अ‍ॅपशहर

मुंबईच्या पर्यावरणाला नवी आशा

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून निघालेली दहिसर नदी दहिसर पश्चिमेला कांदरपाड्याच्या खारफुटीपर्यंत कशी पोहोचते, तिचा प्रवास कसा होता, या प्रवासामध्ये तिचे पात्र कसे अस्वच्छ झाले आहे याचा धावता आढावा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतला.

Maharashtra Times 22 Jun 2017, 4:00 am
अमृता फडणवीस यांनी केला नदीदौरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुंबईच्या पर्यावरणाला नवी आशा


म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून निघालेली दहिसर नदी दहिसर पश्चिमेला कांदरपाड्याच्या खारफुटीपर्यंत कशी पोहोचते, तिचा प्रवास कसा होता, या प्रवासामध्ये तिचे पात्र कसे अस्वच्छ झाले आहे याचा धावता आढावा बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी घेतला. दहिसर नदीनंतर त्यांनी पोयसर नदीचीही पाहणी केली. या पाहणीदरम्यान त्यांनी मुंबईच्या सर्वांत सुंदर परिसराला सर्वांत खराब केल्याचे सांगत या नद्यांच्या आणि खारफुटींच्या पुनरुज्जीवनासाठी नवी आशा निर्माण केली आहे.

रिव्हरमार्चरने मुंबईच्या नद्या स्वच्छ करायला घेतल्यापासून विविध नेत्यांकडून आतापर्यंत अनेक आश्वासने मिळाली मात्र परिस्थितीत प्रत्यक्षात फारसा फरक पडला नव्हता. सामान्य नागरिक नदीपात्रातील कचरा हाताने काढत होते. या नदीपात्राचे काँक्रिटीकरण थांबावे म्हणून महापालिका आयुक्तांचीही भेट घेतली होती. तरीही काँक्रिटीकरणाचे काम थांबले नाही. या पार्श्वभूमीवर भाजप नेते विक्रम चोगले यांनी पुढाकार घेऊन रिव्हरमार्चचे कार्यकर्ते आणि अमृता फडणवीस यांची भेट घडवून आणली. गेल्या आठवड्यात फडणवीस यांना मुंबईतील नद्यांच्या स्थितीबद्दल माहिती दिल्यानंतर बुधवारी त्यांनी या परिसराला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. सुमारे तीन तासांहून अधिक काळ फडणवीस यांनी या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील लहान बंधारे, धोबीघाट, तबेल्यांची समस्या, खारफुटीमध्ये झालेले अतिक्रमण, पोयसर नदीचा क्रांतीनगर येथील

परिसर, पोयसरवर सुरू असलेले काँक्रिटीकरण या गोष्टी त्यांनी स्वतः पाहिल्या. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये इलेक्ट्रिक गाड्यांच्या प्रस्तावाला महापालिकेकडून असणारी मंजुरीची प्रतीक्षा ही समस्याही यावेळी त्यांना सांगण्यात आली. नालेसफाईनंतरही

दहिसर नदीपात्रात असलेले शेण, प्लास्टिक, थर्माकोल हा कचरा त्यांनी पाहिला. क्रांतीनगर येथे नदीपात्रातील कचरा वारंवार काढूनही तेथे जैसे थे स्थिती झाली आहे. या ठिकाणी महापालिकेने अजूनही कचऱ्याच्या डब्यांची सोयही केलेली नाही. यासंदर्भात त्यांनी क्रांतीनगरवासियांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यानुसार महापालिका अधिकाऱ्यांना आवाहन करून या जागेची पुन्हा महिन्याभरात पाहणी करायला येण्याचे आश्वासन दिले.


नदीचे उर्वरित काँक्रिटीकरण थांबवावे

पोयसर नदीमध्ये सुमारे ७५ टक्के मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण सुरू आहे. यासंदर्भात समिती अभ्यास करत असून त्यांनी अजूनही माहिती दिलेली नाही, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. प्रत्यक्ष कांदिवली ठाकूर कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेले काँक्रिटीकरण पाहून त्यांनी उर्वरित काँक्रिटीकरण ताबडतोब थांबवण्याची विनंती केली.

तबेल्यांचा प्रश्न

अमृता फडणवीस दहिसर नदीची पाहणी करायला येणार असल्याच्या दिवशी सकाळी भाजप नेत्या मनीषा चौधरी आणि स्थानिक नगरसेवकांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. नवीन विकास आराखड्यानुसार तबेल्यांचे स्थलांतर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे चौधरी यांनी सांगितले. माध्यमांना यासंदर्भात माहिती देताना नदीचे सौंदर्यीकरण, संरक्षक भिंत या मुद्द्यांवर यावेळीही पुन्हा भर देण्यात आला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज