कोल्हापूर :
मराठा आरक्षणासाठी सरकारने ३१ ऑगस्टच्या आत विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करावी. त्याचबरोबर त्यामध्ये मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन आर्थिक तरतूद न केल्यास ४ सप्टेंबर रोजी कोल्हापूरसह राज्यातील विविध भागातून हजारो वाहनांचा मुंबईवर मोर्चा काढण्याचा निर्णय बुधवारी सकल मराठा समाजाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत मोर्चातील वाहने बेमुदत काळासाठी मुंबईतील मंत्रालय, गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातील रस्त्यावरच उभी करण्यात येणार आहेत. अहिंसक मार्गाने आंदोलन केले जाणार असून या मोर्चातील पहिली गाडी श्रीमंत शाहू महाराज यांची असेल, असे समन्वयक इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.
मराठा आरक्षणासाठी सरकारने ३१ ऑगस्टच्या आत विधानसभेच्या विशेष अधिवेशनाची घोषणा करावी. त्याचबरोबर त्यामध्ये मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन आर्थिक तरतूद न केल्यास ४ सप्टेंबर रोजी कोल्हापूरसह राज्यातील विविध भागातून हजारो वाहनांचा मुंबईवर मोर्चा काढण्याचा निर्णय बुधवारी सकल मराठा समाजाच्या पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला.
मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत मोर्चातील वाहने बेमुदत काळासाठी मुंबईतील मंत्रालय, गेट वे ऑफ इंडियाच्या परिसरातील रस्त्यावरच उभी करण्यात येणार आहेत. अहिंसक मार्गाने आंदोलन केले जाणार असून या मोर्चातील पहिली गाडी श्रीमंत शाहू महाराज यांची असेल, असे समन्वयक इंद्रजीत सावंत यांनी सांगितले.