अ‍ॅपशहर

विहिरीत बुडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गावभागातील ढोल पाणंद परिसरात घडली. आकाश हणमंत पाटील (वय ८ ) व शिवाप्पा कामाण्णा पुजारी (वय १२ ) अशी त्यांची नांवे आहेत. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत गावभाग पोलिस ठाण्यात सुरु होते.

Maharashtra Times 2 Apr 2017, 3:00 am
म.टा. वृत्तसेवा, इचलकरंजी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम two death in ichalakaranji
विहिरीत बुडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू


पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना गावभागातील ढोल पाणंद परिसरात घडली. आकाश हणमंत पाटील (वय ८ ) व शिवाप्पा कामाण्णा पुजारी (वय १२ ) अशी त्यांची नांवे आहेत. याबाबतची नोंद करण्याचे काम रात्री उशीरापर्यंत गावभाग पोलिस ठाण्यात सुरु होते. शाळकरी मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नदीवेस नाका परिसरातील मुजावरपट्टी परिसरात राहणारे आकाश पाटील व शिवाप्पा पुजारी हे मित्रांसमवेत ढोले पाणंद परिसरात असलेल्या रुग्गे यांच्या विहिरीत शनिवारी दुपारी पोहण्यासाठी गेले होते. या दोघांनाही पोहता येत नसल्याने रबरी इनरच्या सहाय्याने ते पोहण्यासाठी विहिरीत उतरले. भितीने दोघांनी एकमेकाला मिठी मारल्याने ते पाण्यात बुडाले. त्यांच्यासोबत पोहायला गेलेल्या मुलांनी ही घटना पालकांना सांगितली. माहिती मिळताच पालकांसह भागातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. पण, विहीर खोल असल्याने दोघेही आढळून आले नाहीत. मात्र विहिरीवर दोघांचे कपडे आढळून आले. व्हाइट आर्मीचे जवान व अग्निशमन दलाच्या पथकाच्या सहकार्याने शोधमोहीम राबविण्यात आली. रात्री दोघांचेही मृतदेह सापडले. आकाश व शिवाप्पा या दोघांचा मृतदेह पाहताच नातेवाईकांनी आक्रोश केला. आयजीएम रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आकाश हा एकुलता एक होता.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज