Maruti.Patil@timesgroup.com
tweet: @MarutipatilMT
कोल्हापूर :
सामाजिक दबाव, मानसिक ताणतणावर, स्वत:च्या लिंगभावविषयी अस्वस्थता, सामाजिक कलंक अशा अनेक समस्यांशी तृतीयपंथीचा दररोजचा संघर्ष सुरू असतो. समाजही तुच्छतेची वागणूक देत असल्याने वर्षानुवर्षे तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात व सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी येथील तृतीयपंथींनी शिक्षणाची वाट धरली आहे.
शिक्षणाच्या जोरावर समाजाचा आपणही एक अविभाज्य घटक असल्याचे दाखवून देत आयुष्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हे सर्व तृतीयपंथी २५ मे रोजी कला शाखेच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेला सामारे जात आहेत. भविष्यात हे तृतीयपंथी पदवी घेऊन सन्माने बाहेर पडतील त्यावेळी समाजाने त्यांचा सकारात्मक दृष्टीने स्वीकार केला पाहिजे. असे झाले तरच तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील.
स्त्री किंवा पुरुष अशा दोन्ही लिंगांमध्ये समावेश नसल्याने त्यांच्याकडे समाजाच्या पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा. समाजात स्थानच मिळत नसल्याने असह्य जीवन वाट्याला आलेले तृतीयपंथी मिळेल, त्या साधनातून आपल्या पोटाची खळगी भरत असतात. तृतीयपंथीमध्ये शिक्षणाचा प्रचंड अभाव असल्याने अंधश्रद्धेच्या जोखडात अडकून पडलेले दिसतात. रेल्वे, एसटी स्टँड, मंदिर किंवा अन्य रहदारीच्या ठिकाणी पैस मागत फिरत असल्याचे चित्र हमखास पहायला मिळते. पण अशा तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
समाजच स्वीकारत नसल्याने कोल्हापूर येथील आठ तृतीयपंथींनी शिक्षणातून आपली संघर्ष संपवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. मुक्त विद्यापीठाचे महावीर कॉलेजयेथील सेंटरमध्ये कला शाखेच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत प्रवेश घेतला. कॉलेजनेही सर्व तृतीयपंथींना विद्यापीठामार्फत मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. पण केवळ शिक्षण घेतले तर पोट कसे भरणार या विवेंचनेतून चार तृतीयपंथींना अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागले. आपल्या चार सहकाऱ्यांनी शिक्षण सोडले, तरी दुर्गा पिसाळ, मयुरी आळवेकर, विनिता डोईफोडे व अंकिता आळवेकर यांनी हार न मानता येईल त्या संकटांना सामोरे जात नियमित वर्गांना उपस्थिती लावली. वर्षभराच्या अभ्यासक्रमामध्ये मिळालेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावरच २५ मे रोजी होणाऱ्या अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी ते नियमित आभ्यासही करत आहेत. शिक्षण पूर्ण करुन आयुष्याची लढाई जिंकण्याचा त्यांना निर्धार केला आहे.
तृतीयपंथीची मतदार नोंदणी
घटनेने सर्वांना समान हक्क दिला असला, तरी मतदानासारख्या हक्कापासून देश स्वातंत्र झाल्यापासून तृतीयपंथी वंचित होते. राष्ट्रीयस्तरावर आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपले हक्क मिळवून घेतले आहेत. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई केली आहे. आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यांमुळेच त्यांनी नुकतीच मतदार यादीमध्ये नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची नोंद मतदार यादीत झाली आहे.
दैनंदिन जीवनात दररोज वेगवेगळ्या संघर्षाला सामोरे जावे लागते. संघार्षातून बाहेर पडायचे असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला आहे. प्रथम वर्षाच्या शिक्षणासाठी महावीर कॉलेज व मुक्त विद्यापाठाच्या सर्वच घटकांनी मदतीचा हात दिला. मिळालेल्या शिक्षणातून इतर तृतीयपंथासाठी कार्य करत राहणार आहे. यासाठी सरकारी सेवेत जाण्याचा प्रयत्न असेल.
दुर्गा पिसाळ, तृतीयपंथी
तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातूनच प्रवेश परीक्षेद्वारे तृतीयपंथींना प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला आहे. त्यांना मोफत शिक्षण दिले जात असून संपूर्ण खर्च मुक्त विद्यापीठ करत आहे.
प्रा. अरुण पाटील, महावीर कॉलेज
tweet: @MarutipatilMT
कोल्हापूर :
सामाजिक दबाव, मानसिक ताणतणावर, स्वत:च्या लिंगभावविषयी अस्वस्थता, सामाजिक कलंक अशा अनेक समस्यांशी तृतीयपंथीचा दररोजचा संघर्ष सुरू असतो. समाजही तुच्छतेची वागणूक देत असल्याने वर्षानुवर्षे तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिले आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात व सन्मानाचे जीवन जगता यावे, यासाठी येथील तृतीयपंथींनी शिक्षणाची वाट धरली आहे.
