अतिरिक्त प्रवाशांना रोखण्यासाठी यंत्रणा उभारणार
jayant.howal
@timesgroup.com
Tweet : @hjayantMT
मुंबई : आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी… जागा नसतानाही प्रसंगी उभ्याने करावा लागणारा प्रवास… भरीस भर विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी…प्रवाशांच्या सुरक्षेला निर्माण होणार धोका…या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता ‘महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डा’ने कठोर पावले उचलली आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना मज्जाव करणारी विशिष्ट यंत्रणा उभारली जाणार असून, मांडवा आणि एलिफंटा येथून या नव्या उपक्रमास सुरुवात होईल. गेटवे येथून अशा प्रकारे जादा प्रवासी घेऊन बोटी आल्यास जादा प्रवाशांना या दोन्ही जेट्टींवर प्रवेश नाकारून त्यांना पुन्हा गेट-वे-ऑफ इंडियाला माघारी पाठवले जाईल.
मेट्रोमध्ये तिकिटाचे कॉइन टाकल्याशिवाय प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताच येत नाही. त्यासाठी तेथे स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेतून एका वेळी एकाच प्रवाशाला प्रवेश करता येतो. पहिला प्रवासी गेल्यानंतर गेट बंद होतो. त्यानंतर दुसऱ्या प्रवाशाने कॉइन टाकल्यावर गेट पुन्हा उघडतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना घुसखोरी करता येत नाही. याच धर्तीवर मांडवा आणि एलिफंटा येथे यंत्रणा उभारली जाणार आहे. बोटीची जेवढी आसनक्षमता तेवढ्याच तिकिटांचे वाटप केले जाईल. त्यामुळे बोटीत अतिरिक्त प्रवाशांना जाता येणार नाही आणि नफा कमावण्यासाठी जादा प्रवाशांना कोंबणाऱ्या बोट मालकांनाही पायबंद बसणार आहे.
अतिरिक्त प्रवासी वाहून नेणाऱ्या बोट चालकांना दंड आकारला जातो. परंतु, दंडाची रक्कम अत्यल्प असल्याने बोटचालकांना काही फरक पडत नाही. दंडाची रक्कम वाढवूनही किती फरक पडेल याची शाश्वती नसल्याने त्यापेक्षा प्रवेश नाकारण्याचा प्रयोग यशस्वी ठरू शकतो, असे बोर्डाच्या अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.
नाक दाबून तोंड उघडणार
गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा व एलिफंटा या ठिकाणी बोटी प्रवास करतात. परंतु, गेटवेचे व्यवस्थापन मुंबई पोर्ट ट्रस्टकडे असल्याने या ठिकाणी मेरिटाइम बोर्डाला कार्यवाही करता येत नाही. याउलट मांडवा व एलिफंटा जेट्टीचे व्यवस्थापन बोर्डाकडे असल्याने या भागात बोर्ड स्वतःची नियमावली राबवू शकते. गेट-वे-ऑफ इंडियाहून जादा प्रवासी घेऊन बोटी मांडवा व एलिफंटाला आल्यास अतिरिक्त प्रवाशांना या दोन्ही जेट्टीवर प्रवेश नाकारण्यात येईल, साहजिकच बोटमालकांना या प्रवाशांना पुन्हा गेटवेला घेऊन जावेच लागेल. अशा प्रकारे नाक दाबले गेल्यामुळे पुढल्या खेपेस जादा प्रवाशांची वाहतूक करण्यास बोटमालक धजावणार नाहीत. प्रवाशांना प्रवेश नाकारल्यास पुन्हा गेटवेला घेऊन जावे लागणार असल्याने बोट मालकांना आर्थिक भूर्दंड पड शकतो, शिवाय प्रवाशांचा रोषही पत्करावा लागू शकतो. जादा प्रवाशांना प्रवेश नाकारला जातो, याविषयी प्रवाशांना माहिती झाल्यास तेही बोटमालकाला नकार देऊ शकतात. मांडवा आणि एलिफंटावर मेट्रोच्या धर्तीवर यंत्रणा उभारली जाणार असल्याने या दोन्ही जेट्टींवरून अतिरिक्त प्रवासी बोटीत चढण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.
