लातूर : राज्यातल्या काही जिल्ह्यात कर्मचारी कामावर आलेले असले तरी लातूर विभागात संपावर गेलेला कर्मचारी कामावर आलेला नाही. गत 41 दिवसापासून बसेस जाग्यावरच आहेत. त्यामुळे इंजिन लॉक होऊन बसेस बंद पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शासनाने आमच्या मागण्या मान्य करुन राज्यातील हजारो एस टी कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. जर इंजिन लॉक होऊन बसेस बंद पडल्या तर त्या बसेसला सुरु करण्यासाठी पुन्हा मोठा खर्च होऊ शकतो. मागील दीड महिन्यांपासून बसेस आगारात थांबलेल्या असल्याने ऑइल गोठून इंजिन लॉक होण्याची शक्यता आहे. तर टायर देखील खराब होण्याची भीती आहे. लातूर विभागात लातुर 107, औसा 80, अहमदपूर 60, निलंगा 70 आणि उदगीर 90 बसेस आहेत. त्यामुळे बसेसचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.
एसटीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असताना दुसरीकडे मात्र एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य करण्यास सरकार अद्याप तयार नाहीय. एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने संप काही केल्या मिटत नाहीय. संपावर तोडगा निघत नाहीय. मात्र सरकारने विलीनीकरणची मागणी मान्य करून हे नुकसान टाळावे, आणि एसटी कर्मचाऱ्यांना जनतेच्या सेवेची संधी द्यावी, अशा भावना एसटी महामंडळातील यांत्रिक विभागाच्या महिला कर्मचारी व्यक्त करतात.
अनेक जिल्ह्यात काही एसटी कर्मचारी कामावर आलेले आहेत. त्यामुळे काही फेऱ्या सुरू आहेत पण लातुरात एकही एसटी बस आगराबाहेर पडली नाहीय. एसटी प्रशासनाने आजपर्यंत 310 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून त्यापैकी 285 जणांना निलंबित तर 25 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारवाई केली आहे. अद्यापही पाचही आगारासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे.
एसटीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात असताना दुसरीकडे मात्र एसटी कर्मचाऱ्यांची विलीनीकरणाची मागणी मान्य करण्यास सरकार अद्याप तयार नाहीय. एसटी कर्मचारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने संप काही केल्या मिटत नाहीय. संपावर तोडगा निघत नाहीय. मात्र सरकारने विलीनीकरणची मागणी मान्य करून हे नुकसान टाळावे, आणि एसटी कर्मचाऱ्यांना जनतेच्या सेवेची संधी द्यावी, अशा भावना एसटी महामंडळातील यांत्रिक विभागाच्या महिला कर्मचारी व्यक्त करतात.
अनेक जिल्ह्यात काही एसटी कर्मचारी कामावर आलेले आहेत. त्यामुळे काही फेऱ्या सुरू आहेत पण लातुरात एकही एसटी बस आगराबाहेर पडली नाहीय. एसटी प्रशासनाने आजपर्यंत 310 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली असून त्यापैकी 285 जणांना निलंबित तर 25 कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारवाई केली आहे. अद्यापही पाचही आगारासमोर कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडला आहे.