक्री आणि वायू चक्रीवादळामुळे कोरडाच गेला होता. शनिवारी आर्द्रा नक्षत्र सुरु झाले. या नक्षत्रात तरी पाऊस होणार की नाही, अशी शंकाही उपस्थित होत होती. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र प्रचंड उष्माही होता. दुपारी तर कडक ऊन पडल्याने आर्द्राचा पहिला दिवस कोरडाच जाणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र सायंकाळी पाचनंतर मात्र पुन्हा ढगाळ वातावरण झाले. हवेत प्रचंड गारवा निर्माण होऊन सायंकाळी सातच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी कोसळल्या. पेरण्याची कामे बहुतांशी पूर्ण झाल्याने पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या आठवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळी शहरात अर्धा ते पाऊण तास दमदार हजेरी लावली. आर्द्रा नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी पावसाने दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण आहे. सायंकाळी झालेल्या जोरदार सरींमुळे फेरीवाल्यांसह नागरिकांची तारांबळ उडाली. गडहिंग्लज, गारगोटी आणि चंदगड परिसरातही पावसाने चांगली हजेरी लावली. पाटगाव धरणक्षेत्रात जोरदार पाऊस झाला असून, बारवे ते भुदरगड किल्ला आणि मठगाव ते तांबाळे मार्गावरील वाहतूक काही काळ बंद ठेवावी लागली.
मान्सूनचा सुरुवातीचा टप्पा चक्री आणि वायू चक्रीवादळामुळे कोरडाच गेला होता. शनिवारी आर्द्रा नक्षत्र सुरु झाले. या नक्षत्रात तरी पाऊस होणार की नाही, अशी शंकाही उपस्थित होत होती. सकाळपासून ढगाळ वातावरण होते. मात्र प्रचंड उष्माही होता. दुपारी तर कडक ऊन पडल्याने आर्द्राचा पहिला दिवस कोरडाच जाणार, अशी शक्यता व्यक्त होत होती. मात्र सायंकाळी पाचनंतर मात्र पुन्हा ढगाळ वातावरण झाले. हवेत प्रचंड गारवा निर्माण होऊन सायंकाळी सातच्या सुमारास दमदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी कोसळल्या. पेरण्याची कामे बहुतांशी पूर्ण झाल्याने पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.