jayant.howal
@timesgroup.com
Tweet : @hjayantMT
मुंबई : आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी… जागा नसतानाही प्रसंगी उभ्याने करावा लागणारा प्रवास… भरीस भर विनातिकीट प्रवाशांची घुसखोरी…प्रवाशांच्या सुरक्षेला निर्माण होणार धोका…या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता ‘महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डा’ने कठोर पावले उचलली आहेत. क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना मज्जाव करणारी विशिष्ट यंत्रणा उभारली जाणार असून, मांडवा आणि एलिफंटा येथून या नव्या उपक्रमास सुरुवात होईल. गेटवे येथून अशा प्रकारे जादा प्रवासी घेऊन बोटी आल्यास जादा प्रवाशांना या दोन्ही जेट्टींवर प्रवेश नाकारून त्यांना पुन्हा गेट-वे-ऑफ इंडियाला माघारी पाठवले जाईल.
मेट्रोमध्ये तिकिटाचे कॉइन टाकल्याशिवाय प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताच येत नाही. त्यासाठी तेथे स्वयंचलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. या यंत्रणेतून एका वेळी एकाच प्रवाशाला प्रवेश करता येतो. पहिला प्रवासी गेल्यानंतर गेट बंद होतो. त्यानंतर दुसऱ्या प्रवाशाने कॉइन टाकल्यावर गेट पुन्हा उघडतो. त्यामुळे विनातिकीट प्रवाशांना घुसखोरी करता येत नाही. याच धर्तीवर मांडवा आणि एलिफंटा येथे यंत्रणा उभारली जाणार आहे. बोटीची जेवढी आसनक्षमता तेवढ्याच तिकिटांचे वाटप केले जाईल. त्यामुळे बोटीत अतिरिक्त प्रवाशांना जाता येणार नाही आणि नफा कमावण्यासाठी जादा प्रवाशांना कोंबणाऱ्या बोट मालकांनाही पायबंद बसणार आहे.
अतिरिक्त प्रवासी वाहून नेणाऱ्या बोट चालकांना दंड आकारला जातो. परंतु, दंडाची रक्कम अत्यल्प असल्याने बोटचालकांना काही फरक पडत नाही. दंडाची रक्कम वाढवूनही किती फरक पडेल याची शाश्वती नसल्याने त्यापेक्षा प्रवेश नाकारण्याचा प्रयोग यशस्वी ठरू शकतो, असे बोर्डाच्या अधिकाऱ्याने खासगीत सांगितले.
नाक दाबून तोंड उघडणार
गेटवे ऑफ इंडिया येथून मांडवा व एलिफंटा या ठिकाणी बोटी प्रवास करतात. परंतु, गेटवेचे व्यवस्थापन मुंबई पोर्ट ट्रस्टकडे असल्याने या ठिकाणी मेरिटाइम बोर्डाला कार्यवाही करता येत नाही. याउलट मांडवा व एलिफंटा जेट्टीचे व्यवस्थापन बोर्डाकडे असल्याने या भागात बोर्ड स्वतःची नियमावली राबवू शकते. गेट-वे-ऑफ इंडियाहून जादा प्रवासी घेऊन बोटी मांडवा व एलिफंटाला आल्यास अतिरिक्त प्रवाशांना या दोन्ही जेट्टीवर प्रवेश नाकारण्यात येईल, साहजिकच बोटमालकांना या प्रवाशांना पुन्हा गेटवेला घेऊन जावेच लागेल. अशा प्रकारे नाक दाबले गेल्यामुळे पुढल्या खेपेस जादा प्रवाशांची वाहतूक करण्यास बोटमालक धजावणार नाहीत. प्रवाशांना प्रवेश नाकारल्यास पुन्हा गेटवेला घेऊन जावे लागणार असल्याने बोट मालकांना आर्थिक भूर्दंड पड शकतो, शिवाय प्रवाशांचा रोषही पत्करावा लागू शकतो. जादा प्रवाशांना प्रवेश नाकारला जातो, याविषयी प्रवाशांना माहिती झाल्यास तेही बोटमालकाला नकार देऊ शकतात. मांडवा आणि एलिफंटावर मेट्रोच्या धर्तीवर यंत्रणा उभारली जाणार असल्याने या दोन्ही जेट्टींवरून अतिरिक्त प्रवासी बोटीत चढण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही.