अ‍ॅपशहर

मारहाण करणारे तिघे अटकेत

पत्नीशी बोलत असल्याच्या रागातून पतीसह तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात जखमी तरुणाने फिर्याद दिली...

Maharashtra Times 21 Jun 2018, 4:00 am

मारहाण करणारे तिघे अटकेत

कोल्हापूर : पत्नीशी बोलत असल्याच्या रागातून पतीसह तिघांनी एका तरुणाला बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात जखमी तरुणाने फिर्याद दिली. यानुसार करवीर पोलिसांनी बुधवारी दुपारी तिघांना अटक केली. संदीप गणपती पाटील (३५, रा. आसुर्ले, ता. पन्हाळा), बाळासाहेब लक्ष्मण पाटील (४५, रा. वडणगे पाडळी), जयसिंग तानाजी माने (३८, रा. केर्ले) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. यांनी केलेल्या मारहाणीत जितेंद्र बाजीराव जाधव (३४, रा. दरेवाडी, ता. पन्हाळा) जखमी झाला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज