हातकणंगले : पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेले राजाराम शिवाजी कोळी (वय ५७, रा. माणगाव) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. अपघात मंगळवारी पहाटे सहाच्या सुमारास पिराई बिअर शॉपीसमोर घडला होता. माणगाव येथील राजाराम कोळी अभिषेक सूतगिरणीमध्ये नोकरीस होते. ते मंगळवारी पहाटे कामावर जात असताना अज्ञात वाहनाची धडक बसल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली होती. त्यांना कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात केले होते. तथापि, अधिक उपचारसाठी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आहेत. घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
अपघातातील जखमीचे निधन
पट्टणकोडोली (ता हातकणंगले) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेले राजाराम शिवाजी कोळी (वय ५७, रा माणगाव) यांचे उपचारादरम्यान निधन झाले...
Maharashtra Times 8 Nov 2018, 4:00 am