शिक्षणाच्या जोरावर समाजाचा आपणही एक अविभाज्य घटक असल्याचे दाखवून देत आयुष्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हे सर्व तृतीयपंथी २५ मे रोजी कला शाखेच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेला सामारे जात आहेत. भविष्यात हे तृतीयपंथी पदवी घेऊन सन्माने बाहेर पडतील त्यावेळी समाजाने त्यांचा सकारात्मक दृष्टीने स्वीकार केला पाहिजे. असे झाले तरच तृतीयपंथी समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील.
स्त्री किंवा पुरुष अशा दोन्ही लिंगांमध्ये समावेश नसल्याने त्यांच्याकडे समाजाच्या पाहण्याचा दृष्टीकोनही वेगळा. समाजात स्थानच मिळत नसल्याने असह्य जीवन वाट्याला आलेले तृतीयपंथी मिळेल, त्या साधनातून आपल्या पोटाची खळगी भरत असतात. तृतीयपंथीमध्ये शिक्षणाचा प्रचंड अभाव असल्याने अंधश्रद्धेच्या जोखडात अडकून पडलेले दिसतात. रेल्वे, एसटी स्टँड, मंदिर किंवा अन्य रहदारीच्या ठिकाणी पैस मागत फिरत असल्याचे चित्र हमखास पहायला मिळते. पण अशा तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न होताना दिसत नाहीत.
समाजच स्वीकारत नसल्याने कोल्हापूर येथील आठ तृतीयपंथींनी शिक्षणातून आपली संघर्ष संपवण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी त्यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. मुक्त विद्यापीठाचे महावीर कॉलेजयेथील सेंटरमध्ये कला शाखेच्या प्रथम वर्षासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होत प्रवेश घेतला. कॉलेजनेही सर्व तृतीयपंथींना विद्यापीठामार्फत मोफत शिक्षण देण्यास सुरुवात केली. पण केवळ शिक्षण घेतले तर पोट कसे भरणार या विवेंचनेतून चार तृतीयपंथींना अर्ध्यावर शिक्षण सोडावे लागले. आपल्या चार सहकाऱ्यांनी शिक्षण सोडले, तरी दुर्गा पिसाळ, मयुरी आळवेकर, विनिता डोईफोडे व अंकिता आळवेकर यांनी हार न मानता येईल त्या संकटांना सामोरे जात नियमित वर्गांना उपस्थिती लावली. वर्षभराच्या अभ्यासक्रमामध्ये मिळालेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनामुळे त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आहे. या आत्मविश्वासाच्या जोरावरच २५ मे रोजी होणाऱ्या अंतिम परीक्षेला सामोरे जाण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी ते नियमित आभ्यासही करत आहेत. शिक्षण पूर्ण करुन आयुष्याची लढाई जिंकण्याचा त्यांना निर्धार केला आहे.
तृतीयपंथीची मतदार नोंदणी
घटनेने सर्वांना समान हक्क दिला असला, तरी मतदानासारख्या हक्कापासून देश स्वातंत्र झाल्यापासून तृतीयपंथी वंचित होते. राष्ट्रीयस्तरावर आंदोलनाच्या माध्यमातून त्यांनी आपले हक्क मिळवून घेतले आहेत. त्यासाठी त्यांनी सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई केली आहे. आपल्या हक्कासाठी दिलेल्या लढ्यांमुळेच त्यांनी नुकतीच मतदार यादीमध्ये नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील तृतीयपंथीयांची नोंद मतदार यादीत झाली आहे.
दैनंदिन जीवनात दररोज वेगवेगळ्या संघर्षाला सामोरे जावे लागते. संघार्षातून बाहेर पडायचे असल्यास शिक्षणाशिवाय पर्याय नाही. यासाठी पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचा निर्धार केला आहे. प्रथम वर्षाच्या शिक्षणासाठी महावीर कॉलेज व मुक्त विद्यापाठाच्या सर्वच घटकांनी मदतीचा हात दिला. मिळालेल्या शिक्षणातून इतर तृतीयपंथासाठी कार्य करत राहणार आहे. यासाठी सरकारी सेवेत जाण्याचा प्रयत्न असेल.
दुर्गा पिसाळ, तृतीयपंथी
तृतीयपंथींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यातूनच प्रवेश परीक्षेद्वारे तृतीयपंथींना प्रथम वर्षासाठी प्रवेश दिला आहे. त्यांना मोफत शिक्षण दिले जात असून संपूर्ण खर्च मुक्त विद्यापीठ करत आहे.
प्रा. अरुण पाटील, महावीर कॉलेज